Skip to main content

जीवनमान

..बेंगलोर पासपोर्ट सेवा केंद्रामधील गम्मत..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 08/06/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली. जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती. थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती. पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच. माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले. कारण.. माझ्याकडे माझे स्वतःचे अ‍ॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते. पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोच

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले.

'६ जून'.... भारतीय प्रमाणवेळ सायं. ५:२१ ३८८ वा राज्याभिषेक दिन.

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 06/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज खर्‍या खुर्‍या जाणत्या राजाचा 'राज्याभिषेक दिन' .......................... .......................... .......................... मनात आहे ना? बस्स झालं. काय मंडळी? नाहीतरी नुसता जयजयकार करुन काय उपयोग म्हणा?

पाचशेची वॉटर बॉटल!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 06/06/2011 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी स्कूलमध्ये जाणार म्हणून आम्ही शालापूर्व शॉपींग करायला गेलो होतो. युनिफॉर्म, सैक वगैरे खरेदी केल्यावर वॉटर बॉटलचं नाव निघालं. आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.' त्यानं हसून एकदम ठेवणीतली वॉटरबॉटल काढली. म्हणाला- 'बेस्ट अॅटम आहे हा. अशी बॉटल हिच्या वर्गातल्या कुणाकडेच नसेल बघा. चांगली दोन तीन वर्ष जाईल. अहो स्टेफी ग्राफ वापरायची असल्या बॉटल्स. त्याच कंपनीची आहे ही, आणि विशेष म्हणजे गरम पाणी आठ तासापर्यँत गरमच राहतं, थंडपाणी थंडच राहतं.

आई गं! काय ती जळजळ!

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 06/06/2011 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अ‍ॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला.

दिसभर उन्हातान्हात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/06/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिसभर उन्हातान्हात
दिसभर उन्हातान्हात तोड केली जंगलाची बाभळीचा काटा रुतला धार काढली रक्ताची जीव जगवला खावून कोरडी भाकरी चटणी तहान भागवाया आहे ओढ्याचे पाणी साता महिन्यांची घरधनीन पोटूशी तिला कसं आनू संगती? ती तर पोटाने उपाशी मोळी वाळल्या लाकडांची जाईल का विकून? तेल मिठ मिरची आणायाला पैसं मिळलं का त्यातून? - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/०६/२०११

हत्या करायला शीक

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हत्या करायला शीक विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.