मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

कर्केचा राहू

शुचि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच.

महालक्ष्मी दर्शन

लीलाधर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजितै! शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!! यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः !! मंडळी नवरात्रात माझ्या घरी अशी महालक्ष्मीची स्थापना करुन तिचे समोर घागरी फुंकल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महाल्क्ष्मी बरोबर शंकर भगवान कशाला आहेत ? त्याचे उत्तर असे की, कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानीमाता यांच्या शिरस्थानी शिवलिंग धारण करुन त्या विराजमान झाल्या आहेत... सो महालक्ष्मी ज्यावेळेस पूजतात त्यावेळेस शंकर भगवानांची देखील स्थापना करुन त्यांची पूजा केली जाते.

कताई शास्त्र ७

बापू मामा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कताई शास्त्रात गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुताचे नंबरिंग अजूनही भारतात FPS system मध्येच जास्त प्रचलित आहे. त्याला ईंग्लिश नंबरिंग सिस्टीम असे म्हणतात व त्याचे युनिट काउंट अथवा ईंग्लिश नंबर हे आहे ( Ne) . जर ८४० यार्ड सुताचे वजन १ पौंड (४५४.५ ग्राम) भरले तर त्या सुतास १ काउंटचे ( 1 Ne or 1s) सुत म्हणतात. (सुता आधीच्या प्रक्रियेतील मालास हँक (Hank) असे म्हणतात, व्याख्या तिच ) याच प्रमाणे २० काउंट चे सुत म्हणजे २० x ८४० एवढ्या लांबीचे, वजनात १ पौंड भरणारे सुत, अथवा ३४ काउंट चे सुत म्हणजे ३४ x ८४० एवढ्या लांबीचे वजनात १ पौंड भरणारे सुत.

कबुतरे............

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कबुतरांचा उपयोग. असाही..... बर्‍याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली.

सर्वोच्च झेप

श्रीरंग_जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.

जहालभाषाचिकित्सक

राजेश घासकडवी ·
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

शिवरायांची शस्त्रे व संभाजी महाराजांचे साहित्य

मालोजीराव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.

कताई शास्त्र ७

बापू मामा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.