Skip to main content

लेख

डायरी

लेखक चेतन०२०१२ यांनी शुक्रवार, 02/03/2018 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे कस काय शक्य आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत? But today it’s been 10 years. म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे. माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित. अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes. मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते. मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय.

तंदुरुस्त का नादुरुस्त ? : भाग १

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/03/2018 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) प्रास्ताविक माझी या आधीची आरोग्य-लेखमाला चालू असताना मित्रवर्य ‘अनिंद्य’ यांनी या विषयावर लिहिण्याची सूचना केली. मग मी त्यावर विचार केला. आधी वाटले, की ते म्हणताहेत तर लिहून काढू एक लेख लगेच. पण, जसा मी वाचन करीत या विषयाच्या अंतरंगात शिरलो तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली. या विषयाची व्याप्ती नक्कीच मोठी आहे. त्याला जाणूनबुजून एका लेखात कोंबून बसवणे हे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचा समग्र वृत्तांतच वाचकांसमोर मांडवा असे ठरवले व त्यातूनच या लेखमालेचा जन्म होत आहे.

भाषा अहिराणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे. त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती.

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/03/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 26/02/2018 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली! जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही.

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १. मराठी भाषेत संस्कृत भाषेतून घेतलेले शेकडो शब्द आणि तशीच वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत गेलेला असतो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी एकूण सहा भागांमधून सदस्यांपुढे ठेवणार आहे. प्रथम शब्द किंवा वचन, नंतर त्याचा स्रोत आणि अखेरीस सरल अर्थ असे ह्या लिखाणाचे स्वरूप आहे. ह्या लेखनाचे एकूण सहा भाग ह्यापूर्वी 'उपक्रम'मध्ये प्रकाशित केले होते आणि तेथे सदस्यांना ते आवडल्याचे दिसले.

शेवटचा उपाय...

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा उपाय ... मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता.