Skip to main content

विचार

निरोप नाही, फक्त आभार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 15/07/2011 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्‍या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.

जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/07/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या. २६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो. पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते.

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन :

लेखक शाहिर यांनी सोमवार, 04/07/2011 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूक चित्रपट पासून ते आज वर मराठी कलाकारानी चित्रपटसृष्टी मध्ये मोठे योगदान दिले आहे ..अनेक नामवंत कलाकार , अभिनेते ,दिग्दर्शक आणि निर्माते आजवर तयार झाले आहेत ..तसेच हिंदी चित्रपटाची कर्मभूमी मुंबई हि देखील महाराष्ट्र मध्ये आहे ..परंतु आजवर तयार झालेल्या हिंदी चित्रपटांकडे नजर टाकली तर असे दिसून येते कि मराठी संस्कृती व मराठी व्यक्तिरेखा यांना कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे ..पूर्वी च्या चित्रपट मध्ये बिझिनेस मन कोण ?? तर सिंघानिया !! मेहता ..वर्मा ...कपूर ..शहा .. का? एखादा किर्लोस्कर ? गरवारे ?

कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 04/07/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्तं कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमकविता कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची कवितेची पाककृती ४: मधुशाला व रूपकक प्रणाली सामान्य माणसाने आसपास बघितलं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहात नाही. ती म्हणजे जग हे थोर थोर व्यक्तींनी भरलेलं आहे. जगात नावाजलेले बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या आहेत.

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.

मनाचं मंथन

लेखक स्वप्ना_तुषार यांनी शुक्रवार, 01/07/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ... का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं .. बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली. खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता. ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली.