Skip to main content

विरंगुळा

मनसुखसेट्ची चाय !

लेखक पहाटवारा यांनी शुक्रवार, 17/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"ए देस्सपांडेसेठ, चाय प्यायलीस काय तू ?" दुकानातल्या अगणीत तसबीरींच्यापैकी एखाद्या तसबीरिसमोर ऊभ्या-ऊभ्या चालू असलेल्या आपल्या पूजेत व्यतय न आणता, देशपांड्यांनी मनसुखसेट्च्या हाकेकडे रोज-प्रमाणेच दुर्लक्ष केले. "पांडूसेठला आज अद्रक सस्ता भेटलेला दिसतोय यार्डात!" मनसुखसेठची टिप्पणी चालूच होती. जुन्या कसब्यात दुर्गादेवीच्या देवळापासल्या गर्दीतल्या दुकानांच्या रांगेत मनसुखसेट अन देस्सपांडेसेटची दुकाने एकमेकाला खेटून होती. देस्सपांडेसेट - असा कुठल्याहि 'श' चा 'स्स', असा 'स' वर जोर देऊन ऊच्चार करणे हि मनसुखसेठ्ची खास स्टाईल !

किती बार बोला मत पी, मत पी.. ऐकताइच नई ये...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
किती बार बोला - मत पी, मत पी.. ऐकताइच नई है... "खाना खाना के बाद आधा घंटा रुकने को बोला बुढ्ढा लोगने... बादमें पानी पीने का... ये सुनताईच नहीं।" "पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय... हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है... हज़म कैसा करायेंगे हम लोक... दो घास के बाद पानी पीता, कोक मूं लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए... ठीकसे चबाता भी नही...फिर पीता ए... अपनके साथ अब नही जमता... जूस बनाना फिर मिक्स मार के डायजष्ट कराना पडता .. डॉक्टर के पास भी भेजा, हार्टभाई को भी मंजूर नही पडेला है...

एक संवाद

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा ___________________________________________ "शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली. "कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले. "शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे?

एक सुखाचा रविवार

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 12/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 10/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/26585 ...पुढे चालू अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत.... ============================================== क्रमांक-१) अंघोळ:- धार्मिक कार्यांची सुरवात या घोळापासून होते.म्हणूनच याला अं..घोळ असं म्हटलेलं आहे.

पाऊस असा रुणझुणता...

लेखक चावटमेला यांनी बुधवार, 08/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कधीचा कोसळतो अंतरात काहूर अनामिक एक, दाटते स्पंदनांत... 'पाऊस' ह्या निसर्गाच्या अविष्कारातच जणू मला एक प्रकारची गूढरम्यता वाटते. परीक्षेत निबंध लेखनासाठी माझा आवडता ऋतू असा विषय असला की पावसाळा सोडून दुसरं काही खरडल्याचं स्मरणात नाही.

Kundalinee -- Made easy

लेखक शरद यांनी सोमवार, 06/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी ही भानगडच एकंदरीत अवघड असल्याने त्या वरील लेख अनाकलनीय असल्यास आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. परंतु शरद सरांच्या क्लासमध्ये यावरील सुलभीकरण करणारे एक चिटोरे (leaflet) सापडले. कुंडलिनीबद्दल प्रत्यक्षाप्रत्यक्ष ज्ञान असणारे महाभाग सोडून इतरांकरिता अशा लीफलेट्सचा उपयोग मोठा असतो.

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 05/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १) नारदमुनी उवाच: गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला. तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 26/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.