Skip to main content

आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 05/02/2026 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही. २०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते. सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे. या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.

वाचने 18638
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

+१ प्रत्येकाची कारणे आणि अनुभव वेगवेगळ्या मुद्द्यांवर असू शकतात पण असे प्रयत्न बहुतांश फसतात हे खरं. बाकी गावातले लोक कसे असतात यावर जनरल मत न देता (कारण गाव तितक्या प्रकृती), सर्वात मोठा प्रॉब्लेम काय येतो हे पाहू गेल्यास तो खुद्द स्वतःच्या आतच असतो. समुद्रकिनारा, नीरव शांत वनराई, मागेपुढे मोठे अंगण आणि बाग (किंवा बाग करायला वाव - वाव दीड वाव ;-)). ) , पक्ष्यांची किलबिल.. हे सर्व एक आठवडा किंवा एक महिना अप्रूप पुरवतात. मुळात जो शहरात अनेक दशके राहून आलेला आहे त्याला ती खेड्यातली जीवनपद्धती लवकरच कंटाळवाणी होते. बागकाम, शेती, पशुपालन, वाचन, झोप यात विरंगुळा शोधून चोवीस तास त्यावर काढणे हे शहरी मनुष्याला झेपत नाही. ते सर्व सात दिवस सुट्टी घेऊन चेंज म्हणून बरे वाटते. मधला मार्ग असतो. मोठ्या शहरात, उदा. जिल्ह्याच्या ठिकाणी, तुलनेत कमी रहदारी, कमी प्रदूषण. तुलनेत कमी दगदग. पण किमान शहरी सोयी उपलब्ध. रत्नागिरी, अलिबाग, पनवेल अशा गावांच्या बाह्य वस्तीत किंवा गोव्यात असा मधला मार्ग सापडतो. अर्थात सर्वत्रच झपाट्याने वस्त्या वाढत आहेत आणि शहराचे शहरपण इतर सर्व समस्या घेऊन पसरत आहे. गोव्यात पणजी किंवा आसपास जिथे शहरी भाग आहे, तिथे घरांचे दर जवळपास मुंबईसारखे झाले आहेत. असे पर्याय खेड्याच्या मानाने महाग असतील. पण ज्यांना परवडेल त्या शहरी लोकांना बेस्ट ऑफ बोथ साईडस त्यात मिळू शकतात. आणि दीर्घकाळ, शांत, समतोल वास्तव्य शक्य होऊ शकतं.

In reply to by सुबोध खरे

मी घर पाहावे बांधून अशी सिरीज लिहित आहे. ती इन प्रोग्रेस आहे. म्हणजे अजून काहीच नक्की झालेले नाही त्यामुळे पुढचा अपडेट आलेला नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मला ते बांधायचेच आहे. पैसे आहेत पण जागाच निश्चित नाही. एक अशक्य सुंदर स्वस्त जागा सापडली आहे. विशाल माळ आणि समोर एक विशाल तळे. जायला चांगला रस्ता. मात्र इथे घर बांधून राहणे चॅलेंजिंग आहे. आमच्या इथे पावसाळ्यात तुफान पाउस नसतो. मोठ्या क्षमतेचे सोलर बसवले तर पूर्ण ऑफ ग्रीड घर करता येईल. बॅकअप म्हणून ग्रीड ची लाईट घेता येईल. दुसरी गोष्ट जोवर माझे घर होईल तोवर मस्कचे इन्टरनेट वगैरे गोष्टी येतीलच. तशी जिओची फायबर लाईन जवळून गेली आहेच. पावसाचे पाणी साठवायचे जरी ठरवले तरी कॉस्ट फारशी जात नाही. २० ते ३० हजार लीटर क्षमता धरून. मात्र असे आधुनिक घर आउट ऑफ नोव्हेअर बांधल्यावर आपल्याला बाकीच्या व्यवस्था जसे की वाहन वगैरे कराव्याच लागतात. इलेक्ट्रिक गाडी घेतली तर सोलर देखील चांगले उपयोगाला येतील. आजूबाजूला लोक राहताहेत म्हणजे पक्की घरे देखील आहेत. शेतकर्‍यांनी त्यांची राहती घरे बांधली आहेत. गाव जवळ आहे त्यामुळे घरकामाला मदत वगैरे देखिल होऊ शकते. >> गावात कुणाची हळद, बारसं, लग्न असेल किंवा कुठचाही उत्सव असेल तर दिवसभर बोम्बल्या (लाऊडस्पिकर वाजत राहतो) गावच्या शांत वातावरणात हा आवाज अतिशय त्रासदायक असतो. हे माझ्यासाठी डील ब्रेकर आहे मात्र हे शहरात देखील आहे. त्यामुळे घराचे संपूर्ण नॉइज प्रूफिंग करून कमीत कमी त्रास कसा होईल याची खबरदारी डिझाईन मधे आहे. किंबहुना घराच्या खर्चार १० टक्के खर्च हा नॉइजप्रूफिंग वरच होईल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हे तिथेच आउट ऑफ नोव्हेअर गेल्याने मला स्वतःला तिथे राहायला काहीच अडचण नाहीये. मात्र घरचे लोक याला सक्त विरोध करत आहेत. कारण मी एकटा निवांत राहू शकतो. करायला भरपूर गोष्टी असतातच. तसेही मी आता बाहेर फारसा पडत नाहीच. आपल्या इच्छा अपेक्षा देखील एकदम साध्या सोप्या आहेत. लहान पण कोझी घर, घरावर सावली धरणारी मोठी दोन चार झाडे असावीत अशीच साधी इच्छा., घरापुढे खूप फुलझाडे, घरात पुस्तकांची कपाटे असावीत, प्रसन्न सकाळी पुस्तक वाचताना एखादा ब्लो जॉब मिळावा यापेक्षा काही मोठ्या अपेक्षा नाहीत..

शहरामध्ये तात्काळ उपलब्ध असलेल्या सुविधा उदा uber, swiggy, amazon, blinkit, tata1mg, rsa इत्यादी खेड्यात उपलब्ध नसतात. यांची सवय झालेली असलेल्या लोकांना तिथे खूप जड जाऊ शकते.

In reply to by कांदा लिंबू

यू नेल्ड इट. बारीकसारीक पण महत्वाचे असे असंख्य मुद्दे एकत्र येतात. आम्ही कसे खेड्यात राहतोय असे इंस्टाग्राम रीळ टाकण्यात मजा असते. पण कायमची तीच लाईफस्टाईल... हम्म..

IT आणि चाळीशी–पन्नाशीच्या पिढीपासून सुरू झालेली चर्चा आता “पुढे आयुष्यात कुठे स्थायिक व्हायचं?” इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. बहुतेकांचा सूर एकच - गावाकडे राहणं अवघड आहे. “डोंगर दुरून साजरे” या मताभोवतीच विचार फिरताना दिसतो. माझं मत मात्र थोडं वेगळं आहे. ---- असे विचार मांडताना एक गोष्ट गृहीत धरलेली असते – आपण शहराच्या सोयींना सरावलेले आहोत, इंटरनेटशिवाय चालत नाही, पायाभूत सुविधाचे पाईक आहोत. मग काही दिवस शुद्ध हवा, शांतता आकर्षित करेल; पण कायम राहणं शक्य नाही. पण प्रश्न सुविधा आहेत की आपलं नातं? माणूस शहरात असो वा गावात - त्याचं नातं मातीशी आणि माणसांशी प्रामाणिक असावं. मी स्वतः शहरात राहतो, पण माझं बालपण उरुळी कांचनमध्ये गेलं(त्यावेळी ते खेडेगाव होते हे मी मानतो, आणि ते माझे गाव नाही). पण पुण्यात - घरात आजही कामवाली नाही, टीव्ही नाही, मोबाईल मर्यादित. साधेपणात जगण्याची सवय आहे असे माझे मला तरी वाटते. म्हणून कुठेही गेलो तरी तिथल्या माणसांत मिसळून, त्यांच्या सारखं हसता-बोलता, जगता येतं. जर “दवाखाना नाही, हे मिळणार नाही, ते मिळणार नाही” या भीतीनेच गावाकडे जायचं असेल, तर गावाकडे जाण्याचा विचारच चुकीचा आहे. आणि हीच भीती पुन्हा पुन्हा पसरवली जाते. मी गावाकडे जाईन पण अपेक्षा घेऊन नाही. जे त्या गावातील लोकांचं होईल, तेच माझं होईल. खड्ड्यात पडला तर दवाखान्यात जायला दोन तास लागतील – तर मला सुद्धा लागतील. पण जर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांसारखं राहता येणार नसेल, तर आपण मनात जी दरी घेऊन तिकडे जातोय, ती कधी आणि कशी भरून निघेल? आणि मग आपण आयुष्यभर त्या दरीच्या या बाजूला उभं राहून, पलीकडचं जग अवघड आहे, कायम जुळणार नाही – असंच म्हणत राहणार. समस्या गावात नाही, ती आपल्या मनातल्या वेगळेपणात आहे. सुविधा कमी असल्या तरी चालतील, पण माणुसकीत दरी नको. ‘मी’ कमी आणि ‘आपण’ जास्त – एवढं जमलं, की कुठेही घर बनतं. विस्तृत लिहीत नाही... नंतर लिहिल गणेशा..

In reply to by गणेशा

सर्व काही तत्वतः उत्तम. चांगले विवेचन. गावी कायमचा स्थायिक झालासच तर त्यानंतर एक दोन वर्षे होऊन गेल्यावर काय घडले ते जाणणे रोचक असेल.

तसं नाही हो आमचे काका आताच सहा महिने स्वतः च्या जन्मगावात राहून परत आले. त्यांचा ताजा ताजा अनुभव मी लिहिलेला आहे. बरं ते मागच्या पिढीचे आहेत म्हणजे इंटरनेट क्वचितच वापरतात आणि संगणक तर नाहीच. अर्थात आपली अपेक्षा किमान असेल तर आपल्याला खेड्यात स्थायिक होणे जास्त सोपे जाईल शिवाय उरुळी कांचन आता तसं खेडं राहिलेलं नाही. एके काळी मीसुद्धा नाशिक इंदोर सारख्या शांत मध्यम शहरात राहायला जाऊ असे विचार करत असे. परंतु गेल्या दहा वर्षात या शहरात सुद्धा इतका मोठा फरक पडला आहे कि तेथे जाण्यापेक्षा मुंबईच बरी या निष्कर्षाप्रत आलो आहे. गेल्या वर्षी नाशिक मध्ये घेतलेला माझा भूखंड विकून मी मोकळा झालो पहा जमतंय का आपल्याला शुभेच्छा

In reply to by सुबोध खरे

एक addition.. मी उरुळी कांचन ला नाही जाणार त्या पेक्षा पुणे बरे अशी स्तिथी आहे सध्या.. मी- माझे अपरिचित असलेले गाव 'उंडवडी-सुपे' ३०० उंबऱ्याच गाव आहे तेथे राहणार आहे.. पाण्याचा प्रश्न थोडा असेल तेथे पण होईल नीट आणि जीवन जगायला काय लागते? समाधान..

कॅालिंग मुविकाका… त्यांचा फर्स्टहॅन्ड अनुभव ऐकण रोचक असेल. ते कोकणात शेती करत होते काही वर्ष, आखती देशातून परत येऊन. सद्ध्या डोंबिवलीत असतात. कोणाच्या संपर्कात असतील तर त्यांना इथे यायला सांगा. - (मुवींच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

त्यांचे अनुभव त्यांनी इथे लिहीले होते असं वाटतं. पण त्यांनी या बाबतीत त्यांना काय वाटतं ते सांगितलं तर चर्चेत चांगली भर पडेल. खालील क्रोनॉलॉजी जर अचूक असेल तर त्यात उत्तर येतंच आहे.
ते कोकणात शेती करत होते काही वर्ष, आखती देशातून परत येऊन. सद्ध्या डोंबिवलीत असतात.

In reply to by गवि

त्यामागे आर्थिक गणितांच कारण असावं असं अंधुकसं आठवतंय, वर आलेल्या मुद्यांमुळे नाही. पण त्याबाबत तेच जास्त माहिती देऊ शकतील. अनुजही चर्चेत वस्तुनिष्ठ असलेले ठोस मुद्दे आलेले नाहीत, सगळा मामला सब्जेक्टीव्हच आहे. - (चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by गवि

शेतात हळद लावून मुविकका संदेशखाली वर मिपावर मॅसेज करत होते, नंतर संदेशखालीला वाऱ्यावर सोडून गायबले.

गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा जुजबी माहीती असलेल्या (ती ही एका बाजूचीच), जाणे ही एक प्रकारची रिस्कच आहे.परंतु ज्या गावात काही वर्षे राहिलो आहोत व ज्या गावाला बर्यापैकी ओळखतो अश्या गावात कायमस्वरुपी अथवा दीर्घकाल राहणे इतके काही अवघड नसावे. पत्नीच्या कामानिमित्त काही काळ उज्जैन येथे वास्तव्यास होतो.घर भाड्याने घेऊन राहत होतो. वर आम्ही व खाली घरमालक. घरमालकाची मुलगी इंजिनिअर होऊन इंदोरच्या कंपनीत काम करत होती पण आम्ही बेंगलोरहून डायरेक्ट उज्जैनला आलो हे कळ्ल्यानंतर त्याने विशेषतः घरमालकीणीने बेंगलोर मध्ये मुलीसाठी काही जॉब मिळतो का ते पाहा अशी विनंती केली. मी त्यांना बेंगलोरपेक्षा इथले आयुष्य फार चांगले आहे असे अनेकदा बोलून पाहिले व मी स्वतः चार पैसे कमी मिळाले तर चालतील पण उज्जैन इंदोर सारख्या शहरात शिफ्ट व्हायला तयार आहे असेही म्हणालो होतो. मलाही मी नुकताच ग्रॅज्युएट झाल्यानंतरची माझी विचारसरणी आठवली. मलाही त्या वयात मुंबई,पुणे बेंगलोर वगैरेसारख्या महानगरांचे भयंकर आकर्षण होते व काहीही करुन ह्या शहरात येण्याचा प्रयत्न करत होतो. मुळात शहरातील जीवनशैली वाईट व गावाकडची चांगली अशी काळीपांढरी विचारसरणीच चुकीची आहे. शहरात राहण्याचा ओवरहेड जास्त असतो पण तो वर गणेशाने लिहिल्याप्रमाणे त्याला आपला दृष्टीकोन जबाबदार आहे. सध्या भोपाळ मध्ये वास्तव्यास आहे. शेजारी एक कुटुंब राहते आहे.पती पत्नी व एक मुलगा जो सध्या बारावीत आहे. पती ने फार्मसी मधली लठ्ठ पगाराची नोकरी करोनानंतर सोडली.(सर्व आर्थिक जबाबदार्यांतुन मुक्त झाल्यावर.) संध्याकाळी दोघे ही पती पत्नी सोसायटी बाहेर पाणीपुरीचा स्टॉल लावतात संध्याकाळी साधारण ३ तास.दोघांकडे पाहुन सुखी जोडपे कसे असावे ह्याची प्रचीती येते. अर्थात कुरबुरी ही असतीलच पण नेहेमीच्या ताणतणावातुन मुक्त दिसतात. मुद्दा हा आहे कि जर सुखीच राहायचे असेल तर त्यासाठी गावाकडेच जायला हवे ह्याची काही गरज नसावी. आपल्या अवाजवी इच्छा आकाक्षांना थोडीफार मुरड घालुन जिथे आहोत तिथेही सुखी होऊन राहता येते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा जुजबी माहीती असलेल्या (ती ही एका बाजूचीच), जाणे ही एक प्रकारची रिस्कच आहे.
रिस्क??? मूर्खपणा असेल तो. असलं अतरंगी प्लॅनिंग करणाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारच करायला हवा.
शहरात राहण्याचा ओवरहेड जास्त असतो
नेमका हाच मुद्दा टीयर ३-४ शहरात जाण्यामागे आहे. शहरातली बकाली, प्रदूषण (हवा, पाणी, ध्वनी...), भयानक गर्दी, ह्यासाठी ते ओव्हरहेड्स बेयर करणं जड वाटतंय. - (चर्चोत्सुक) सोकाजी

काही गोष्टी. स्वानुभावर आधारित फक्त मुद्दे लिहित आहे. इथली वाचक मंडळी अतिशय हुषार असल्याने, सविस्तर लिहिण्यात माझा वेळ वाया जाईल. १. शेती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. २. मजूर वर्ग आधारित शेती फायदेशीर ठरत नाही. ३. नसते लोढणे अंगावर घेणे घेणे अयोग्य. ४. घरची किमान ४ माणसे, सतत शेतावर हवीत. ५. पाण्या सारखा पैसा सतत ओतावा लागतो. ६. वीज पुरवठा खंडित होतोच होतो. ७. दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी, हे जागतिक त्रिकालाबाधित सत्य आहे. ८. सर्व प्रकारचे, दळणवळण सुखकर कधीच होणार नाही. ९. जाती भेद, कधीच पुसले जाणार नाही. १०. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.... त्यामुळे, नाशवंत शेती न करणेच उत्तम. थोडक्यात, माझ्या पुरते सांगायचे तर, कुटुंबासहीत, सामुदायिक वृक्ष लागवड (फणस, बांबू, इत्यादी) करणे, हा सर्वोत्तम मार्ग आहे. एकटे शेती करणार असाल तर, साई बाबांचे मंदिर शेतात उभारा आणि ही सगळी भानगड ट्रस्टच्या किंवा फाऊंडेशनचा ताब्यात ठेवा. त्या ट्रस्टवर आणि फाउंडेशनवर आपला कौटुंबीक वरचष्मा ठेवा.... वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर, शेती हौस म्हणून करायची असेल तर, आर्थिक पाया भक्कम पाहिजे आणि तो अविरत हवा. आणि व्यवसाय म्हणून करायची असेल तर, फणस आणि नारळ लागवड, हीच सध्या उत्तम .... फणसाचे झाड ही आपली Fix Deposit... वाढले की तोडून टाकायचे, ह्या झाडाची चोरी होत नाही. नारळ लागवड, हे आपले रोजंदारी उत्पन्न. रोज शेतात फिरायचे आणि पडलेले नारळ गोळा करायचे. नारळ उतरवायला मजूर मिळत नाहीत. पण नारळ तयार झाला की तो झाडावरून पडतो. ४०० नारळाची झाडे, ४ माणसांना रोजचे उत्पन्न देते. एकरी ४० नारळ बसतात. त्यामुळे, १२ एकर शेती, ही ३५ ते ४० ह्या वयोगटात घेणे.... झाडांची लागवड आणि घर आणि इतर आनुषंगिक गोष्टींना किमान १५ वर्षे , आर्थिक ताण न येता लागतात. निवृत्ती नंतर, ६० नंतर शेती करायची असेल तर, ती आपल्या मुला साठी .... बाय द वे, काही कौटुंबीक जबाबदाऱ्या आणि इतर पर्यायी मार्ग अवलंबत असल्याने, सध्या तरी डोंबिवली येथे आहे. पुढच्या वर्षी कुठे असेन ते सध्या तरी सांगू शकत नाही. तशी म्हणायला शेत जमीन आहे पण ती फक्त ७१ गुंठे आहे. त्यामुळे, ते भरपूर खर्चिक काम होणार आहे. गेल्या काही वर्षांत, अपघात, लग्न, कुटुंबातील व्यक्तींच्या हॉस्पिटल मध्ये वास्तव्य ह्यामुळे वेळ काढता आला नाही...

In reply to by मुक्त विहारि

धन्यवाद मुवी! वेळात वेळ काढून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अजून एक प्रश्न आहे, तो मूळ चर्चेचा मुद्दा आहे. शहरात सगळे आयुष्य घालवल्यानंतर रिटायरमेंट साठी गावाच्या ठिकाणी जाऊन राहणे शक्य आहे का (भक्कम आर्थिक तरतूद करून) ? की तसा निर्णय घेतल्यावर १-२ महिन्यात निर्णय चुकून परत शहरात यावे लागेल? तुम्ही आखातातून परत येऊन कोकणात रिटायरमेंट घेतली होतीत. त्यासंदर्भातील तुमचे अनुभव किंवा मतं हवी होती. - (आभारी) सोकाजी

In reply to by सोत्रि

वैयक्तिक पातळीवर, मला तरी गावात राहणे सुखकर झाले... पहाटे चार वाजता उठणे आणि सूर्य उगवायच्या आत, शेतावर जाणे आणि सूर्य तापला की घरी येऊन जेवण बनवणे आणि घरातील इतर कामे आटोपली की दुपारची झोप घेऊन परत ४ वाजता शेतावर जाणे आणि सूर्य मावळे पर्यंत शेतात पाणी फिरवणे आणि जीवामृत फवारणी करणे... ह्यात मला तरी मानसिक समाधान मिळाले. सोमवारी वीज पुरवठा बंद असल्याने, सोमवारी जीवामृत करणे... ही जीवनशैली मला आवडली पण इतरांना आवडलीच पाहिजे, हा अट्टाहास नाही... ह्या जीनशैलीचा मला दोन प्रकारे फायदा झाला. १. माझी मानसिक ताकद वाढली. आणि २. निसर्गा बरोबर एकरूप झालो. (इथे डोंबिवलीत डोळ्यापुढे फक्त भिंती असतात आणि शेतात गेलो की अफाट क्षितीज....) ------ बाकी गावी गेलो की, शहरातील सुखे (?) विसरायची आणि शेतात गेलो की क्षितीजापुढे सगळे विसरून जातो.... ----- कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याने सध्या तरी डोंबिवली येथे आहे. आणि अपघाता मुळे, एक पाय शॉर्ट झाला आहे, त्यामुळे आता खूप शारीरिक कामे न करता, पाणी आधारीत शेती करायचा विचार आहे. अर्थात, कमी जागेत, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन (गाव जातिभेद करतेच करते...), पाणी आधारीत, कमी श्रमात, बाजारपेठ शोधून (म्हणजे , उद्या माल जर नासला (नासलेला माल पण विकल्या गेला पाहिजे) किंवा लगेच विकता नाही आला तरी आर्थिक ताण पडायला नको. तसेही "धन" होणार ते दलालाचेच) आणि व्यवस्थित आर्थिक नियोजन करून , आता जागेत नक्की काय उत्पादन करावे? ह्याचा विचार सुरू आहे. शिवाय जोडीला कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेतच. ----- परतीचे दोर कधीच कापायचे नसतात. आपण कितीही प्रयत्न केले तरी, मोठ्या शहरातच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत... --------- परत एकदा मूळ पदावर येतो... मला गावी राहायला आणि स्थाईक व्हायला आवडेल, पण हा अपवाद आहे. चार दिवस वीज पुरवठा बंद झाला होता आणि मोबाईल बंद पडला होता... माझे अडले नाही. नाग दोन वेळा दर्शन देऊन गेला... त्याच्या जागेत जातांना मी काळजी घेऊन जायला लागलो. काठी आपटत जायचो... त्रास एकाच गोष्टीचा होतो आणि तो म्हणजे प्रचंड प्रमाणात होत असणारे ध्वनी प्रदूषण.... पण आता सरळ कानात बोळे घालायचे आणि झोपायचे. तसेही आपण कुठे प्राईम मिनिस्टर आहोत? की फोन नाही घेतला तर जग बुडणार आहे. ------- आपापल्या चौकटीत रहायचे आणि विसरून जायचे. ----- प्रतिसाद अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे क्षमस्व... आता इतकी लिहायची सवय नाही राहिली. आता मी म्हातारा झालो आहे... तू, समजून घेशील, ही खात्री आहे....

In reply to by मुक्त विहारि

वैयक्तिक पातळीवर, मला तरी गावात राहणे सुखकर झाले...
+१००
प्रतिसाद अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे क्षमस्व... तू, समजून घेशील, ही खात्री आहे....
मुवीकाका, हा शालजोडीतला कशासाठी? का अवघडायला लावताय चारचौघात.... :( - (अवघडलेला) सोकाजी

१. मी आयटीत गेली पंधरा वर्षे काम करत आहे. सुरुवात एलजी इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर दोन प्रॉडक्ट कंपन्या आणि आता एक अमेरिकन प्रॉडक्ट कंपनी अशी माझी करिअर झाली. यात प्रामुख्याने अल्ट्रा scalable back end and लिहिणे यामध्ये जास्तीत जास्त स्पेशललायझेशन मिळवत गेलो. सध्या काही ए आय एनसिलरी प्रोजेक्ट जरी असले तरी माझा तो निष नाही. कंपनीचे एआय ऍडॉप्शन भरपूर आहे त्यामुळे कंपनी मार्केट मधून कालबाह्य होणार नाही. तरीही अँथ्रोपिक ज्या पद्धतीचे नवनवीन टूल्स आणत आहे त्यावरून 'आता उरलो प्रॉम्प्ट पुरता' एवढेच उरले आहे. अजूनही ए आय बेसिक चुका करत असले तरी मी गेले दोन वर्ष एकही ओळ स्वतः लिहिली नाही. मात्र मी ए आय वापरून अनेक कल्पना ज्या मला पूर्वी सहज करणे शक्य नव्हत्या त्या सर्व करून पाहिल्या आणि त्यांचे उत्तम रिझल्ट मिळवले. सध्या सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अशा रोलमध्ये मी आहे. २. तरीही मला भीती याची वाटते की कंपन्यांनी डाऊनसाइजिंग केले तर मला नारळ मिळू शकतो. अर्थात मला स्वतःला नारळ मिळेल असे वाटत नाही तरीही एकदा प्रॉडक्ट मॅच्युअर झाला की कंपनीला तसे वाटू शकते की यांना डच्चू दिला तर फारसा फरक पडणार नाही. ३. बऱ्याच कंपन्या स्वतःच्या प्रॉडक्ट्स मध्ये ए आय फीचर आणत आहेत जे कस्टमर वापरत नाहीत त्यामुळे त्यांना अप सेल करणे हे एक मोठे चॅलेंज होऊन बसले आहे. त्यामुळे अगदी एआय मध्ये जरी काम केले तरी काम असेलच याची काहीच खात्री नाही. तरीही सध्या एआय इंजीनियरिंग आणि एम एल ओप्स यांचे ज्ञान घेणे सुरू आहे. दीर्घ अनुभवाचा फायदा असा होतो की हे नवीन ज्ञान घ्यायला फारसा त्रास होत नाही. ४. मात्र आता तशी पॅशन नाही. एका वयानंतर ही धडपड करायचे राहून जाते आणि ती आंतरिक उर्मी देखील तेवढी प्रबळ उरत नाही. म्हणून नवीन स्किल्स मिळवणे कितीही गरजेचे असले तरी मानवी मनाच्या मर्यादा आहेत. सध्याचे नॉलेज लाइफ सायकल सात वर्षांचे असल्याने किंबहुना त्याच्याहूनही कमी असल्याने सात वर्षांपूर्वीची टेक्नॉलॉजी किंवा स्किल आता जवळजवळ कालबाह्य झालेले असते हे आयटी मधले सध्याचे सत्य. मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा इतर अनेक क्षेत्रांमध्ये हे खरे नाही तिथे ज्ञानाची लाईफ सायकल बऱ्यापैकी मोठी असते. ५. त्यामुळे माझी तंतरली आहे का तर होय कारण वरती सोकाजी म्हणतात तसे पर्याय म्हणून आपण काय करू शकतो याचा आत्मविश्वास नाही. म्हणून बहुतेक लोक फूड व्यवसायात पडतात कारण त्यांना तसा एक लो एन्ट्री बॅरियर असलेला दुसरा पर्याय फारसा सापडत नाही. ६. आतापर्यंत जेवढे जमले आहे ते चांगल्या इक्विटी मध्ये गुंतवून कमी रिस्क आणि जास्त रिस्क बॅलन्स करून वार्षिक 12 ते 13 टक्क्यांच्या वरती परतावा मिळवणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पुंजी जमा करून सरळ सरळ निवृत्त व्हावे ही एक सर्व मान्य कल्पना आहे त्यामध्ये तुम्ही नोकरीवर उत्पन्नासाठी अवलंबून राहत नाही. तुमचा मासिक खर्च कमी ठेवून तुम्ही आतापर्यंत जमवलेल्या पैशांवर आरामात आयुष्य काढू शकता अशी फिलोसॉफी. मात्र असे स्ट्रक्चर्ड शिस्तबद्ध प्लॅनिंग बहुतेक लोकांना जमत नाही. ज्यावेळेस पैसे असतात त्यावेळेस लोक संधी हुकवतात आणि ज्या वेळेस संधी असते त्यावेळेस पैसे नसतात असे होते. किंवा स्त्री हट्ट बालहट्ट इत्यादी सर्व हट्टयांना शरण जाऊन रियल इस्टेट सोने नाणे इत्यादी अनेक गोष्टींमध्ये पैसे गुंतवले जातात. म्हणून अशी शिस्त लावून घेणे वाटते तेवढे सरळ नसते. ७. आता निवृत्त झाल्यावर काय करावे हा एक प्रश्न इथे अनेकांना छळत आहे. बऱ्याच जणांची ही एक रोमँटिक कल्पना असते की गावाकडे जाऊन शेती करावी. काही जणांनी त्याला विरोध केला आहे की grass is always greener on the other side. परंतु अशी इच्छा असणे ही व्हॅलिड इच्छा आहे भले कितीही रोमँटिक असेना आणि माणूस जेव्हा असा विचार करत होते तेव्हा तो पूर्णपणे नवीन सेटिंग मध्ये जाऊन स्वतःला सेटल करू इच्छितो असा अर्थ नाही. बहुतेकदा हे गाव त्याच्या परिचयाचे असते गावामध्ये ओळखी असतात. तसेही वय वाढेल तसे आपण जिथे मोठे झालो ते गाव किंवा जागा खुणाव लागतात कारण मिडलाइफ क्राईसेस नंतर आपल्याला जी मानसिक सुरक्षितता लागते ती माणूस तीव्रतेने शोधू लागतो आणि त्यामध्ये आपल्या गावांचा वरती नंबर येतो. ८. माझे वैयक्तिक मत असे आहे की शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय असला तरी हा तोट्यात जाणार आहे व्यवसाय असतो म्हणून शेतीकडे मी कधीही उत्पन्न मिळवणारा व्यवसाय म्हणून पाहत नाही. जेव्हा मी असे म्हणतो की मी गावाकडे जाऊन शेती करेल तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मी गावाकडे जाऊन मार्केट गार्डन जरी तयार केले तरी त्यातून उत्पन्न न मिळता किमान तोटा होईल असा मी एक खर्चिक छंद जोपासणार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. एकदा त्यातून उत्पन्न मिळालेच पाहिजे अशी अट निघून गेली की आपण शेतीमध्ये काहीही करायला मोकळे होतो. म्हणून आधी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आणि शेतीचा महाग छंद अशी निवृत्त योजना माझी आहे. ९. यात मुख्य उद्देश हातपाय चालत राहावेत आणि त्यातून उत्पन्न मिळालेच तर सोने पे सुहागा. १०. शहरात आयुष्य घालवलेल्या माणसाला गावाकडच्या अनेक गोष्टी होऊ शकतात परंतु भारतामध्ये शहरातही अनेक खूपणाऱ्या गोष्टी असतात जसे की सगळीकडून होणारे प्रचंड प्रमाणातले ध्वनी प्रदूषण. मध्यम मार्ग म्हणजे लहान शहर आणि त्याच्या परिघावर राहणे. ध्वनी प्रदूषण आणि वायु प्रदूषण यांचा कमीत कमी त्रास होईल असे पाहणे. ११. पुण्यात राहणाऱ्या माझ्या मित्रांच्या सर्व मुलांचे सध्या एलर्जी असलेल्या खोकल्याने प्रचंड नुकसान होत आहे कारण बाहेर एयर क्वालिटी इतकी ढासळलेली आहे. तेव्हा नामुष्की म्हणून शहरात आयुष्य काढणे म्हणजे ते कमीच करून घेणे. १२. म्हणून सध्या जितका पगार येत आहे तो येऊ देत आहे जोवर आंतरिक इच्छा आहे तोवर पुढे धकवत नेईन. मात्र भारतातील ९५ % जनतेप्रमाणे राहण्यासाठी सध्या आपण पुरेसे कमावलेले आहे की नाही हा विचार जर केला तर आश्वस्तता आहे. आपण लीन राहिलो की आनंदी आयुष्य जगता येईल असे वाटते. अत्यंत जास्त सेफ्टी नेट असले तरीही अस्थिरता आणि अनारोग्य येणारच नाहीत असे काही नसते. माझी आई जर मासिक दहा हजारात आनंदी आयुष्य जगत असेल तर मी तिच्या कित्येक पट कमवून सतत ताणात राहत असेल तर काय फायदा? आनंदी राहायला नेहमी सोयी लागतात असे थोडीच आहे? म्हणजे स्विगी वगैरे नसेल तर काहीही झाटाचा फरक पडला नाही पाहिजे. यास या सोयी कोणाच्यातरी प्रचंड आर्थिक शोषणावर तुम्हाला मिळतात त्यामुळे त्या वाटतात तेवढ्या सोयी नाहीत. महत्त्वाच्या सोयी म्हणजे जवळ दवाखाना आणि शाळा असणे. परंतु जर माझ्या तालुक्याच्या ठिकाणी 30 40 हजार लोक तिथल्या असलेल्या दवाखान्यांवर आणि शाळांवर जगत असतील तर त्यांच्याहून थोडीशी जास्त मिळकत किंवा दळणवळणाची साधने बाळगू शकत असणाऱ्या मला थोडासा बरा दवाखाना शेजारच्या मोठ्या शहरात मिळू शकत असेल तर हे इतके काही वाईट नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

१३. आता सर्व भौतिक गरजा जरी आपण तालुका प्लेस ला किंवा शहरापासून जवळ राहून सोडवल्या तरीही सांस्कृतिक गरजा कशा सोडवायच्या हा एक प्रश्न आहे. उदाहरणार्थ मला मराठी नाटक पाहायला आवडतात मला एकांकिका बसवायला आवडतात मला संगीतामध्ये रस आहे त्यामुळे मला नवीन वाद्य शिकायचे आहेत आणि मला तसे गुरु हवे आहेत. खेड्यांमध्ये या कोणत्याही गोष्टी मिळणार नाहीत. वैयक्तिक शिकण्याच्या सोयी इंटरनेट आणि तत्सम टेक्नॉलॉजी ने मिळू शकतात मात्र सांघिक कलेसाठी खेडे आणि अगदी तालुक्याची ठिकाणे देखील बिनकामाची असतात. १४. राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेता येईल एवढा छोटा ग्रुप जरी करायचा म्हटलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणास पर्याय नाही. किंवा तालुक्याचे गाव तरी किमान 40 हजारांच्या लोकसंख्ये पुढचे हवे तर तिथे सम विचारी लोक सापडू शकतात. दुसरा पर्याय म्हणजे अशा ठिकाणी असलेले कॉलेजेस जेथे आपल्याला नवीन मुलं तयार करता येऊ शकतात. १५. दुसऱ्या सांघिक गरजा जसे की सांघिक खेळ यांच्यामध्ये जर पॅशन असेल तरीदेखील खेडी किंवा तालुक्याची ठिकाणे बिनकामाची आहेत. माझ्या तालुक्याच्या ठिकाणी एक बॅडमिंटन क्लब देखील आहे मात्र हा एवढाच चॉईस आहे. एखाद्याला टेनिस बास्केटबॉल किंवा अगदी फुटबॉल जरी आवडत असेल तर त्याला कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नाही. परंतु बहुतेक जनतेचे क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळावर भागते त्यामुळे तालुक्याची ठिकाणे देखील काही वाईट नाही तिथे आता असे क्लब भरपूर आहेत. १६. वैयक्तिक खेळ आणि तशा इव्हेंटसाठी जवळच्या शहरात जाऊन येऊन असणे अवघड नसावे उदाहरणार्थ मॅरेथॉन. किंवा सायकलिंग. मला स्वतःला सायकलिंग आणि अँगलिंग आवडते त्यामुळे माझ्या सांघिक सांस्कृतिक गरजा या फक्त कलेपुरत्याच मर्यादित आहेत. भारतामध्ये अँगलिंग हा प्रकार अत्यंत बाल्यावस्थेत आहे. परंतु हा अत्यंत कमी खर्चाचा परंतु भरपूर आनंद देणारा प्रकार. माझे घरचे पूर्वीपासून मासेमारी अगदी मनापासून करतात आणि त्यातून मला अँगलिंग ची आवड निर्माण झाली. १७. पक्षी निरीक्षण फुलं किंवा इतर शास्त्रधारीत छंद शहरात आणि गावांमध्ये तेवढ्याच क्षमतेने करता येतात. किंबहुना माझ्या तालुक्याच्या ठिकाणी दोन अत्यंत उत्तम दर्जाचे पक्षी निरीक्षक आहेत आणि त्यांच्याशी माझे खूप छान जुळते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तुमचा प्रतिसाद म्हणजे एक ब्ल्यू प्रिंटच आहे. मला असेच लिहावेसे वाटत होते. पण मला उलट सांस्कृतीक गरजा लहान गावात खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होतील असे वाटते. कारण तसा डेटा आहे. माझा प्रोफेसर भाऊ दररोज कॉलेज सुटल्यावर व्हॉलीबॉल खेळायचा. एक उद्योजक मित्र संगीत शिकायचे व रात्री भजनी मंडळात जायचे. अत्यंत एक्सायटेडली आपण संगीत कसे शिकत आहोत हे सांगायचे. आपल्याला आता भीमसेन जोशी थोडेच व्हायचे आहे. आमचे शिक्षक चक्क नरसोबा वाडीच्या देवळाला अंगार्‍याच्या पुड्या बांधण्यासाठी कागद कापून लोकसेवा करतात. फक्त या सर्वांना आर्थिक विवंचना नाही. हे पुण्या मुंबईत राहून कुणाला जमते असा एकही माणूस मला माहित नाही. सगळे पोटाच्या मागे लागले आहेत असे वाटते. लहान गावात अनेक हुशार होतकरू मुले आहेत ज्यांना एक्सपोजर मिळत नाही, हुषार असले तरी इंग्रजी बोलता येत नाही. शिकवण्या घेण्याचे पार्ट टाईम काम केले तर खूपच डिमांड आहे. अशा अनेक संधी तिथेही आहेत. बाकी पैसे कमवण्यासाठी शेती ही कल्पनाच आताशा व्यवहार्य राहिली नाही असे खेदपूर्वक म्हणावे लागते. त्या बाबतीत मुवी काकांशी सहमत आहे.

In reply to by स्वधर्म

खेडेगाव आणि मध्यम लोकसंख्येचे शहर यांच्यात अनेक प्रतिसादांत गल्लत होतेय की काय असं वाटतं. खेडेगाव किंवा गाव: पावस, हेदवी, श्रृंगारतळी, बत्तीसशिराळा, लांजा, लासलगाव, घोटी, कवठेपिरान, लोलये , तळपण, आगरदांडा निमशहर: रत्नागिरी, अलिबाग, कुडाळ, चिपळूण, दापोली, म्हापशे, शहर: सातारा, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, बेळगावी, मडगाव, पणजी महानगर: मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू महानगरातून निमशहर आणि शहर यांत जाण्यात कमी अडथळे. खेड्यात जाण्यात मुख्य.

In reply to by गवि

आमच्या गुहागरला का वगळलेत हो गवि? शांत गाव, मस्त समुद्र किनारा आणी आपला व्याडेश्वर! जाउदे तसेही कुणाला गुहागर मध्ये वाडी / जमीन घेणे परवडणार नाही हा भाग वेगळा :)

In reply to by नेत्रेश

हा हा.. वगळले नाही हो. काही उदाहरणे घेतली फक्त. गुहागर मनात होतेच पण ते कोणत्या सदरात पडते याची लेटेस्ट माहिती नसल्याने यादीत घालता आले नाही. व्याडेश्वर म्हणजे आमचेही कुलदैवत हो. नमस्कार सांगा. _/\_

माझी सक्खी बहीण,भाऊजि आणि भाचा कोविड काळात डोंबिवली ते तळकोकण तले खेडे असे स्थलांतर करून स्वतःचे घर बांधून राहत आहेत. ६ वर्षे झाली. त्यानी स्वतःचे परतीचे दोर कापून टाकले, आता स्थिरस्थावर आहे सगळे. घरचे अन्नधान्य, शेततळे, विहीर, असंख्य अनुदाने, घरचे दूध वगैरे चैन असते. भयंकर पाऊस, फुरसे , माकडे त्रास , शेतीवर गडी न मिळणे इत्यादी असंख्य समस्या सुद्धा आहेत. पण आता त्यांना सवय झाली आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

डोंबिवली ते तळकोकण तले खेडे असे स्थलांतर करून स्वतःचे घर बांधून राहत आहेत. ६ वर्षे झाली.
+१०० - (उभारी मिळालेला) सोकाजी

ज्याना गावाकडे राहायची सवय असेल त्यांना सोपे जाइल , पण जन्मापासून पुण्या मुंबैत वाढलेल्या पिढीला हे अवघड आहे , याचे मुख्य कारण आहे .. सोशल कनेक्ट मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी आहे . तुम्ही गावाकडे गेलात ते सोशल कनेक्ट सहज होत नाही . पुरुषांना उतार वयात नवीन मित्र जोडणे अवघड असते , बायका सहज मिक्स होतात . एकमेकींना बोलावणे , गप्पा मारणे , देवाण घेवाण सहज होते. गावाकडे उद्योग काय करावा ? शेती नसेल तर काय असे प्रश्न अस्तत. हा एकलकोंडेपणा घालवता आला पाहिजे. बरेच जण त्याला कंटाळतात ------------------- गावाकडचे विषय , राजकारण , अर्थकारण हे फार वेगळे असते.. एखादा मास्तर सोडला तर रीटायर्ड कोणी नसते. त्यांचे रुटीन चालू असते. गावाकडेखर्च कमी हा अजून एक गैर समज आहे , किराणाचे जे रेट इथे आहेत तेच तिथेही आहेत , भाज्या थोड्या स्वस्त मिळतिल एवढेच. ----------------------------- आमचे पिढीजात घर आहे , माझे बालपण गेले आहे आणी सध्या शेतीच्या निमित्ताने मी महिन्यातून २ वेळा जातो , मे मध्ये महिनाभर राहतो , गावात हळू हळू संपर्क वाढला आहे . रीटायरमेण्ट नंतर नक्की जाउन राहणार

In reply to by कपिलमुनी

माझ्या पुणेस्थित काकानी १९६४ साली धुळे सोडले व पुण्यात स्थायिक झाले, आपल्या जन्मगावात स्वतःचे घर असावे म्हणून त्यांनी २०२२ साली स्वतचे घर विकत घेतले, धुळे शहरात घ्या असे सांगूनही त्यांनी शहरापासून २० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धुळ्यातच आलेल्या पण खेडेच असलेल्या गावात हट्टाने घर घेतले त्याचा फायदा असा झाला की ३५ लाखात चार मोठ्या रुमचे, २ टॉयलेट बाथरूमचे बोअरवेलसह घर मिळाले. बांधकाम अवस्थेत असताना घर घेतले होते पण बिल्डरने ताब्यात देताना प्रचंड त्रास दिला ७ दिवसाचे काम बाकी होते पण ६ महिने झाले तरीही पूर्ण करत नव्हता पैसे सर्व दिले गेले होते तरीही! शेवटी बिल्डरच्या मुलाची नी माझी हाणामारी झाली दोन्ही बाजूचे लोक जमले नी नंतर समजुतीने बैठक बसवून तेच काम बिल्डरने सात दिवात करून दिले. त्या घरात काका महिना - २ महिन्यातून एखादी चक्कर टाकतात नी चार- पाच दिवस राहतात. जवळच असलेल्या कुणालाही २००-५०० दिले की तो घराची साफसफाई नी केरलादी करून देतो. शिवशाही त्याना फ्री आहे (७५ पार असल्याने) त्यामूळे यायला जायला एक रुपयाही लागत नाही. मागे आम्ही सगळ्यांनी अख्खा मे महिना तिथेच काढला होता. पण आता ४ वर्षांनी काकांचे मन भरले व त्यांनी ते घर विकायला काढले आहे पण ना गिरहाईक आहे ना भाडेकरू. भाडेकरी टाकून फक्त एक रूम स्वतःला ठेवाव म्हणून थोडी तोडफोड करून २० हजार खर्च करून मॉडिफिकेशनही केले पण भाडेकरू मिळत नाहीये कारण ते घर शहराच्या बोंड्रीवर आहे/ जवळपास खेड्यातच आहे. पण शांतता, थंड नि मोकळी हवा तिथे गेल्यावर मिळते. मी गेलो की मला मात्र चारही रूम, अंगण दोन्ही बाथरूम झाडून नि पुसून/ धुवून काढावे लागतात त्यातच मी अर्धमेला होतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सगळ्या सेकंड होम ची अवस्था हीच आहे . माझे लहानपण तळेगाव मध्ये गेले , मुंबैकर स्वस्त आणि हौस म्हणून फ्लॅट घ्यायचे . नंतर पडून राह्तात.

In reply to by कपिलमुनी

अगदी. प्रत्यक्ष वर्षानुवर्षे स्थायिक होऊन आजही तिथेच असलेली फार थोडी उदाहरणे दिसतात. तशी असतात पण फार फार कमी. प्रत्यक्षात अशी निसर्गाच्या कुशीतली घरं काळवंडलेली, तडे गेलेली, शेवाळ्याने वेढलेली आणि रिकामी पडलेली, ओळींमध्ये उभी असलेली असंख्य गावांत दिसतील. वास्तुशांत जोरात. गृहप्रवेश उत्साहात. पहिल्या महिन्यात दर विकेंड न चुकता भेट. मग महिन्यातून एकदा साफसफाईपुरते. मग पूर्ण कुटुंब न येता एकच सदस्य सुटसुटीतपणे येऊन गावातल्या बाई किंवा गड्याला पैसे देऊन स्वच्छता करून, बिले भरून जाणे. नंतर गावातच कोणाला किल्ली देऊन आणि गड्याला पैसे देऊन ठेवून स्वच्छता आणि लक्ष ठेवायला सांगणे. फळझाडे असतील तर त्या मोसमात एकदा ती घेऊन जायला फेरी. असा क्रम प्रत्यक्ष निरीक्षणात सर्वात जास्त वेळा आहे. मी स्वतः आणि इतर अनेक. रिटायर झाल्यावर त्या बुक केलेल्या वसाहतीत परसात शेती वगैरे करू असे प्लॅन करून अधिक खोल पर्यावरणीय प्रकारच्या वसाहतींचे प्रयत्न याहून अधिक आपटले आहेत.

