Skip to main content

अनुभव

मुंबईचे धडे - ४

लेखक मालविका यांनी सोमवार, 18/11/2019 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे धडे - ४ मुंबईचे धडे - १ http://misalpav.com/node/43794 मुंबईचे धडे - २ http://misalpav.com/node/43805 मुंबईचे धडे - ३ http://misalpav.com/node/43868 हळू हळू मुंबई मध्ये रुळायला सुरवात झाली. नोकरी मिळाली होती. ठाण्याला राहून विक्रोळीला जायचे होते. पण कंपनीची बस असल्याने ट्रेनच्या गर्दीचा त्रास नाही झाला. एकूणच रिलॅक्स होत सगळं. ठाणे - दादर - पार्ले प्रवास अंगवळणी पडला.

दिवाळी सेलिब्रेशन !!!

लेखक मालविका यांनी रविवार, 03/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सेलिब्रेशन !!! साधारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मी भाऊबीजेला दादाकडे गेले होते. दादा, माझ्या चुलत बहिणीला आणि तिच्या दोन मुलांना पण घेऊन आला. बरेच दिवसांनी घरात खूप जण जमलो होतो. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एक एक भाऊ येत होता ओवाळणी होत होती, गोडाधोडाचं जेवण जेवून भेटीगाठी होऊन तृप्त होत होतो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माहित नाही, आज जेवण बाहेरून मागावूया म्हणून ठरलं. आता दादाच घर हे मुंबई गोवा हायवेला जरी असल तरी आहे ते खेडेगावचं. शहरात झोमॅटो नि स्वीगी वरून ऑर्डर करतात तसं काही शक्य नाही. गावात जरा बरं असं हॉटेलदेखील नाही.

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

बनाबाई..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 31/10/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
बनाबाई आमच्याकडे कधीपासून काम करते ते कोणीच नक्की सांगू शकणार नाही. मी तान्हा असताना माझे तेलपाणी तिनेच केले आहे. आणि त्याही आधीपासून ती आमच्याकडे आहे. म्हणजे साधारण पस्तीस-छत्तीस वर्ष झाले असतील. बनाबाई आज ऐंशीच्या पुढेमागे असेल. पाठीच्या कण्याला नैसर्गिक बाक आला आहे. हालचाली मंदावल्या आहे. पण अजूनही आमच्यासकट गल्लीतल्या ८-१० घरात काम करते. तिला कुठे-कुठे काम करते हे विचारल्यावर ती सांगेल, "दोन गुजरात्याचे घर हायेत, एक मारवाड्याचं हाय..मंग डॉक्टरींन बाईच्या घरी जातो. अन समोर जोशी बाईचं घर हाय तिथं पन जातो.." इतक्या वर्षात ह्या प्रत्येक घरात कितीतरी बदल घडलेत.

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

लेखक महामाया यांनी शनिवार, 26/10/2019 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर... एस-९ याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला... दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती... स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

कलाक्षेत्र च्या आठवणी

लेखक मृणमय यांनी शुक्रवार, 25/10/2019 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भागाला सिकन मटन फिस पार्ट २ असे म्हणायला हि हरकत नाही. माझ्या कलाक्षेत्र च्या आठवणी लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत. कलाप्रेमींचे ते तीर्थक्षेत्र ...पवित्र आणि निसर्गरम्य जागा. अगदी समुद्राच्या जवळ असल्याने रात्री लाटांचा आवाज आणि खाऱ्या पाण्याचा (मासोळी बाजारात येणारा) वास घेत रात्रीची झोप लागायची. सगळीकडे समुद्र काठची बारीक रेती, उन्हा मध्ये गरम रेती वर चालले कि पायाला नॅचरल मसाज व्ह्यायचा. संध्याकाळी ७. ३० ला रात्रीचे जेवण झाले कि आम्ही थोड्या वेळ समुद्राचे गार वारे खात आकाशाकडे बघत बसायचो. मनाला इतका शांत त्यानंतर कधीच वाटलं नाही.

कथा-चिखल गुलाब

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 17/10/2019 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा पहिल्यांदा या इथं सायकल चालवायला शिकलो असेल तेव्हा अगदी हाफचड्डी होतो मी ..आता फक्त वय वाढलंय बाकी सगळं आहे तिथं आणि तसंच आहे. फुलपॅन्टवाला मोटरसायकलस्वार असा विचार करत नदीच्या कडेने निघाला. त्याची नजर पुन्हा तेच सारं शोधत पुढे निघाली. भला मोठा नदीकाठचा विस्तार.कपडे धुवायला आणि म्हशी आंघोळीसाठी म्हणून फार वर्दळ राहते या पायरस्त्याला!

आणि आषाढी पावली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 10/10/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे... रवींद्र दत्तात्रय तेलंग काही प्रसंग आठवणीत घर करून जातात. 12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या.

मंतरलेले दिवस २

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 28/09/2019 19:33 या दिवशी प्रकाशित केले.

शारदोत्सव

नवरात्र सुरू झाले की माझ्या बालपणच्या नवरात्रातल्या महालक्ष्मीच्या जत्रेच्या स्मृती मनात रुंजी घालू लागतात. आमच्या घरी सखूआज्जी - आईची एक सख्खी मावशी कायमची राहायला आलेली होती. वयात अंतर असले तरी तशा दोघी मैत्रिणीच होत्या. दोघीही धार्मिक आणि सश्रद्ध. देवी ही स्त्रीशक्ती असल्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांना महालक्ष्मी देवीचे फार अप्रूप. गणपती विसर्जन झाले की दोघींना महालक्ष्मीच्या जत्रेचे वेध लागत. माझ्या एकदोन मावसबहिणी पण पितृपक्षात कधीतरी आमच्याकडे येऊन जात. जत्रेला जायचा दिवस ठरवायला.