Skip to main content

वाद

(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 16/06/2012 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता.

सांगे वडिलांची कीर्ती.....

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 16/05/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ.

|| चिरन्जीवी परशुराम ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 14/05/2012 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

पुन्हा सालं 'वैचारिक'

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 05/01/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर! त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो... कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे. थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो... ती एक अल्लड मुलगी- रेश्मा.