Skip to main content

२g

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

घाव

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 23/04/2026 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

 

संध्याकाळ झाली. रवी झोपेतून उठला. त्याला चांगलीच झोप लागली होती ; पण जेव्हा तो बेडवर उठून बसला तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं . त्याच्या  मनामध्ये असंख्य भोवरे फिरू लागले होते . लहान पोरं भोवरा खेळतात आणि मध्येच तो हवेत फेकून तळहातावर झेलतात . तसंच त्याचं होत होतं ; पण इथे भोवरे  अनेक होते . आणि - एखादा  भोवरा उचलून घेतलाच तर तो  थेट हृदयाला सलत होता .

 

परिक्षा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/04/2026 16:40 या दिवशी प्रकाशित केले.

गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.

२g केस मधून सर्वजण निर्दोष

लेखक साहना यांनी गुरुवार, 21/12/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत). सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?