Skip to main content

संस्कृती

आज गुरुपोर्णिमा....

लेखक डावखुरा यांनी रविवार, 25/07/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा : गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम: ॥ हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानक

माझ्याबाजुला बसलेली ती.

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 23/07/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
दीवस कोणता होता माहीती नाही,मी दुपारी बांद्रयाला जायला निघालो होतो.ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर गेलो.ट्रेनमधे व बाहेर फारशी गर्दी नव्हती.पाउस पडुन छान गार वातवरण तयार झाल होत व सावली पडल्यासारख झाल होत.........असो. मी अगदीच गबाळा व लोफर दीसत नव्हतो.अनेक वर्षांनंतर 'शर्ट व पँट'(फॉर्मल) अंगाला लागत होत्,म्हणुन जरा अवघडल्यासारखा वागत होतो.जरा इकडे तिकडे नजर फीरवली,नाही म्हणजे आपण कोणाच 'लक्ष' तर नाही ना हे बघायला.अर्थात त्याचा उद्देश हाच की हस होउ नये.काहीजण मला 'चैन उघडी आहे' अस का नाही सांगत हे समजत नाही. ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.मी चौथ्या सीटवर बसुन मस्त सेकंड

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा
काव्यरस

आषाढी एकादशी काही कथा

लेखक बज्जु यांनी बुधवार, 21/07/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 19/07/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं.

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

लेखक ब्रिटिश यांनी सोमवार, 19/07/2010 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आटवतय तुला शेतान भात लावताना तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना' कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय 'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता. हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता. त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त
काव्यरस

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

आज जगन्नाथाची रथयात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 13/07/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नंदीघसा तोरा अटकी गला बडसंखठारे किए से भकत एते आपणर डाकिला चंदनपुरे... काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास? ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता. जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम! (इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.