In reply to by गवि

माणसाकडे रोजच्या गरजेपेक्षा पैसा जास्त झाला कि तो बहुधा घर बांधायला घेतो- व्यंकटेश माडगूळकर. शहरात साधारण बरा पैसा मिळवणारा माणूस असेल तर त्याचे एक गो $$ ड स्वप्न असते ते म्हणजे एखाद्या शांत सुंदर खेड्यात आपले घर असावे. शहराच्या वर्दळीचा कंटाळा आला कि आपण तिथे जाऊन चार दिवस आरामात राहायचे पहाटे उठून नदीकाठावर फिरून यायचे, गावचे सकस अन्न खायचे, ताजी हवा छाती भरून घ्यायची. निवृत्तीला आलं कि हेच घर आपलं कायमचं घर म्हणू करायचं. नको ती शहरातील गर्दी आणि प्रदूषण. पण प्रत्यक्षात खेड्यात गेल्यावर काय होतं. खेड्यात पहिले १५ दिवस फार मजेत जातात. चार लोक चौकशी करतात. माणसं चार पैसे सढळ हाताने खर्च करतात. एकदा नव्याची नवलाई संपली कि हेच खेड्यातील जीवन बऱ्यापैकी संथ आणि रटाळ वाटायला लागतं. वृत्तपत्र तरी किती वाचणार? घरी टी व्ही संगणक असला तरी निदान चार तास घालवायला चांगला उद्योग नसला तर दिवसभर काय करायचं हा प्रश्न खायला उठतो. बायकांचा बराच काळ स्वयंपाकघरात किंवा घरच्या उस्तवारीत जातो. उरलेला काळ धारावाहिक पाहण्यात जातो पुरुषांना साधारणपणे याची अजिबात सवय नसते. गावच्या लोकांशी गप्पा काय आणि किती मारणार? तिकडच्या लोकांचे प्रश्न तुम्हाला क्षुल्लक वाटतात. तिथल्या राजकारणात मन रमत नाही. शेतीची सवय नसते. गावच्या माणसांकडून काम करून घेणे हे वाटते तितके सोपे नसते. मुंबई पुण्यासारखे वट्ट सहा सात तास तेथे कोणीच कामगार काम करत नाही. पण पैसा मात्र मुंबईच्या दरानेच हवा असतो. जर मुले शहरातच असतील तर खेड्यात जाऊन आपण नक्की काय मिळवलं हा विचार बळावतो. ज्यांची मुले देशाबाहेरच आहेत त्यांचा प्रश्न वेगळा असतो. खेड्यात कचरा व्यवस्थापन हा एक विषय असतो. आपले सांडपाणी/ मैल याची व्यवस्था स्वतःला करायची असते. उन्हाळ्यात हमखास वीज जाते. मग ए सी चालत नाही आणि हिवाळ्यात गिझर चालत नाही कारण एवढा मोठा इन्व्हर्टर किंवा जनरेटर कुणी बसवलेला नसतो. माणसं साधारण चांगल्या हवामानातच खेड्यात जाऊन राहतात. कोकणात प्रचंड पावसाळा असतो. देशावर प्रचंड उन्हाळा आणि हिवाळा असतो. जेंव्हा तुम्ही प्रत्यक्ष राहायला जाता तेंव्हा हे ऋतू किती कठीण आहेत हे जाणवते. वैद्यकीय मदतीसाठी तालुक्याला पळावे लागते. यात गंभीर आजारच सायला हवा असे नव्हे, साधा चष्मा तुटला तरी दोन चकरा माराव्या लागतात. आणि तालुका किंवा जिल्हा पातळीवरची शहरे आता मोठ्या शहरांइतकीच प्रदूषित आणि गर्दीची झालेली आहेत. घर बांधलंय तर त्याची उस्तवार करावीच लागते. मधून मधून शहरात आपली आर्थिक किंवा इतर कामे करण्यासाठी जावेच लागते. तेथे गेल्यावर मग दोन्हीआयुष्याची तुलना होते. या वेळेस ज्यांची विचारांची बैठक पक्की असते. म्हणजे नवरा आणि बायको दोघांची खेड्यात सामावून घेण्याची तडजोड करण्याची मानसिक तयारीअसते तेच लोक परत खेड्यात जातात. बायकोची तयारी नसेल तर मात्र कठीण होतं. प्रत्येकाने केवळ आपले गो $$ ड स्वप्न होतं म्हणून जाणे हे व्यावहारिक नाही. ज्याला जमेल त्याने करावे. अन्यथा परत येण्याचे दोर मात्र कापू नयेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नुसते घरच घेतले की शेत पण घेतले? नुसते घरच घेतले तर हा काही चांगला निर्णय म्हणता येत नाही.

आयटी मध्ये किंवा इतर उद्योगातून रिटायर झाल्यावर गावाकडे का जावे वाटते ? शहरात का नाही ? खर्च कमी असा समज ? उत्तम शुद्ध हवा ? संथ आयुष्याची आवड ? खेड्यात राहण्याची शेतीची आवड आणि शेती असणे शेती किंवा तत्सम उद्योगातून अर्थार्जन ?

In reply to by कपिलमुनी

वैयक्तिक सांगायचं झालं तर… गावाकडे ओढ लागते ती सर्वप्रथम आठवणींमुळे. बापाच्या आठवणी, त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा… जीवाभावाच्या मित्रांची साथ… आणि माणुसकीचा तो ओलावा, जो मनाला आधार देतो. ५० नंतर किमान इतकं तरी वाटतं - उरलेलं आयुष्य थोडं stress विरहित, संथ… आणि मुख्य म्हणजे आपल्यासाठी जगता यावं. IT आणि शहराच्या जीवनाबद्दल तक्रार नाही, पण तिथे अनेकदा नात्यांपेक्षा भूमिका जास्त असतात. मुखवटे घालून जगण्यापेक्षा, जे आहे ते खरं मान्य करून, आपल्या चेहऱ्यासोबत जगणं मला जास्त योग्य वाटतं. शहराला नावं ठेवणं हा हेतू नाही. पण या धकाधकीत माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नसतो, मग तो दुसऱ्यांसाठी वेळ कसा काढणार? म्हणून कधी कधी मन सांगतं -आपलं गावच लय भारी. कारण तिथ कदाचित सुविधा कमी असतील, पण माणूसपण जास्त भेटतं. बाकी पैसा कमावणे, खर्च कमी असणे, शेतीतून पैसा कमावणे हा मला दुय्यम प्रश्न वाटतो.. कारण ज्या माणसाला ५० शी पर्यंत हे नीट करता आले नसेल तो नंतर हि नीट करणार नाही, आणि ज्याला ते आतापर्यंत नीट आले असेल तो ते नीटच करणार... उगाच मी इतकी शेती घेतली.. याव करणार आणि त्याव करणार असल्या टिंग्या हाणणारे खुप बघितले आहेत ये उनकी बस नही... Hope तुला माझी उत्तरे तुझ्या प्रश्ना साठी आवडली असतील.. - गणेशा

