Skip to main content

लेख

पंगा

प्रास यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभवसम्रुद्ध मात्र नक्की करून गेलं. आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीण, ती तपासून घेण, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढण वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी ब्याड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणण असंच.

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू

रणजित चितळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

चिंतामणी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

लेखनसीमा

निशदे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ? " दिसामाजी काहीतरी.....

इनोद (अर्थातच पी जे, चोरलेले इ. इ.)

चिगो यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उगाच पाचकळपणा... ______________________ एक बाई दुसर्‍या बाईला विचारले प.बा.:तु हा गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? दु.बा: चुलत भावाने आणला.. -------------------------------- गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल? दुकानदारः ७ रुपये.. गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या... ------------------------------- जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी..

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

छोटा डॉन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

कलियुग

मुक्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"कधी आल्या आत्याबाई ममईवरुन?" "रातीच आले" "बर्‍या खुशाल का?" "हां... तुम्ही खुशाल तं आम्हीबी खुशाल" "सकाळपसुन बसल्यात इथं वट्ट्यावर... उन्हाला.." "हां..मोकार कळांगान सुटलय रातपसुन. पार रक्त गोठलय" "हां ना. पावसाळ्यात ऊन आन हिवाळ्यात पाऊस. कलियुग.. दुसरं काय?" "ह्म्म्म... " "ममैला कोनकोने मंग?" "डाक्तर नवरा बायकु. आन एक पोरगी" " पोरगी येकुलती येके का?" "नाही. एक पोरगा हायेना. पुण्यालाय कालेजात" "पोरगी लहाने का?" "नाही. मोठीये. लग्न झाल् त तीच" "मंग?" "आली परत माहेरी" "कम्हुन" "तीचा नवरा गेला. पळुन...." "अरे पांडुरंगा....दुसरी केली का?" "नाही.

माणुस घडवलेली इव्हेंट

विनायक पाचलग यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल .

मंदिरे @ बलसाणे.

हेम यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
या आधीचा भाग इथे वाचा. ...भामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्‍यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते.

नाटकवाला

डॉ.श्रीराम दिवटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली.