२६ जुलै २०१० हा कारगिलच्या युद्धातील विजयाचा ११वा गौरवदिन. गेल्या वर्षी या विजयाचा दहावा गौरवदिन होता. त्यात आपल्या सध्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकीबद्दल खालील लेख माझ्या वाचनात आला. लेखक आहेत 'हिंदुस्तान टाइम्स'चे श्री नीलेश मिश्रा. त्यांची जन्मपत्री मला माहीत नाहीं, म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते झुकतात, कुठल्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे वगैरे.
इथे लिहिले आहे ते खरे आहे कीं नाहीं याचीही मला कल्पना नाहीं. पण 'हिंदुस्तान टाइम्स'सारखे जबाबदार वृत्तपत्र खोडसाळ वृत्ते छापेल असे वाटत नाहीं.
३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.
श्री. तरुण विजय यांचे टाइम्स ऑफ इंडियावरील ब्लॉग्ज हल्ली वाचनात आले व मला आवडले.
श्री. तरुण विजय यांचा परिचय करून दिला जातो तो असा: सिंधु नदीवरची झुळूक, कैलास पर्वतावरचा शिवमंत्र, चुशुलमधील सफर, गोठलेल्या झंस्कारवर चादर पांघरून मारलेली चक्कर. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे श्री तरुण विजय!
ते श्यामाप्रसाद मुखर्जी रीसर्च फाऊंडेशनचे संचालक असून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.