Skip to main content

प्रकटन

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

अर्धा कप दुध...

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, "अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. आई,लवकर उठलीस, चहा घेणार? नको ,तुला उशीर होतोय. बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. " आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय. काय झालं. काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.

निसर्ग सृष्टीचं सादरीकरण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले. लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही. आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो. मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो.

संगीत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

लागट बोलणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.