Skip to main content

अनुभव

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ३. इंदापूर ते पंढरपूर

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/12/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ३. इंदापूर ते पंढरपूर १४ नोव्हेंबरची पहाट. आज बाल दिन आहे आणि मला पहिल्या बाल गृहात जायचं आहे. आज ह्या सायकल प्रवासाचा तिसरा दिवस आहे! त्यामुळे शरीर काहीसं लयीत आलं आहे. पहाटेच्या थंडीत इंदापूर महाविद्यालयातून निघालो. सकाळी मॉर्निंग वॉक घेणा-यांना रस्ता विचारत पुढे निघालो. कालच्या हायवेच्या तुलनेत इंदापूर- अकलूज रस्ता अगदी शांत वाटला! आता खरंच वाटतंय की, मी ग्रामीण भागात आलोय. लवकरच पुणे जिल्हा संपला. अकलूजला म्हणजे आर्चीच्या गावात पहिला ब्रेक घेतला!

रम्य ही स्वर्गाहून लंका

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी सोमवार, 03/12/2018 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो. श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 29/11/2018 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

मी आज अनुभवलेला 'ठग ऑफ हिंदुस्थान'

लेखक कलम यांनी सोमवार, 26/11/2018 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझं ऑफिस घरापासून २० किमी वर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला स्कूटर वरून ४५ मिनिटं लागतात. तर आज सोमवार असल्यानं अगदी जीवावर येऊन उठून, आवरून सकाळी ऑफिसला माझ्या स्कूटर वरून येत होते.ऑफसच्या रस्त्यावर एक सिग्नल लागतो आणि तो पार केला तर जवळपास ५ किमी पर्यंत जंगलासारखा एअर फोर्स चा भाग आहे जिथं आजूबाजूला काहीच नाही. तर त्या सिग्नल वरून १ कमी पुढं पर्यंत पोचले असताना दोन माणसं त्यांच्या दुचाकीवरून आली आणि माझ्या स्कूटर च्या मागच्या चाकाकडं खुणा करून काहीतरी सांगू लागली.

गावपातळीवरची एक अफलातुन राजकारणी खेळी

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 23/11/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका विधानसभेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत जवळुन पाहीलेला किस्स्सा. अमुक अमुक दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी घड्याळात दुपारचे २-४५ झाले होते तेव्हा एक स्त्री तिचा उम्देवारी अर्ज दाखल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक असल्याने तिच्यासोबत ४ सहकार्यांना घेऊन आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिथे असलेले अधिकारी आधी चरफडले पण वरुन आदेश होते कि ३ वाजेपर्यंत येणारे अर्ज व्यवथित पडताळणी करुन एक तर जमा करुन घेणे अथवा परत पाठवणे. त्यानुसार अधिकार्यांनी अर्जाची छाननी करण्यास सुरवात केली.

देवाची दुश्मन

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 23/11/2018 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

देवाची दुश्मन

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 23/11/2018 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 11/11/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.

नवी सायकल आणि पहिली सेंच्युरी

लेखक mayu4u यांनी गुरुवार, 08/11/2018 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पहिली सायकल घेतली तेव्हाचं हे लेखन... अलीकडेच नवीन सायकल घेतली आणि पहिल्यांदाच १०० किमी ची राईड मारली. या अनुभवाविषयी लिहिण्यासाठी सरपंचांनी सुचवलं, तेव्हा मिपाकरांच्या "सायकल सायकल" या कायप्पा समूहावर केलेलं लेखन) श्री मामा प्रसन्न आनंदरावांच्या आशीर्वादाने, सर्पंचांच्या सूचनेनुसार, सर पाध्ये सर यांच्या सल्ल्याने आणि ग्रुपातल्या सर्वांच्या प्रेरणेने आज पहिली सेंच्युरी झाली. या शतकाचं श्रेय सम्पूर्णपणे या ग्रुप चं आहे.