Skip to main content

साहित्यिक

कॅलीडोस्कोप

लेखक kurlekaar यांनी बुधवार, 12/03/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलीडोस्कोप --१-- श्रावणातला सत्यनारायण. तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.

ही ती चित्रे ...

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 10/03/2014 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे. यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.

आज तुम याद बेहिसाब आये …

लेखक सुज्ञ यांनी रविवार, 09/03/2014 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रकाश आहे … अनेक दिवे झगमगत आहेत …. अशातच एखादी दीपमाळ लक्ष वेधून घेते कारण नसत …. पण काहीतरी सुंदर वाटतं … एखादी सामायोसुचीत हालचाल … कुठलातरी रंग … जेंव्हा सगळंच चवदार वाटायला लागतं तेंव्हा एकच पदार्थ असा असतो कि जो आवडून जातो बेगम अख्तरी बाई अशाच … मी त्यांना प्रत्यक्ष बघितलाय किंवा ऐकलंय असं घडणच शक्य नाही … माझं तेवढं नशिबही बलवत्तर नाही … पण जगजीत सिंग , गुलाम अली साहेब , मेहेंदी हसन खान साहेब या अनेक लोकांच्या प्रकाशमालेतुन हा दिवा चटकन खुलून येतो ….

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/03/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 ४) आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.

नवीन चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 11/02/2014 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
राख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला.
काव्यरस

यादवी माजली

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 06/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्‍याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.) तर यादवीचा संबंध आहे श्रीकृष्णाशी.

कविता, मीटर आणि मी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 06/02/2014 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला,आजकाल आमी बी कविता करतो , असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर?