पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'

लेखनविषय:
पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे. या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे पुणेरी मिसळची 'सेंच्युरी' पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ.

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखनविषय:
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

गुढीपाडवा

लेखनप्रकार
मंचर मध्ये काल गुढीपाडवा घरोघरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारून उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षानिमित्त शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांत हजारो आंबेगावकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले. शहर भर रस्तोरस्ती भव्य भगवे झेंडे फडकावले होते हिंदू नववर्षारंभानिमित्त बजरंग दल आणि दुर्गावाहिनी तर्फे आज सायंकाळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा काढण्यात आली . स्वागतयात्रांच्या अग्रभागी गुढी व भगवे झेंडेधारी होते.

अभिषेक, आमीर खान आणि ऐश्‍वर्या मराठी चित्रपटामध्ये !

लेखनविषय:
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले ! अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे. खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..! पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल.

पुस्तके ..अर्थ मनाचा १

येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

पुस्तके ..अर्थ मनाचा १

येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल. १. पार्टनर .. व.पु. काळे पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)

लेखनप्रकार
पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १) दुसरे कोकण...पण अशांत! आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.
Subscribe to माध्यमवेध