Skip to main content

छायाचित्रण

बालपणीचे निसर्ग सवंगडी

लेखक जागु यांनी बुधवार, 28/09/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल. चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्‍याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता.

मोर्गे सेहर - हे बुलबुलांनो उठा !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/09/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे. का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस ! मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत !

रानी माज्या मळ्यामंदी

लेखक जागु यांनी बुधवार, 14/09/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या. १) दुधी भोपळा २)

गणेशोत्सव २०११

लेखक साबु यांनी मंगळवार, 13/09/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो... फोटो पुन्हा डकवले आहेत.... ऋषिकेश आणि स्पावड्याशी सहमत... बहुतेक अति पोस्ट प्रोसेसिंग फोकस झाले आहे आणि ब्लर खूपच झालेत... फोटो उडवले कारण मला उगीचच वाटले की सवन्ग प्रसिद्धि करता मी हे केले आहे.. @ऋषिकेश, हो तो फोटो श्री श्री श्री रविशंकरांचा आहे.

मुसळधार पावसात-लोहगडावर

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 05/09/2011 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा पराठेवाला कट्टा यथासांग पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवसाचा रविवार तसा आळसातच घालवायच्या तयारीत होतो. तितक्यात सकाळी ९.३० ला मित्राचा फोन आला "१०.३० पर्यंत तयार हो, बाहेर जायचेय भटकायला". कुठे जायचेय, कसे जायचेय काहीही ठरले नव्हते. ठरल्याप्रमाणे तो वेळेवर आला, गाडीत बसलो आणि कुठे जायचे याची चर्चा सुरु झाली. मुळशी, पवना वगैरे ठिकाणांचा विचार मागे मागे पडत गेला. पाऊस तर मुसळधार पडत होता आणि विचार फक्त भिजण्याचाच होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गानेच प्रवास चालू होता. डोंगर अगदी हिरवेकंच झाले होते. ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत होते.