अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल
काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत.
आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.
कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या.
“या, कुमारने मला सांगितले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.”
“सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो.
“नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे?
जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव!
माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले.
ह्या वयातदेखील बाबा दवाखान्याची पायरी चढले नव्हते. जुने खोड! पण अलीकडे मी बघत होतो, बाबांना थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला होता.
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.
थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती.
डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेआठ झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हा चिटपाखरू नव्हे पण मधुनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरु होऊन दोन तीन आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच कायती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती, कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर?
पांडुरंग स्वतःवरच भनकला होता. शेजारचा श्रीरंग तो किती हुशार होता. ते काय म्हणतात न हां स्मार्ट! सगळेजण त्याची स्तुति करतात. पोरीबाळींशी बोलताना तर विचारायला नको. असा लाळघोटेपणा करतो. पण कामात मात्र चुकार. साधी बेरीज वजाबाकी करण्यात हजार चुका. वाण्याकडे सामान आणायला गेला तर वाणी त्याला हमेशा चुकीची मोड देणार! त्याचा मालक दहादा त्याच्याकडून हिशेब करून घेणार, मालक बिचारा म्हातारा झालेला, पहिल्या तारखेला येणाऱ्या पेन्शनवर सगळा महिना काढायाचा . त्याला पै न पैची काळजी असणारच. आता ह्या वयात रंग्याला काढून दुसऱ्या कुणाला ठेवायचे म्हणजे जीवाला केव्हढा घोर.
वरदान
संध्याकाळचे सहा वाजले की माझी पाऊलं अपोआप हॅाटेल सवेराकडे वळतात. आज पण मी समोरचे कागद बाजूला सारून, कपडे करून बाहेर पडलो. माझ्या नेहमीच्या हॅाटेलच्या मध्ये जाऊन चहा पीत बसणे हा माझा आवडीचा टाइम पास होता. ह्या हॅाटेलची रचना मोठी सुरेख आहे. काही टेबल आंत होती तर काही बाहेर मोकळ्यावर. ज्याची जशी आवड त्याप्रमाणे लोक बसत असत. मी नेहमी बाहेर एका ठरलेल्या जागी जाऊन बसतो. ह्या जागेवरून रस्त्यावरची रहदारी अगदी सहज नजरेस पडते. मी येईपर्यंत शेट्टी त्या टेबलावर रिझर्वची पट्टी लाऊन ठेवत असे. माझ्यापासून शेट्टीच्या हॅाटेलचा खास फायदा होत असेल असे नाही.
ऑनसाईट चे आकर्षण कोणाला नसते? मलाही होते. पण अमेरिका , यूरोप, सिंगापुर, यूएई येथे अनेकदा प्रयत्न करूनही मला कधी संधी मिळाली नाही. मी हताश झालो होतो आणि ऑनसाईट हे आपल्या नशिबात नाही असे मानून आहे ती नोकरी करत होतो. पण ६ महिन्यांपूर्वी अचानक एका दुपारी मला युगांडा मधून एक फोन आला. तिथल्या एका बँकेत त्यांना माहिती सुरक्षा सल्लागार म्हणून माणूस हवा होता. प्रथम आफ्रिकेत जायला मी नाखुषच होतो. पण जो पगार मला ऑफर केला होता तो नाकारण्यासारखा नव्हता.
शेवटी मी ती ऑफर स्वीकारली आणि rtpcr आणि यलो फिवर लस अशा अनेक दिव्यातून पार पडत युगांडात पोहोचलो.
श्रीपाद रात्री धावतच माझ्या कडे आला. "ती आता बोलते आहे, "आई आलीये, मला बोलावते आहे" असं म्हणत हसते आहे." असं तो धापा टाकत सांगत होता. मी थोडा हादरलोच.
माझ्या डोळ्यासमोर जवळपास ३७ वर्षांपूर्वीचा प्रसंग आला.....
यातील, ती म्हणजे सुलेखा, जन्माला आली तेव्हा तरी नॉर्मलच वाटत होती . ती पुढे "अशी" होईल अशी कोणालाच कल्पना आली नाही. अशी म्हणजे मतिमंद, किंवा हल्लीच्या सोफिस्टिकेटेड भाषेत विशेष मूल!
वनमालाबाई आणि गोपाळराव (यांचे आडनाव मी मुद्दाम सांगणार नाहीये) याना लग्नानंतर झालेली पहिलीच मुलगी ! वनमालाबाई, गोपाळराव आणि सुलेखा !
भाग ९ : https://www.misalpav.com/node/49146
……………..
२ जून २०२१ पासून सुरू केलेली लेखमाला आता संपवत आहे. साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी (लघु)कथा हा एक महत्त्वाचा आणि वाचकांना रिझवणारा प्रकार. जागतिक कथासागर अफाट आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील काही निवडक विदेशी कथांचा आस्वाद घेता आला. या लेखमालेची सुरुवात अगदी ठरवून अशी काही झाली नाही. ती कशी झाली ते सांगतो.
गेले तीन-चार वर्षे दरसाल पावसाळ्याचे सुरवातीस एखादे चक्रीवादळ येत असते. त्यावेळेस जोरदार पाऊस पडतो. दरवर्षी असा पाऊस खिडकीतून बघत असताना मला ‘Rain’ या सॉमरसेट मॉम यांच्या कथेची आठवण होई.