Skip to main content

लेख

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

कुर्‍हाडीचा दांडा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/02/2011 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्‍हाडीचा दांडा काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली. "महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे." खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली.

कोडी

लेखक तिमा यांनी रविवार, 20/02/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते. एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला.

एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 14/02/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू..) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार?

शुभ्लग्न

लेखक साबुदाणा खिचडी यांनी रविवार, 13/02/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
शुभलग्न व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .

कामापुरता नर

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.

अक्षरलेखन - काही टिप्स

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 07/02/2011 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मागच्या एका धाग्यात बर्‍याच जणांनी माझ्या अक्षराचे कौतूक केले होते अन मी 'अक्षर लेखन कसे सुधारावे' याबाबत लेखही लिहीणार होतो. बर्‍याच दिवसांपासून लिहीन लिहीन म्हणत होतो पण वेळ नसल्याने हा लेख लिहीला नव्हता. आता माझे अक्षर फारच छान आहे अशातला भाग नाही. कदाचीत हा लेख माझ्या जुन्या स्मृतींना उजाळा असूही शकतो. लहाणपणाचे माझे अक्षर कसे होते याबाबत मला आठवत नाही. माझ्या लक्षात माझी इयत्ता ५ वी पुढील वर्षे आहेत. इयत्ता ४ थी पर्यंत माझ्या वेळी पाटी अन पेन्सील असायची.

भटकंती

लेखक फास्टरफेणे यांनी रविवार, 06/02/2011 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
२४ जानेवारीला बायको माहेरी गेली आणि गेलं १ वर्ष झोपी गेलेला माझ्यातला भटक्या जागा झाला. २६ जानेवारीची सुट्टी कुठे सत्कारणी लावावी हा प्रश्न नव्हताच, उत्तर तयार होतं - वीर धरण. मागच्या वर्षी सकाळमधे "बार हेडेड गूज"ची बातमी वाचून एकदा वीर धरणाची वारी झाली होती. पण तेव्हा फक्त पाच-सहाच बदकं दिसली होती. तेव्हाच ठरवलं होतं, परत यायचं... पहाटे ५ ला निघायचं ठरवून ८ वाजता निघालो. एकटाच. पाठीला सॅक, सॅकमधे पाण्याची बाटली आणि कॅमेरा (कॅनन SX 110). हडपसर ते सासवड अंतर जेमतेम ३०-४० मिनीटांत कापलं. वाटेत बरेच पक्षी दिसत होते.

रिक्षावाले

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 04/02/2011 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये. माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो.