Skip to main content

अनुभव

मुंबई धडे - २

Published on 22/12/2018 - 08:44 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंबई धडे - २ मागच्या लेखात मी चुकून २००५ साली मुंबई ला आल्याचा उल्लेख केला आहे . मी २००६ साली कोकणातून मुंबई मध्ये आले . जूनच्या मध्यावर साधारण क्लास सुरु झाला. मुंबई लोकलची, गर्दीची नि पावसाची हळूहळू ओळख आणि सवय व्हायला लागली. आधी कितीतरी वेळा लोकल मधून होणाऱ्या चोऱ्यांविषयी ऐकलं होत त्यामुळे जाता येता ओढणी गळ्याभोवती गोल फिरवून घ्यायचे. म्हणजे कुणी गळ्यातली चेन ओढायला नको कि ओढणी कुठे अडकायला नको. लहानपणापासून एकटीने प्रवास केला असल्याने स्वतःची नि स्वतःच्या सामानाची काळजी घेण्यास मी समर्थ होते. पण लोकल माहितीची नाही त्यामुळे एक अजाणता भीती मनात होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3376

मुंबईचे धडे - १

Published on 18/12/2018 - 08:16 प्रकाशित मुखपृष्ठ
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9324

अडनिडी मुलं-३

Published on 17/12/2018 - 22:50 प्रकाशित मुखपृष्ठ
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 25572