Skip to main content

प्रकटन

चाळिसाव्या कोसावर

लेखक रामदास यांनी रविवार, 08/10/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल. आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं. घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत. मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो.

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

मला आलेला अनुभव -२

लेखक ओरायन यांनी सोमवार, 02/10/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला अनुभव -२ ह्यात मी छोटे छोटे दोन अनुभव एकत्र केले आहेत. कारण प्रत्येकासाठी ऐक ऐक वेगळा धागा काढणे शक्य नाही व ते व्यवहार्यदेखील नाही. आपण कधी पूर्णपणे आपल्यावरील ताबा गमावला आहे का ? म्हणजे कधी पूर्णपणे वेळेस्वाधीन झाला आहेत का ? ' वेळ आली पण काळ आला नाही' या उक्तीचा तुम्हाला अनुभव आला आहे का ? मला दोन वेळेस आला आहे. १. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. माझी 'पोहायला शिकण्याची' तयारी चालू झाली होती. तसे बघायला गेलो तर हे पोहायला शिकण्याचे वय उशीराच झाले. मात्र त्याचा एक फायदा (कि 'तोटा' ?) म्हणजे आई वडिलांचे आपल्यावर वाढलेला विश्वास. काळजी करण्याचे प्रमाण कमी.

संघर्ष : भाग ०५ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 30/09/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०४ पासून पुढे.. काही वेळानंतर.. (वेळ : संध्याकाळी ६ वा. स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.) सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती. सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं.

भ्रम

लेखक nishapari यांनी सोमवार, 25/09/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराच दिवसांपूर्वी मला अशोक ह्याच शहरात असल्याचं समजलं होतं . तेव्हापासून आज भेटेन उद्या भेटेन अशी चालढकल चालली होती , नक्की दिवस ठरत नव्हता . तोही बेटा बिझी . त्यामुळे भेट पुढे पुढे जात होती . अशोक माझा लहानपणीचा मित्र . माझ्याहून 2 वर्षांनी मोठा होता . काही वर्षं आम्ही शेजारी राहत होतो , त्यानंतर त्याच्या वडिलांची बदली झाली आणि तो बंगलोरला गेला , मी माझ्या कॉलेजच्या नवलाईत हरवून गेलो , तो त्याच्या शिक्षणात . फारसा संपर्क असा ठेवला गेला नाही , कधीमधी फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच . पुढे त्याने सायकॉलॉजी विषय निवडला , मी कॉमर्स मधल्या डिग्र्यांच्या मागे लागलो .

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

स्पर्शाला पारखा... पुरुष

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 23/09/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं. चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही.

चल, घरी चल .....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 22/09/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

राजांचे मावळे - १

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 21/09/2017 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
घोडखिंड : खाशाबा खाशाबाला वाटायला लागलं की छातीचा भाता आता फुटतो की काय, त्याला आठवतच नव्हतं की पळायला सुरुवात करून किती तास झाले होते ते. चन्द्र काही कामाचा नव्हता कारण पावसाने धिंगाणा चालवला होता. हातातले पलिते विझत होते ते परत पेटवायला लागत होते. भाला पकडून पकडून हाताची बोट सरळ व्हायची विसरली होती, ढालेने पाठ धरली होती नि तलवार कमरेला खुपत होती. हा सगळा विचार मनात चालू असतानाच बाजींनी थांबण्याचा संकेत दिला. राजांच्या पालखीचे भोई दमले होते.