Skip to main content

अनुभव

वाट पाहीन पण.......

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 19/07/2011 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये एकदा प्रवासात बर्‍याच दिवसांनी "वाट बघेन पण एसटीनेच जाइन" ही पाटी बघितली आणि तोंडभर हसू तरळले. त्यात अभिमान होता, 'एस टी ने प्रवास? हे काहितरी काय !' ही कुचेष्टा होती की नॉस्टेल्जिया होता हे माझे मलाच झेपले नाही. कदाचित सगळेच थोडे थोडे असेल. पण एस टी म्हटल्याबरोबर बर्‍याच आठवणी ग्रामोफोनवर झरझर फिरणार्‍या तबकडीसारख्या सुळकन डोळ्यासमोरुन तरळुन गेल्या. लहानपणी एस टी म्हटल्यावर फक्त लाल डबा समोर उभा रहायचा. इतर कुठलीही बस म्हणजे एशियाड असायची. त्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरात रहायचो नाही त्यामुळे पी एम टी नामक बागुलबुवा बद्दल माहिती नव्हती झालेली.

चाफा बोलेना, चाफा चालेना

लेखक जागु यांनी शुक्रवार, 15/07/2011 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
चाफा बोलेना, चाफा चालेना खर आहे चाफा कधी बोलला नाही, कधी चालला नाही पण बालपणीच्या मधुर आठवणी मात्र मनात साठवुन आहे अजुन. लहानपणी घराच्या पडविला लागुनच एक चाफ्याचे झाड होते. इतके जुने होते की एखाद्या देवळातल्या पुरातन खांबाइतके जाडे होते. आजीला त्याची फुले देवाला वाहण्यासाठी लागायची.

स्वतःचे मत मांडा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 14/07/2011 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे - प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते.

जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/07/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या. २६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो. पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते.

चला शिकागोला ...

लेखक मर्द मराठा यांनी गुरुवार, 14/07/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की.. कपाटातल्या 'ब्यागा' उड्या मारायला लागतात...उगाचच कॅमेरा फ्लॅश मारतो आहे असे वाटायला लागते... पोटापाण्यासाठी मायदेश तात्पुरता सोडावा लागला तरी भटकण्याची खुमखुमी स्वस्थ घरी बसून देत नाही. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन ४ जुलै आणि तोही सोमवार म्हटल्यावर दोन आठवडे आधीच सहचारीणीशी मसलत करून गूगल नकाशावर स्थळ दर्शन सुरु झाले.... आम्ही राहतो रिचमंड, व्हर्जिनिया येथे गेली ३.५ वर्षे... त्यामुळे एक मोठ्ठ्या परिघातली सगळी शहरे, गावे, डोगंररांगा, समुद्रकिनारे पाहून झाले आहेत... म्हणून परिघाबाहेर जाणे क्रमप्राप्त होते... तेही विमान खर्चाची चाट खिशाला बसून न देता...

‘हल्ली मी नवीन प्रयोग सुरु केलाय…’

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 11/07/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
काय? तुम्ही कधी कोणाचे नवीन डाएट प्रयोग नाही ऐकलेत? तुमच्या ओळखीत कोणीच जाड, अति सडपातळ, मधुमेही किंवा हेल्थ कॉन्शियस नाहीत का? मला तर हमखास सगळे त्यांच्या नवीन आहार प्रयोगांबद्दल सांगतात आणि प्रत्येकाला त्यांचा प्रयोग किती वैज्ञानिक आहे हे मला पटवून द्यायचं असतं. हा माझ्या व्यवसाया मुळे उत्पन्न झालेला धोका पण असू शकतो. असो.

ध्यान गरज आणि फायदे

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो?

वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 30/06/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.