सरडा चेला तर नेता गुरू

लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास ✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय ✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या ✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं! ✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!” ✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!” ✪ “Soak the pressure and be there!” ✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!

|| उत्कीर्ण विनायक ||

लेखनविषय:
लेखनप्रकार
"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल. तो : उत्कीर्ण ! "काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!" तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती" कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण Praf001a अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

लेखनविषय:
लेखनप्रकार
*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय अ जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही.

कृष्णाच्या गोष्टी-९

लेखनविषय:
लेखनप्रकार
***धर्मराज्य हरपले युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

कायगाव टोका -प्रवरासंगम

लेखनविषय:
लेखनप्रकार
A भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः। सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥ संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली। तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥ मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्। शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥ मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः। तालमात्रमथोत्प्

कृष्णाच्या गोष्टी-८

लेखनविषय:
लेखनप्रकार
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

लेखनविषय:
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

कृष्णाच्या गोष्टी-७

लेखनविषय:
लेखनप्रकार
*स्यमंतक मणी रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.
Subscribe to आस्वाद