एवढं सोपं नसतं आपल्या माणसाला दुस-याचं होताना पहाणं आणि तरीही त्याचं आपलंपण अबाधित ठेवणं..
त्यासाठी मत्सर, असूया, राग अशा अनंत फण्यांनी डसू पहाणा-या कालियाला सतत ठेचावं लागतं..
सहनशीलतेचा गोवर्धन उचलावा लागतो..
जिरवावे लागतात कढ अश्रूंचे, आतल्या आत आणि जगाला दर्शन होतं ते सुहास्यरुपाचं...
हात बांधलेले असतात मायेनं, तरी तडफड धडपड होतेच मनाची, उन्मळून पडतात रुढी आणि परंपरांंचे वृक्ष आणि मोकळे होतात अपेक्षांचे आणि हक्कांंचे शापित गंधर्व..
अखंड पुरवत रहावं लागतं प्रेमाचं वस्त्र, उघड्या पडणा-या नात्याची लाज राखण्यासाठी..
अनया,
खळखळणा-या धारेच्या खिजगणतीतही नसलेलं आपलं अस्तित्व स्विकारण्याचं बळ कुठू