Skip to main content

नाट्य

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 11/11/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला. त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) - प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

सुनीता देशपांडे यांचे निधन...

लेखक विद्याधर३१ यांनी शनिवार, 07/11/2009 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.

मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 26/08/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे. मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे. मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना? माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो.

मेघना माझी बहीण..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 04/08/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं. मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच. मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच! मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली.

हबीब तन्वीर

लेखक मुक्तसुनीत यांनी सोमवार, 08/06/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम हिंदी नाटककार , दिग्दर्शक , आणि अभिनेते हबीब तन्वीर यांचे सोमवारी भोपाळ येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. "आग्रा बझार", "चरणदास चोर" इत्यादि प्रसिद्ध हिंदी नाटके त्यांनी लिहिली आणि केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सिस्ट विचारांनी प्रभावित असलेल्या पीढीचे ते महत्त्वाचे साक्षीदार असे म्हणता येईल. त्यांनी "नाटक" हाच एक ध्यास घेतल्यासारखे संपूर्ण आयुष्य काढले. त्याना अनेक पुरस्कार मिळाले. - १९६९ सालचा "संगीत नाटक अकादेमी पुरस्कार" - १९८३ साली पद्मश्री - २००२ साली पद्मभूषण याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता.