मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव

लेखनविषय:
लेखनप्रकार
फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात.

भयकथांचे रमाकांत आचरेकर : लवक्राफ्ट

लेखनविषय:
लेखनप्रकार
"तुम्हाला कसिनोत जाऊन जर रुले ( म्हणजे ते फिरणारे चक्र) खेळायचे असेल तर तुम्हाला सुतारकाम शिकून फायदा नाही, तुम्हाला गणित शिकावे लागेल" - गणित तज्ञ् तालेब एकदा क्रिकेट मधील जाणकारांच्या पार्टीत रमाकांत आचरेकर ह्यांच्या नावाचा उल्लेख आला. तिथे सलील अंकोला होता. त्याने सहज म्हटले कि ज्या माणसाने आयुषांत कधीही एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्या व्यक्तीने अनेक महान खेळाडू घडवले ह्यावरून कोचिंग आणि प्रत्यक्ष खेळ हि एक दोन वेगळी क्षेत्रे आहेत असे लक्षांत येते. मला क्रिकेट विशेष आवडत नसले तरी अंकोलाचे शब्द मनात घर करून गेले.

चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अ‍ॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता. दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.

मीनाकुमारी की बेटी ?

लेखनविषय:

मीनाकुमारी की बेटी?

 मीनाकुमारी की बेटी? एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी.

बागी ( वांगी ) ३ परीक्षण

लेखनविषय:
लेखनप्रकार
थोडक्यात :- पहिला इंटर्वल पर्यन्त भाग साऊथ च्या तडाका चा कॉपी आहे ,पण मूळ चित्रपट सरस आहे ,दुसरा भाग फक्त टायगर श्रॉफ ची हाणामारी आहे गरिबांचा रेम्बो टायगर ने जेवढे जमेल तेवढ्या उडया मारल्या ,मारधाड मध्ये त्याला सौमर साल्ट असे काहीतरी म्हणतात आणि गाणे चालू असताना उड्या मारल्या कि डान्स म्हणतात तडकानुसार मोठा भाऊ अनुकंपा तत्वाने इन्स्पेक्टर बनतो पण दरवेळी लहान भाऊ येऊन त्याचे काम करतो ,दोन बहिणी ,त्यांच्याशी भांडण मग मुलगी बघायला त्यांच्याच घरात जात सगळे सारखे आहे पण मूळ चित्रपट ज्यात तमाना भाटिया आहे तो जास्त नेत्रसुखद आहे तडाका मध्ये भित्रा भाऊ पण शेवटी एकशन करतो इकडे ते

आधुनिक निष्काम कर्मयोग

लेखनविषय:
लेखनप्रकार
                                  आधुनिक निष्काम कर्मयोग.   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।   मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४७  जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये.

मतदार हुशार झालेत का ?

मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने... लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

शिवजयंतीच्या निमित्ताने...

लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

 शिवजयंती उत्सवाच्या पर्वणीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा लष्करी अधिकार्‍यांच्या नजरेतून सादर करण्यात विलक्षण आनंद होतो आहे. महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फत्ते केलेल्या अनेक कारवायातून जगातील लष्करी इतिहासात त्यांचे उत्तुंग व विराट व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यात शायिस्ताखानाला खतम करायची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अग्रणी आहे.

ग्रंथ परिचय - या सम हा. लेखक - मेजर जनरल शशिकांत पित्रे

लेखनविषय:
लेखनप्रकार

या सम हा - ग्रंथ परिचय

बाह्यांग परिचय - मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावाच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे. ३३५ पाने असलेल्या या ग्रंथावर संपादकीय हात फिरवण्याचे काम आनंद हर्डीकर यांनी केले आहे. भूमिका स्पष्ट करताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणतात,...

चित्रपट परीक्षण/रिव्यू : 'Tanhaji: The Unsung Warrior'

लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो.
Subscribe to समीक्षा