मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

बिरादरीची माणसं - मनोहर काका

लोकेश तमगीरे ·
लेखनप्रकार
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो…… कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो…… जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती. चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो ….. हो अगदी बरोबर ओळखलं..."डॉ.

|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

मनो ·
लेखनप्रकार
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील. या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो.

आणि बुद्ध हसला !

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली. कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।" ७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं.

उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा

मराठी कथालेखक ·
लेखनविषय:
मित्रहो.. अलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो. sleep tea या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.

आडनावे व इतिहास

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आडनावे व इतिहास ----------------- पेशवे दरबारी पटवर्धन नावाचा एक तरुण व शूर सरदार होता पेशव्यानी एक मोहीम काढली त्यात हा सामील झाला त्या काळात कुटुंबास बरोबर घेण्याची अनुमती असल्याने त्याने आपल्या भार्येस पण समवेत घेतले रात्रीची वेळ होती पेशव्यांच्या छावणीवर मोगलांची टोळधाड तुटून पडली हातघाईची चकमक झाली मोगलांनी लूट केली व विद्युत वेगाने ते पसार झाले ह्या चकमकीत पटवर्धन सरदार धारातीर्थी पडला बाईने आक्रोश करत मदती साठी टाहो फोडला - घोरपडे नावाच्या सरदाराने तो ऐकलं अंधार होता धुमश्चक्री चालू होती घोरपडेंनी त्या स्त्रीस खूण करत व आधार देत घोड्यावर मागे बसवले शांतता झाली अन घोरपडे नी

आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे

हेमंत ववले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम. या मध्ये एक रचना येते ती अशी सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते ! याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे.

उधर कूछ देखोगे तो कहना नही...

अभिजीत राजवाडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कला आणि अध्यात्म यांचा पूर्वीपासून सबंध आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना जसा दैवी साक्षात्कार झाला होऊन देवाचे वरदान लाभले होते. त्याबाबतची प्रचलित कथा अशी आहे कि लहानपणी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या मामांकडून (उस्ताद अलिबक्ष खान) सनईची तालिम घेत असत तेंव्हा ते गंगा नदीच्या काठावरील एका हवेली मध्ये रियाज करीत असत. एके दिवशी मामांची तब्येत ठीक नसल्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना दुसऱ्या खोलीमध्ये रियाझ करण्यास सांगितले. त्यांच्या रियाजाची खोली त्या हवेलीच्या चौथ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीच्या एका बाजूला खिडकी जी गंगेकडे उघडत होती आणि त्या खिडकीच्या विरुद्ध दिशेला पायऱ्या होत्या.

एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

सजन ·
लेखनविषय:
पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर. भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच.

संक्रांतीला कल्पकतेचं वाण

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात. यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.!

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

मनो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.