Skip to main content

विरंगुळा

दिल्ले दान... घेतले दान...

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 02/04/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!) डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार.

अहं मुर्खास्मि

लेखक भोचक यांनी मंगळवार, 01/04/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटलेय, म्हणे. पण माझ्या मते जग हा मुर्खांचा पसारा असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या या विधानाने बरेच लोक नाराज होतील, याची मला कल्पना आहे. पण मी मांडलेले स्पष्टीकरण वाचल्यानंतर ते किती योग्य आहे, हेही तुम्हाला पटेल. आणि स्वतःला मुर्ख म्हणवून घेण्याचा तुम्हालाही आनंदच वाटेल. वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 01/04/2008 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
अथांग पाण्यात डोलणार्‍या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.

खयाली पुलाव

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 01/04/2008 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवड्याची पाककृती - खयाली पुलाव
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली. "पाणी की सोडा?" त्याने विचारले. "काही नको." केशवसुमार म्हणाला. "म्हणजे? नीट घेणार की काय तू केशवा? त्रास होईल हो..." बेसनलाडू काळजीच्या स्वरात म्हणाला. "नाही... काही नको, म्हणजे काहीच नको. मी पीत नाही." "तू... पीत... नाहीस?" बेसनलाडवाने आश्चर्याने विचारले. "बापरे! म्हणजे तू अजिबातच.. अरे बापरे!

मी मराठी

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 31/03/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.

एप्रिल फ़ूल

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 29/03/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे.

ब्रेकिंग न्यूज

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 29/03/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.