Skip to main content

प्रतिभा

म.न.पा.स एक पत्र

लेखक चाफा
Published on सोमवार, 07/11/2011
म.न.पा.स एक पत्र प्रती म.न.पा., सादर प्रणाम, सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्यावर होणारे कामचुकारपणाचे आरोप रोज ऐकतो. ते मला फारसे रुचत नसल्याने आपणास आपल्या दिव्य कार्याची जाणीव करून देण्यासाठी मुद्दाम हा पत्रप्रपंच करत आहे. सर्वप्रथम मी वैयक्तिकरीत्या आपले आभार मानू इच्छितो कारण केवळ आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे माझे दंतवैद्याकडे खर्ची पडू शकत असलेले रु. २०० मात्र बचत झाले.

Acacia

Published on शनीवार, 05/11/2011
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष. डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता

लेखक gaikiakash
Published on शनीवार, 05/11/2011
नमस्कार मंडळी- १४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.

बंड्याची दिवाळी

लेखक अरुंधती
Published on शनीवार, 29/10/2011
आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" - मकरंद साठे

लेखक yeda
Published on बुधवार, 19/10/2011
आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे. या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.