Skip to main content

समीक्षा

रावणाची सीता

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 20/06/2010 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते. तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही.

सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस

लेखक बट्ट्याबोळ यांनी रविवार, 20/06/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ... मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे. जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ... कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते. आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा. ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.

मनश्री

लेखक जयवी यांनी गुरुवार, 03/06/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो. तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात…..

ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 31/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला. येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

आजच backward रुपवेडं जग...

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 26/05/2010 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस