Skip to main content

मौजमजा

प्रसिद्धी

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 02/03/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.

रविवारी भल्या सकाळी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/02/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : सकाळी ७:०० वाजता स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप वार : रविवार काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्‍या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्‍यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!

तेजोनिधि लोहगोल - छायाचित्रे

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 28/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज हे दिनमणि व्योमराज कोटि कोटि किरण तु़झे अनलशरा उजळिती अम्रुतकण परि सेवुनि अणु रेणु उधळिती तेचातच जनन मरण तेजातच नविन ध्यास ज्योर्तिमय मुर्ती तुझी नभमंड्ल दिव्यसभा दाहक परि संजिवक तरुणारुण किरणप्रभा होव जिवन विकास वसुधेची राख लाज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज. हे गाणं दररोज सकाळी ऐकुन माझ्या दिवसाची सुरुवात करतो, काही फार जास्त महत्वाचं काम असेल दिवसभरात तर लगेच ' गगन सदन तेजोमय' ऐकुन घेतो, सगळी कामं झटपट होतात माझी. मागच्या आठवड्यात एका डोंगरावर गेलो होतो, म्हणजे हापिसातर्फे ट्रेनिंग होतं, त्या अंतर्गत डोंगरावर चढवलं होतं, अगदि सकाळि सकाळी.

आमचेही क्रिकेट

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 25/02/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटचे सुरु झालेले महासंग्राम आणि त्या निमित्ताने मिपाने दिलेल व्यासपीठ..त्या निमित्ताने माझ्याकडून हा प्रयत्न... आम्ही BE ला असतानाची ही गोष्ट. आमच्या D.Y.Patil College Of Engg,कोल्हापूरला २५ वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने कॉलेज मध्ये अनेक नवीन गोष्टी सुरु होत्या. २५ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वगैरे दणक्यात साजरा करून झाल होत.

मिपाची हालहवाल..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 25/02/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत
काव्यरस

रतनगड - एक सुखद अनुभव

लेखक गणेशा यांनी बुधवार, 23/02/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो... रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो.. सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. डबा .. कांदे..

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

कोडी

लेखक तिमा यांनी रविवार, 20/02/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते. एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला.