Skip to main content

अनुभव

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/05/2018 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

कोहम्

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात.

हवाईदलातील सेवेतील रंजक रेल्वे प्रवास! भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/05/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात.

म.मु., ट्रेन आणि पप्पू यादव!

लेखक चायवाली यांनी शनिवार, 05/05/2018 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. साधारण ७-८ वर्षांपूर्वीची असेल. पण, त्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे म.मु. काय आहे! तर म.मु. म्हणजे मराठी/मध्यमवर्गीय मुली. तर साधारण ७-८ वर्षांपूर्वी आम्ही (म्हणजे अस्मादिक आणि आमची एक घनिष्ठ मैत्रीण - म्हणजेच म.मु.) कानपूरला जाण्यासाठी कुर्ल्याला ट्रेन मध्ये चढलो. (हो हो, असा उलटा प्रवास पण करतात लोक.) आधीच पुणे ते मुंबई असा ऐन उन्हाळ्यातला एक अत्यंत घामेजलेला प्रवास करून स्टेशनला पोहोचलो होतो. त्यात उशीर इतका झाला होता, की मुंबईतल्या त्या भर दुपारी, हातात चार सुटकेसेस नाचवत DDLJ style ट्रेन पकडावी लागली.

वर्तुळ!

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/05/2018 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या! अारं किती दिवसानं दिसायलास! आनि हिकडं कुटं रे? सुन्या तू पन बदललास लेका! जाड झालाईस चांगलाच! व्हय लेका. आरं पन हितं कुटं बोलत बस्लोय आपन,चल च्या घ्यीऊया.निवांत बोलाय यिल! चा मस्त हाय रे हितला! बर नित्या सांगितल न्हाईस हिकडं कुटं आल्तास? आरे सुन्या ह्या पलिकडच्या कारखान्यात कामाला हाय मी! वर्ष झालं. हा हा बरोबर! मीच हिकडं लई दिवसानं आलो न्हाईतर आधीच गाट पडली असती. ते न्हवं आयटीआय नंतर तू कुटं दिसलाच न्हाईस.काय संपर्क न्हाई.आनि आज तीन वर्षांनं गाट पडली आपली.कुटं हुतास इतकी वर्ष? आरं हुतो हितंच.डिप्लोमा केला लेका! पॉलटेक्निकचा! काय सांगतोस? म्हंजे आता इंजिनेर झालास म्हन की!

मला भेटलेले रुग्ण - १५

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 27/04/2018 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/04/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो " काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.

माझं आजोळ बेळगाव

लेखक स्वप्निल रेडकर यांनी रविवार, 22/04/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

केळीचे सुकले बाग ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 18/04/2018 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.