एआय आणि उत्पादकता
लेखनप्रकार
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती. बौद्धिक आणि शारीरिक चापल्याचा घनिष्ट संबंध असल्याचे विज्ञानाने आता मान्य केला असल्याने माझ्या या जुजबी निरिक्षणांमध्ये शास्त्रीय तथ्य असल्याचे नंतर लक्षात आले.
हा गंमतीदार ’अभ्यास’ सांगायचा उद्देश असा की नवे तंत्रज्ञान आल्यावर जे अगोदर धावत सुटतात, ते त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. चॅटजीपीटीचे लोकार्पण झाल्यापासून मी रोज या तंत्रज्ञानाविषयी येणार्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. जवळजवळ ३ महिने गेल्यानंतर भारतीय ब्लॉगर्सनी ए०आय०ची दखल घ्यायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा, आपण याही खेपेला नव्या तंत्रज्ञानाला संगणकाच्या आगमनाच्या वेळी दिला तसा थंडा प्रतिसाद दिला (हे अर्थात माझे वैयक्तिक मत आहे).
ए०आय० किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता हे असे तंत्रज्ञान आहे की ज्याने आजवर निर्माण झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात जास्त गुंतागुंतीचा प्रभाव मानवी जीवनावर टाकला आहे. ’बृह्त्भाषा प्रतिकृती’ (लार्ज लॅंग्वेज मॉडेल) अवतीर्ण होण्यापूर्वीच अनेक जणांनी धोक्याच्या घंटा वाजवायला सुरुवात केली होती. पण "मग सावकाश बघू" या धारणेमुळे बहुसंख्य लोकांनी या इशार्यांकडे दूर्लक्ष केले.
आज भारतीय माध्यमातून ए०आय० बद्दल जे लिहीले किंवा दाखवले जाते, त्यात मला नकारात्मक सूर जास्त सापडतो. मराठीत पण ए०आय० बद्दल बोलणारे अनेक मातब्बर तज्ज्ञ ए०आय० कसा वापरावा याबद्दल अवाक्षर न काढता धोक्यांबद्दलच जास्त बोलताना दिसतात. विशेषत: अलिकडे अमेरीकेतील एम०आय०टी०ने मेंदू निष्क्रिय होण्याबद्दल इशारा देणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते. कारण प्रत्यक्षात अनेक लोकोत्तर तंत्रज्ञानांच्या आगमनावेळी असे इशारे देण्यात आले होते. उदा० इमेल तंत्रज्ञन आले तेव्हा लोकांना हाताने पत्र लिहीणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व वाटू लागले होते. तसेच इमेलमध्ये भावनिक ओलावा नाही म्हणून नाक मुरडले जायचे. अनेकजण मी इमेल बघत नाही, इंटरनेट वापरत असे अभिमानाने सांगायचे. पण नंतर इमेलने आणि संदेशनातील नंतरच्या प्रगतीने मानवी आयुष्य किती व्यापले हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही नकारात्मता जर अशीच कुरवाळली गेली तर तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणून पण भारत मागे पडेल अशी मला भीति वाटते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अस्तित्त्वाला धक्का देणार्या, सर्व उपकारक आणि अपकारक तंत्रज्ञानांशी शेवटी मनुष्यप्राण्याने असे ना तसे जुळवून घेतले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांचे अस्तित्व अर्थातच धोक्यात आले.
मी ए०आय० कडे कसे बघतो?
"उत्पादकता वाढवणारा एक जीवलग सखा" अशी माझी ए०आय० बद्दलची धारणा आहे. असा किंवा अशासारखा सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच ए०आय०चा जास्तीत लाभ मिळवून उत्कर्ष साधता येईल असे माझे स्पष्ट मत आहे.
समजा तुम्हाला अल्पमोली, आखुडशिंगी, बहुदुधी अशी गाय एखाद्याने आणून दिली तर ती तशी खरोखर आहे का हे अधूनमधून तपासणे ही किमान जबाबदारी मालक म्हणून तुम्ही पार पडणे आवश्यक आहे. तात्पर्य, नोकर कितीही विश्वासू असला तरी किमान देखरेख ही ठेवावीच लागते. ए०आय० बाबत पण नेमके तसेच आहे.
ए० आय० कडून १०० टक्के अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक जण ओशाळताना दिसतात. पण ए०आय०ची थापेबाजी आता खुपच कमी/नगण्य झाली आहे. पण तरीही शंका आल्यास किंवा पुरेशी काळजी घेण्यासाठी एकच प्रश्न एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला, भाषा बदलून एकापेक्षा अधिक ए०आय० ना विचारल्याने विश्वासार्ह उत्तरे मिळायची शक्यता वाढते. तसेच एका ए०आय०ने दिलेले उत्तर दुसर्या ए०आय०कडुन तपासून घेता येते.
बर्याच ए०आय० सेवा देणार्या कंपन्यांनी माफक सेवाशुल्कात भारतात सेवा देणे चालू केले आहे. ज्याना शक्य आहे त्यांनी अशा सशुल्क सेवांचा अवश्य फायदा उठवला पाहिजे. हे पैसे आपली "उत्पादकता" वाढल्याने नंतर लगेच वसूल होतात.
एक ताजे उदाहरण-
मी शेअर बाजारातला एक छोटा गुंतवणूकदार आहे. मला कुणाचे सल्ले न घेता गुंतवणूक करायला आवडते. पूर्णपणे स्वत:च्या भरवशावर शेअरबाजारात गुंतवणूक करताना दोन गोष्टींचे पथ्य पाळावे पाळावे लागते - एक म्हणजे समभागाचे तांत्रिक विश्लेषण (technical analysis) आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या उद्योगाचे पायाभूत विश्लेषण (fundamental analysis).
नैसर्गिक देणग्यांमुळे (पॅटर्न शोधणे) आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे तांत्रिक विश्लेषणामध्ये मी ए०आय०च्या मदतीने अभ्यास करून बर्यापैकी प्रावीण्य मिळवले, पण पायाभूत विश्लेषण करण्यात मी कमी पडत होतो. ही उणीव भरून काढायला मला ए०आय० ची होत असलेली मदत अनन्यसाधारण आहे.
वेगाने व्यवसायात प्रगती करणार्या कंपन्या ओळखणे हे माझ्यासारख्या अनेकांना आह्वानात्मक असते. सर्वच लोकाना कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यावरुन योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा कंपनीच्या भविष्याविषयी अंदाज बांधणे जमत नाही. साहजिकच या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मी ए० आय० लाच प्रश्न विचारला -
"Help me to find good low valued stocks which have promising future in Indian markets. Suggest some strategies."
मला त्याने समभागांचे संख्यात्मक (ऐतिहासिक कामगिरी) आणि गुणात्मक विश्लेषण कसे करायचे याबद्दल काही सूचना केल्या. यातील संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आज असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. पण समभागाच्या गुणात्मक विश्लेषणात त्याने - व्यवस्थापनाची गुणवत्ता (Management Quality), कंपनीची व्यवसायात स्पर्धात्मक आघाडी (Competitive Advantage), व्यवसायाचे भवितव्य (Growth Prospects) हे निकष तपासण्यास सांगितले. आता मुख्य समस्या अशी की माझ्या वैयक्तीक मर्यादांमुळे मला एखाद्या कंपनीचे असे ’गुणात्मक विश्लेषण’ अजुनही जमत नाही. त्यामुळे मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला -
"How to find out about management quality of a company?"
यावर जेमिनी या ए०आय०ने मला एक लांबलचक निकषांची यादी दिली. ती बघितल्यावर यात थापा नाहीत याची खात्री करण्यासाठी एका दुसर्या (डीपसिक) ए०आय०ला ही यादी तपासायला सांगितले आणि आवश्यक असेल तर भर टाकायला सांगितले. मला तात्काळ कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा ठरवणार्या निकषांची सुधारित आणि अंतिम यादी तयार करून मिळाली.
मी ग्रोक या ए०आय० ची सशुल्क सेवा वापरतो. वरील यादीतील निकष वापरून कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, तसेच व्यवसायाचे भवितव्य यावर पुन:पुन: माहिती मिळावी यासाठी ग्रोकमध्ये कायम स्वरूपी सूचना देता येतात. हा सर्व उद्योग केल्यावर मग प्रत्यक्ष चाचणीसाठी माझ्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ गडगडलेले आणि चांगली कामगिरी करत असलेले समभाग तपासले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. ग्रोकने दिलेली उत्तरे ~१००% अचूक होती.
माझ्या ऐकीव माहीतीनुसार प्रसिद्ध तत्त्वज्ञ विट्जेन्स्टाइन असे म्हणत असे - माणसाचे जग किती मोठे तर त्याच्या भाषेच्या वापरा एव्हढे. तसेच कितीही नाही म्हटले तरी माणसाची सुबत्ता त्याच्या घरातील नोकरचाकरांच्या संख्येवर, दारातील गाड्यांच्या संख्येवर ठरते. लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.
वाचने
9501
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
AI संदर्भात दोन मुद्दे
छान
ए.आय मुळे ज्ञान हे बर्याच
लेखाबद्दल अभिनंदन.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद! थोडा
माहितीपूर्ण लेख
श्री मारवा, प्रा० बिरूटे, कंजूस, कानडाऊ योगेशु, गा०पै०
In reply to श्री मारवा, प्रा० बिरूटे, कंजूस, कानडाऊ योगेशु, गा०पै० by युयुत्सु
माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल
In reply to माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल by कंजूस
ओके.मुद्दा समजला!
जाता जाता एक अनुभव
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
इथे म्हणजे शेअर मार्केट बद्दल
ए आय एवढं उत्तम असेल
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
तुम्ही म्हणता ते आज शंभर
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
श्री० गवि
In reply to श्री० गवि by युयुत्सु
स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
एआय मला पावसात जाऊ दे
बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे.ह्यातली कुर्हाड एआय असली तरी चालवणारे जे हात आहेत त्यांच्याकडे अजून एक जस्टिफिकेशन आहे. "अमुकतमुक गोष्टीला इतके पैसे सांगत होतात ना तुम्ही, इ त का वेळ लागेल म्हणून ताणत होतात तुम्ही, तुम्हाला जमणारच नाही ह्या थाटात होतात ना तुम्ही, बघा आता तेच काम एआय वापरुन फुकटात केले मी. एआय वापरुन दोन मिनिटात केले मी, एआय वापरुन घरबसल्या केले मी." हे 'मी' केले म्हणणार्यां सुमारांची सद्दी एआय संपवेल तेंव्हा परत बॅक टू बेसिक्स काय? का "एआय प्लीज खाजवशील काय?"In reply to एआय मला पावसात जाऊ दे by अभ्या..
अधिकाधिक खोल जाणाऱ्या
In reply to अधिकाधिक खोल जाणाऱ्या by गवि
अंहं
कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही.नाही गविराज, सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा. सोने मुबलक झाले तरी ते सोने आहे, परीस हा त्यानंतर फक्त दगड आहे.In reply to अंहं by अभ्या..
मिडास नही हू मैं
In reply to अंहं by अभ्या..
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर
In reply to सगळेच सोन्याचे झाल्यानंतर by गवि
अर्थात यामागे असे (कदाचित
In reply to अर्थात यामागे असे (कदाचित by गवि
अहाहा
मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.अॅक्चुअली. एक मस्त केस स्टडी आहे, आपल्याच पुण्या मुंबईच्या मध्ये घडलेली. राजा रविवर्म्याने मळवलीला स्टुडिओ टाकला. स्टुडिओ म्हणा प्रिंटिंग प्रेस म्हणा, नाव त्याचे चित्रशाळा. त्यासाठी पैसा वापरला तो मोठमोठ्या राजा रजवाड्यांची चित्रे रंगवून मिळालेला. चित्रे हिंदू देवतांची प्रामुख्याने, सुरुवातीला व्हिज्युलाईज करणार रविवर्मा, मॉडेल्स घेणार भारतीयच. रंगवणार तोच. रिप्रॉडक्शन साठी त्याचे आर्टवर्क बनवणार तोच. ते घेऊन त्याच्या प्रती छापणार जर्मन्स. विकणार सगळ्या हिंदुस्थानात. घेणार सगळी गरीब जनता ज्यांना रविवर्म्यासारख्याच थोर चित्रकरांची चित्रे विकत घेणे परवडत नव्हते. रविवर्म्यावर केस पडली अश्लीलता आणि नग्नतेच्या दर्शनाची. . आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....In reply to अहाहा by अभ्या..
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ? by मारवा
कळावे
यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहेधन्यवाद. कळावेIn reply to कळावे by अभ्या..
तुम्हाला सुद्धा धन्यवाद !
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
शिवाय जेवढे ज्ञान जालावर
In reply to शिवाय जेवढे ज्ञान जालावर by सोत्रि
एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस
In reply to एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस by सुबोध खरे
मानवी आयुष्य हे गणित नाही
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
गवि साहेब
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही
In reply to मी ए आय चा विरोधक मुळीच नाही by गवि
श्री० खरे यांनी विचारलेला
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
हम्म्म
In reply to हम्म्म by सोत्रि
खरोखर झोपेत असलेल्याच उठवता
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
है शाबास
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
=))
In reply to =)) by सोत्रि
अहो पण या तो तुम हमारे साथ हो या हमारे दुश्मन....
In reply to अहो पण या तो तुम हमारे साथ हो या हमारे दुश्मन.... by मारवा
शाप की वरदान हे टायटल अत्यंत चुकीचे आहे.
In reply to शाप की वरदान हे टायटल अत्यंत चुकीचे आहे. by मारवा
एक उदाहरण देतो आहे
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
तिच्याकडून सांत्वनाचे दोन
In reply to तिच्याकडून सांत्वनाचे दोन by युयुत्सु
वा!
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
सहमत आहे.
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं
ना०मू० काकांचा हटवादीपणा
कामात busy असल्याने प्रतिसाद
अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by राजेंद्र मेहेंदळे
या पेक्षा तुम्ही स्वतः का
In reply to या पेक्षा तुम्ही स्वतः का by गणेशा
खूपच fast प्रतिसाद लिहिला..
अत्यंत भंपक लेख!
श्री० राजेंद्र मेहेंदळे
श्री० टर्मीनेटर
ता०क०
"विद्या विनयेन शोभते"
In reply to "विद्या विनयेन शोभते" by धर्मराजमुटके
हेहे
In reply to हेहे by अभ्या..
विनय (पाठक) स्ट्रगलिंग अॅक्टर आहे अजूनही ?
"तुमच्या भावना पोचल्या पण
In reply to "तुमच्या भावना पोचल्या पण by टर्मीनेटर
इतकंच ना?
In reply to इतकंच ना? by युयुत्सु
इतकंच ना?
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
ही चर्चा व्यवस्थित पुढे
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
आणखी एक...
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची
In reply to तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची by टर्मीनेटर
श्री० टर्मिनेटर
In reply to श्री० टर्मिनेटर by युयुत्सु
सुबोध खरे या व्यक्तीच्या
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
तसेच
In reply to तसेच by युयुत्सु
दुरुस्ती
ताजी बातमी