काही महिन्या पूर्वी क्रीप्टो बद्दल थोडी माहिती मिळाली होती. त्यात काही गुंतवणूक करण्याच्या पण विचारात होतो. पण खूप प्रकारची चलने. ते काम कसं करतात ( तांत्रिक बाबी नाही) ह्या बद्दल कोठेतरी मनासारखी माहिती मिळत न्हवती. त्यात भारत सरकारच काही बिल आणून ह्या चलनावर काही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे. काही प्रश्न डोक्यात आहेत जाणकारांनी समाधान करावे ही विनंती.
१. असे बिल आणायला उशीर झाला आहे का?
प्रश्न पडला कारण आधीच खूप लोकांनी पैसे गुंतवले आहेत. ते येन केन प्रकारे ते परत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. ह्यात अधिक धोका आहे
२. बदल ही काळाची गरज आहे.