निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी
‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.
मिसळपाव
मंडळी
मी आज एक फार मोठा स्टंट केला.
ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील.
समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर?
या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल.
ही कल्पना मी ए०आय०च्याच मदतीने तात्काळ प्रत्यक्षात उतरवली.
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती.