Skip to main content

इतिहास

शिवरायांची शस्त्रे व संभाजी महाराजांचे साहित्य

Published on रवीवार, 30/09/2012
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.

मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)

Published on सोमवार, 17/09/2012
मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist) मायन्सच्या र्‍हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे 'तोल्तेक'. नौवात्ल भाषेतील "Tollan" या शब्दावरून "तोल्तेक" हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ Artist. हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी.

<रडारड>

Published on गुरुवार, 13/09/2012
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...

तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

Published on गुरुवार, 06/09/2012
हिमशिखरांतून खळखळ गाते मनमंदीर तर झगमग झुलते कुणास कोणी हरवून जेते तुझी पुलावर आठवण येते. ---- काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१ काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन. या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..

एक डोक्यातला किडा

Published on सोमवार, 03/09/2012
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं. हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात. परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात..