मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

मनो ·
लेखनप्रकार
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

'माया': एक झुंजं संसाराशी!-अंतिम भाग

सुहास चंद्रमणी बारमासे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
.........मायाचा छोटा भाऊ 'प्रभाकर' आयुर्वेदामध्ये 'डॉक्टर' होता. त्याला आपल्या दाजींचे दारूचे व्यसन माहित होते. त्याच्याकडे दारू सोडवण्यासाठी काही जालीम औषध होते. 'प्रभाकर' माया ला भेटायला आला आणि औषधाबद्दल मायाला सांगितले. "पण हे औषध द्यायचं कसं दादू?" मायाने विचारले."औषधांच्या गोळ्याची भुकटी करायची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये द्यायची! जेव्हा दाजी दारू पितील तेव्हा दारूसोबत या गोळ्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि उलट्या सुरू होतात. असे दोन-तीनदा झाले की दारू पिणारा माणूस दारू प्यायला घाबरतो.

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग २

सुहास चंद्रमणी बारमासे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
........'चंद्रभान' मायाला आणि आपल्या मुलाला द्यायला सासरी आला. सासऱ्याने जावयाचा खास पाहुणचार म्हणून गावरान कोंबडा कापला. 'रत्नाकर' हा मायाचा मामेभाऊ होता तो पण दारुडा होता. त्याने गावच्या 'मोहाची दारू' चंद्रभानला पाजली आणि नशेमध्ये धुंद झाल्या नंतर 'रत्नाकर' चंद्रभानला विचारू लागला, "काय भाऊजी तुमचं काही लफड-वफडं आहे का बाहेर कुठे? जाता की नाही बैठकीत! 'चंद्रभान' लगेच बरळायला लागला, "आहे ना! आपल्या सारख्या पैलवान गड्याची एकीवर थोडी हौस भागते. आहे 'चंपा' नावाची नाचणारी बाई!"रत्नाकर ने ही माहिती लगेच मायाला दिली.मायाला आधी संशय होता पण आता रत्नाकरने सांगितल्यानंतर पुष्टी झाली.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

उपयोजक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

उपयोजक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

मदनबाण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात.

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.

हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप

उपयोजक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत. साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु.

गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन

प्रचेतस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा, नववर्षाचा पहिला दिवस, शालीवाहन शक, या दिवशी आपण गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करतो. गौतमीपुत्र सातकर्णीने याच दिवशी शकांचा पराभव केला असे मानले जाते आणि त्याच विजयाप्रीत्यर्थ हा शक सुरु केला असे मानले जाते. अर्थात हा विवाद्य विषय कारण मुळात गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला ते इसवी सन १२५ ते १३० च्या आसपास असे मानले जाते तर कुशाण वंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली ते इस ७८ मध्ये, साहजिकच हा संवत्सर कनिष्काने सुरु केला असावा आणि नंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी हा प्रचलित केला असे मानता येते.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.