Skip to main content

माध्यमवेध

बंदपीठाचा धसका.

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 19/11/2008 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात. अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले? दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?

काम

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 15/11/2008 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....

चेंज ऑफ गार्ड

लेखक विकास यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाईम्स आणि सामना मधे वाचलेल्या बातम्यांप्रमाणे बाळासाहेब ठाकर्‍यांनी माहीती असलेली बातमी, "उद्धवच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली असताना मला भेटायला येण्याचे काय प्रयोजन ? " असे म्हणत काही प्रमाणात अधिकृत केली. जो पर्यंत शिवसेना हा किमान महाराष्ट्रासाठी प्रबळ पक्ष आहे, तो पर्यंत त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर सहज पडू शकतो. त्यामुळेच या घटनेचे महत्व.

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

लेखक इनोबा म्हणे यांनी सोमवार, 27/10/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी इथे वाचा. या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत. झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.

आजतकचा कौल - आवाहन

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 23/10/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे. त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्‍याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !" चला तर मग ..

रेल्वे भरती ची माहिती हवी.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 22/10/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझ्या एका सहकार्‍याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे. माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.) त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/09/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे.

संवेदना

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 22/09/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?' 'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय.

टीव्ही वाहिन्यांतील पाहिलेले बदल

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.