गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९
मागिल भाग..
काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!
पुढे चालू....
=======================
त्या रात्री.. मला झोप अशी नीट येतच नव्हती. मनात एकच विचार येत होता. माणूस.. हा, आधी सदाचारी असल्याचा दिसतो,आणि मग.. धर्म त्यामागून डोकावल्यासारखं का वाटतं?
मिसळपाव
(पुस्तक-परिचय )
शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.