Skip to main content

चित्रपट

त्सोत्सी

लेखक सुनील यांनी गुरुवार, 02/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्‍याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात. झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग. लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्‍या-मार्‍या करायला लागतो.

सौदागर

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 01/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. त्या डोंगरदर्‍यांत इकडे तिकडे फिरणारा एक माणूस यांच्या कहाण्या सांगेल... कारण तेथे बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, बाकी गावकर्यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत. एक मात्र जाणवते: तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते.

सिनेमा आस्वाद - पॅटन

लेखक शुचि यांनी रविवार, 29/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्‍याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं. पण आमच्या घरात सध्या झालीये एक फितुरी. मी ज्या पिल्लाला माझं समजत होते इतकी वर्षं , अगदी टेकन फॉर ग्रांटेड ते निघालय पप्पाचं. तिनी फादर्स डे ला माझ्या नवर्‍याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला.

पीपली लाइव

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 15/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्‍या एका गरीब शेतकर्‍याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.