Skip to main content

मौजमजा

किती बार बोला मत पी, मत पी.. ऐकताइच नई ये...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती बार बोला - मत पी, मत पी.. ऐकताइच नई है... "खाना खाना के बाद आधा घंटा रुकने को बोला बुढ्ढा लोगने... बादमें पानी पीने का... ये सुनताईच नहीं।" "पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय... हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है... हज़म कैसा करायेंगे हम लोक... दो घास के बाद पानी पीता, कोक मूं लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए... ठीकसे चबाता भी नही...फिर पीता ए... अपनके साथ अब नही जमता... जूस बनाना फिर मिक्स मार के डायजष्ट कराना पडता .. डॉक्टर के पास भी भेजा, हार्टभाई को भी मंजूर नही पडेला है...

ठाणे कट्टा -अचानक

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 13/01/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे. हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 10/01/2014 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/26585 ...पुढे चालू अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत.... ============================================== क्रमांक-१) अंघोळ:- धार्मिक कार्यांची सुरवात या घोळापासून होते.म्हणूनच याला अं..घोळ असं म्हटलेलं आहे.

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 05/01/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १) नारदमुनी उवाच: गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला. तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे.

इतकेच मला जाताना...

लेखक चिन्मय खंडागळे यांनी शनिवार, 04/01/2014 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...) इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते सजणाने केली सुटका, नवर्‍याने छळले होते लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या, मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच हसू आले की, दारू देता नवर्‍याला मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...

बसल्यानंतर ची मजा,

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 04/01/2014 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्यानंतर ची मजा, दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 26/12/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.

अनाहिता ठाणे कट्टा

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 26/12/2013 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले.