Skip to main content

विचार

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 20/08/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २                               भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही.

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 19/08/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१
.
                   

सिंघम

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 16/08/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'सिंघम' पाहिला. मनाची आणि मेंदूची व्यवस्थित मशागत करून गेलो असल्याने मनोरंजनाचे पीक तरारुन आले. चांगल्याचा वाईटावर सणसणीत विजय याखेरीज कुठलेच बोधामृत नाही, कुठलाच मेसेज नाही, कुठल्याच गोष्टीचा धांडोळा-बिंडोळा घेण्याचा प्रयत्न नाही, कथेत कुठलाच वेगळेपणा नाही आणि तरीही 'सिंघम' पुरेपूर मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसमोर मनमोकळेपणाने रीता करतो. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी, एक अतिवाईट प्रवृत्तीचा गुंड-राजकारणी आणि त्यांच्यातला संघर्ष हेच चित्रपटाचे कथाबीज. शेवट अपेक्षेप्रमाणे गोड!

|| वैभव संपन्न गणेश ||

लेखक मदनबाण यांनी रविवार, 14/08/2011 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
|| वैभव संपन्न गणेश || १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो.

कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शनिवार, 13/08/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न झालो. चार ओळींची बातमी होती.फारशी कुणी दखल घेतली नव्हती.काळाच्या ओघात विसरला गेलेला एक माणूस. बातमी वाचली नसती तर कदाचित कळलंही नसतं. आहेत की नाहीत. काहीच आगापिछा नसलेला हा मनस्वी माणूस दोन-तीन वर्षं सेंट जॉर्जेस इस्पितळात वास्तव्य करून होता.आपल्या विकलांग देहातील व्याधींशी निकराने झुंजत होता.धुगधुगी अजून कायम होती. त्या अंधार्‍या खोलीतील त्यांच्या कॉटखाली पत्र्याच्या जाडजूड दोन-तीन ट्रंका होत्या.तीच त्यांची संपत्ती.काय होतं त्यात ? एकदा मला त्यांनी ती ट्रंक उघडून दाखवली.

गेटवे -मुखपृष्ठ आणि मनोगत

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शनिवार, 13/08/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे. पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्‍यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला.

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

श्रावणाच्या कविता १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 12/08/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल कविता करायचे योजिले आहे. त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.