वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखनप्रकार
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.

मंत्र दिला राम कॄष्ण हरि

लेखनविषय:
आज माघ शुद्ध दशमी. वारकरी सांप्रदायात या तिथीला विशेष महत्व दिले जाते.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखनप्रकार
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

लेखनप्रकार
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात.

देव तिळीं आला

आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

लेखनविषय:
लेखनप्रकार
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ भगवंत म्हणतात: १. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे २. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. ३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण.

आम्ही अस्पृश्याची पोरे

काव्यरस
विठ्ठलाचा पुत्र रुक्मिणीचा बाळ संन्याशाचे पोर म्हणूनी अस्पृश्य   नका दे‌ऊ अन्न नका दे‌ऊ पाणी नका दे‌ऊ थारा पहा हा अस्पृश्य   सावली पडता दूर हो म्हणती शिव्या शाप देती म्हणती अस्पृश्य   दुषणे ठेविली भिक्षा नाही दिली मुंज नाही केली ठेविले अस्पृश्य   ज्ञानराज श्रेष्ठ भक्तराज श्रेष्ठ योगीराज श्रेष्ठ परि तो अस्पृश्य?   गीता उपदेशी बोले ज्ञानदेवी ज्ञान करी मुक्त परि तो अस्पृश्य?   विठोबाचा प्राण विसोबाचा गुरू नामयाचा बाप परि तो अस्पृश्य?   जनीची साजणी दीनांची मा‌उली संतांची सा‌उली तरी ती अस्पृश्य?

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

लेखनप्रकार
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

लेखनप्रकार
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रीयांनी धार्मीक संस्कृतीच जतन करावं मात्र इतर क्षेत्रांएवढच शिक्षण क्षेत्र स्त्रीयांपासून कसे दूर ठेवले जाईल याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड करत असतात किंवा केलेला असतो. सध्या बातम्यात येत आहे ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे वाचनालय ज्या मुख्य वाचनालयात सर्वाधिक पुस्तकांची उपलब्धता आहे त्या मौलाना आझाद वाचनालयात मस्जिदी प्रमाणेच प्रवेश बंद आहे. हा प्रवेश बंद असणे हि गोष्ट नवीन नाही.
Subscribe to धर्म