एका माणसाची कथा....
लेखनप्रकार
एका माणसाची कथा....
मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर.
==========================================================================================
स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते. अण्णा म्हणजे एकदम करारी, हुशार आणि देवभोळा माणुस. ऊभी गार शेतं, कामाला प्रचंड गडी माणसं, ७ पिढ्या बसुन खातील इतकं खानदानी वैभव. असं म्हणतात की सरंजारदारबाई जेवण झालं की हात दुधानं धुत. तर ह्या अण्णांना ३ मुलं होती. पहिली २ ज्यांना शेतीमधे रस होता तर तिसरा गोविन्द होता ज्याला शिक्षणात रस होता. तिघांमध्ये गोविंदाला बापासारखीच करारी, हुशारी आणि तल्लख बुद्धिमत्ता परमेश्वरानं भरभरून दिलेली. सतत काहीतरी भारी आणि वेगळं करायची हौस त्याला. त्यापायी त्यानं त्या काळात एम.ए. (एन्ग्लिश) केलं. मंडळी, हा काळ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वी जवळ जवळ ७० वर्षे असा आहे. एम.ए. झाल्यावर इंग्रज सरकारनं जिल्हाध्यक्ष केलं. बापाची छाती अभिमानानं भरून आली. बापानं गावाला जेवण घातलं इतका वडिलानां आनंद झाला. पण देशाभिमान खुप. म्हणुन महीना ५०० रू. पगाराची नोकरी सोडली. ह्यातच वडिल गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी अंगावर येऊन पडली. हे काय कमी होतं म्हणुन मोठ्या दोन भावांनी मालमत्ता वाद सूरू केला. गोविंद अतिशय स्वाभिमानी होता. त्याला हे पटेना म्हणुन त्यानं सगळं भावांच्या हवाली केलं आणि पत्नीला घेऊन मजल दरमजल करत सातार्याजवळ क्षेत्र माहुलीमध्ये येऊन पोहोचले. तात्पुरता मंदिरामध्ये आसरा घेतला. गावच्या पाटलाला खबर लागली की कुणी विद्वान गृहस्थ देवळात आलाय. पाटिलबाबा जातीनं आले आणि हाताला धरून घरी घेऊन गेले. योगायोग असा की गोविंद रावानां कळलं की सातारा भागात एकही इंग्रजी शाळा नाही, म्हणुन मग सातारा शहरात पहिलं इंग्रजी विद्यालय सुरू झालं. मंडळी, त्या काळी ही गोष्ट खरचं मोठी होती. शाळेचा नियम म्हणजे गरिबांना फुकट आणि श्रीमंतांना फी. शिक्षण सगळ्यांना सारखंच. ह्या काळापर्यंत गोविंदरावांना ४ मुलं झालेली. ३ जगली आणि १ मुलगी गेली. उत्तरोत्तर शाळा वाढू लागली आणि गोविंदरावाचं नाव संपुर्ण सातारा जिल्ह्यात घेतलं जाऊ लागलं. शाळाविस्तारासाठी गोविंदरावानी कर्ज काढलं. तर पहिला मुलगा वामन, शकु, विष्णु अशी तीन मुलं. तर मी तुम्हाला ह्या विष्णुची कहाणी सांगणार आहे. अचानक गोविंदराव हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. गोविंदरावाची पत्नी आणि मुलं उघड्यावर आली. इथेच ह्या कुटुंबाची फर्फट सुरू झाली. त्यावेळेस विष्णु अवघा दीड वर्षाचा होता. कर्ज मिटवण्यासाठी ह्यांना शाळा विकावी लागली आणि ३ लहान मुलं घेऊन परत ह्या कुटूंबाचा प्रवास पुण्याकडे सुरू झाला. पुण्यात आल्यावर पासोड्या विठोबाच्या देवळात मुक्काम केला. गोविंदरावाची पत्नीनं( ह्यांना आपण आता काकु म्हणुयात) ४ घरची कामं धरली आणि वामनांन शिक्षण आणि एका दुकानात नोकरी धरली. असचं २ वर्षांपर्यंत चाल्लं. ह्यात काकुंच्या डोक्यावर परिणाम झाला आणि काम मिळेनाशी झाली. मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च वाढु लागला तसं छोट्या विष्णुवर घराबाहेर पडुन पोटाची व्यवस्था करण्याची वेळ आली. तेव्हा त्याचं वय होतं ४ - ४.५. ह्या वयात त्याला कुणी नोकरी पण देइना. मग जगायचं कसं म्हणुन मधुकरी मागुन २ वेळचं पोट भरू लागला. ॐ भवती भिक्षां देही....मंडळी, हे ऐकतानाही माझ्या अंगावर काटा उभा रहातो आणि डोळे भरून वाहु लागतात. काय झालं असेल त्या मुलाचं याचा विचार जरी केला तरी मन प्रचंड अस्वस्थ होत. कर्मठ लोकांच्या त्या पुण्यात त्या वेळेला त्याला काय काय ऐकावं लागलं असेल भिक्षा मागताना.
क्रमशः
============================================================
आज इथेच थांबतो..ह्या पुढील भाग लिहिण्यास घेतला आहे. तयार झाला की टाकीनच. तोवर प्रिय मिपाकरांनी हा लेख कसा वाटला हे जरूर कळवावे. ह्या कथेमधील नावे बद्लण्यात आली आहेत.
वाचने
7590
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मुकुल,
In reply to मुकुल, by चतुरंग
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाचनीय
छान
तुमचे स्वागत असो.
In reply to तुमचे स्वागत असो. by शितल
असेच म्हणतो
सुंदर...
In reply to सुंदर... by प्रभाकर पेठकर
हेच,
छान..
सुरुवात
छान !!!!!
सुरुवात छान झाली आहे.
सुंदर
प्रिय मित्रांनो,
मुकुल
एन्ट्री जोरात...
साधेपणा