Skip to main content

इतिहास

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 29/07/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.

आद्य आंदोलक- गोदाईवा

लेखक खेडूत यांनी रविवार, 29/07/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे. असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल.. इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती. सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ.

आजाद हिंदची रणरागिणी हरपली

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 24/07/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे. हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या.

परिक्रमा!

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 22/07/2012 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
परिक्रमा ही एक थोर अध्यात्मिक साधना आहे याची बालंबाल खात्री झाल्यानं नवग्रह ती करायला निघाले. आत्मझिरो हा `परिक्रमाकिंग' खरं तर लीडर होणार होता पण त्याची आता अशी परिस्थिती झाली होती की `आपण प्रदक्षिणा करतोय का दोन परिक्रमांच्यामधे कुठे तरी थांबलोय' हेच त्याला कळायचं नाही, त्यात तो एकटा मधेच सटकून भलत्याच मार्गानं जाण्याची शक्यता होती. पुन्हा बर्‍याचदा त्याला काय म्हणायचय ते कुणालाच नक्की समजायचं नाही, तर असा लिडार काय कामाचा? त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला आणि मतदान घेणं क्रमप्राप्त झालं.

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

पाणीवाली बाई!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 18/07/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्‍या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं. गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.