In reply to by गणेशा

मी ५० - ५५ नंतर गावी जाण्याचे मूख्य कारण "रूट्स" ! माझ्या पुढच्या पिढीला जुन्या पिढीशी जोडायचा दुवा व्हायचे आहे . बाकी अर्थार्जन शहरातही होते . खेडे स्वस्त नसते . जो किराणा भाव पुण्यात आहे तोच खेड्यात असतो . माझे विचार हे तब्येत चांगली राहणे , मातीशी जोडले जाणे आणि पुढच्या पिढिसाठी रान तयार करणे एवढेच आहे

धागा थोडा भरकटला आहे, सुरुवात आय टी मधील नोकरी कशी टिकवावी यापासुन होऊन आता रिटायरमेंट प्लॅनिंग आणि निवृत्त जीवन कसे घालवावे ईथवर चर्चा आली आहे. पण हरकत नाही. जाणकार लोकांचे प्रतिसाद वाचुन बरेच शिकायला मिळत आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात तसे काहीसे. अवांतर- स्कोअर बोर्ड हलता राहीलाय आणि म्हणता म्हणता धागा शंभरीपार जाणार की. हा ९९ वा प्रतिसाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मूळ विषय पाहता हे भरकटणे फार अवांतर नाही. सुसंगतच आहे. चर्चाही चांगली चालली आहे. आणि शंभरावा प्रतिसाद हा घ्या. चालू घडामोडी किंवा राजकारण वगळता शंभरी गाठणारे धागे आता दुर्मिळ.

सर्व प्रतिसाद वाचून मी काय प्लानिंग केले आहे ते सांगतो. चुक बरोबर सांगू शकता. महीन्याला ठराविक रक्कम मिळेल एवढी गुंतवणुक करुन ठेवणार. गरजा कमी करणार वाढवणार नाही. गावी तालुक्याच्या ठीकाणी एक छोटे घर घेणार. तिथे येउन जाउन राहणार. कंटाळा आला की परत शहरात. शहरात कंटाळा आला की परत तालूका. या तालूक्याच्या ठिकाणावरुन गाव जवळ आहे त्यामुळे तिथेही जात राहणार. मुंबैवरुन तालुक्याच्या ठीकाणी चारचाकी ने जाणार, कारण ड्रायव्हींग ची प्रचंड आवड. तालुक्याच्या ठीकाणी एक दुचाकी ठेवणार. वाचनाची आवड असल्याने आणि भरपुर काही वाचायचे राहून गेल्याने तालुक्याच्या ठीकाणी जाताना भरपूर पुस्तके घेउन जाणार. म्हणजे वीज गेली आणि इंटरनेट नसले तरी वेळ वाचानात जाइल. अजूनही इंटरनेट चा कंटाळा आला की कागदी पुस्तकच वाचतो. मोबाइल वर पुस्तक वाचणे टाळतो. गावच्या शेतीवर फक्त चक्कर टाकणार हे बघायला की कोणी अतिक्रमण तर करत नाही ना. गावची शेती पडीक आहे. ती तशीच ठेवणार. सामायिक आहे. कोणीच लक्ष देत नाही तर मी तरी वरील सर्व गोष्टी करत असताना मुंबईत एक कलेवर आधारीत काम चालू ठेवणार आहे. त्यातून पैसे मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक.

In reply to by खटपट्या

उर्फ सुवर्णमध्य हा उत्तम पर्याय आहे... अजून एक.... स्वानुभवाचे बोल... शरीर थकत चालले की, उत्तम डॉक्टर जिथे असेल, त्याच्या जवळपास रहायचे. अर्ध्या तासात दवाखान्यात, ही उतारवयादाठी, प्रमुख अट. घरी ३ वयस्कर माणसे आहेत आणि त्यांच्या सुदैवानं, डॉक्टर एका हाकत येतात. ------- एक बघितलेले उदाहरण.. आयत्या बिळात नागोबा... त्यामुळं, वडिलोपार्जित जमिनीवर खर्च करत बसू नये... शेळी जाते जिवानिशी.... असली गत होते. आणि वडिलोपार्जित जमिनीवर, शेतीचे प्रयोग करायचे असतील तर, फुकट करायचे. उदा. चिकुची बी, लिंबाची बी, मिरच्यांची बी, पहिला पाऊस पडला आणि जमीन थोडी ओलसर असेल तर, पेरण्याची हौस भागवून घ्यायची. फुकट काम केल्याने, आर्थिक फटका नाही.

मुवी यांचे शेतीविषयक अनुभव वेगळे आहेत. मी सध्या शेती करतो, ६ एकर वडिलोपार्जित आहे ती करतो. उत्तम व्यवस्थापन असेल तर शेती नोकरी सांभाळूनही करता येते. अप अँड डाऊन प्रत्येक बिझनेस मध्ये असतात. काळी आई, पोशिंदा वगैरे भानगड न ठेवता एक्सेल मध्ये हिशोब ठेऊन शेती करतो. माझ्या गाडीच्या डिझेल पासून ते स्वतःच्या पगारा पर्यंत हिशोब जाऊन शेती फायद्यात राहिली पाहिजे आणि ती तशी करतो आहे. ऊस जिंदाबाद

In reply to by कपिलमुनी

तुमचे मुख्य भांडवल इथेच कमी झाले. याच शेतीचा बाजारभाव काय आहे सध्या? आजूबाजूला चौकशी करून सांगा. त्यामुळे शेती फायद्याची जरी केली तरी ब्रेक इव्हन व्ह्यायला कदाचित दशके जातील.

In reply to by कपिलमुनी

सध्याच्या भावाप्रमाणे, २ कोटी ४० लाख... सध्या इतकेच पैसे नॅशनल बँकेत ठेवले तर, दीड लाख रुपये महिना व्याज मिळेल... आणि हेच पैसे Mutual fund मध्ये गुंतवले तर, सोने पे सुहागा... (आमची धाव, Mutual fund पर्यंतच आहे....) म्हणजे, ह्या ६ एकरातून वर्षाला १८ लाख रुपये निव्वळ नफा मिळत असेल तर फारच उत्तम...

In reply to by मुक्त विहारि

हे असे टक्केवारीचे हिशोब जमिनीच्या बाबतीत उपयोगी नसतात, आमच्या बाबांनी २००० साली ही विकली असती तर १२ लाख आले असते , मग आता काय हरी हरी केले असते का ? बाकी शेतीमध्ये घाम गाळला की पैसा येतोच .. या वर्षी ९५ टनेज आले, आले कि फंडात टाकतो, नोकरी वर बाकी चालतय,, ० % व्याजाने पैसे मिळतात , ते वापरायचे..नुसती काकडी केली तर ३ महिन्यात ३ लाख मिळतात शिवाय सगळे टॅक्स फ्री ! नोकरीचा माज शेतात जिरवण्यापेक्षा शेतीचा माज नोकरीत दाखवतो ! तरी नारळ , आंबे , केळी , शेवगा विकत नाही यावे त्याने घेउन जावे ! आपण घाटारवचे आहोत :) text

In reply to by कपिलमुनी

>> हे असे टक्केवारीचे हिशोब जमिनीच्या बाबतीत उपयोगी नसतात असे कसे नसतील? वडिलोपार्जित जमिनी असणार्‍या आणि त्यात बागायती जमीन असणार्‍या लोकांना शहर सोडून गावात जाऊन राहणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे. शेती कुणी विकत नाही त्यामुळे किमंत अजून वाढते ती वाढते पण नव्याने शेती करु इच्छिणार्‍या कुणालाही शेती करण्यासाठी गाव गाठणे हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरेल.

In reply to by कपिलमुनी

आणि स्वतः विकत घेतलेली जमीन आणि ती पण, दुसऱ्या गावात...ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे....

वरील पोस्ट मधे हे बिग ४ कोण आहेत? सायबर सिक्युरिटी मधले बिग ४ आहेत की आपले witch मधले बिग ४. witch वाल्यांना आमच्या इंडस्ट्रीत फार मान नाही. किंबहूना त्यांना माथाडी कामगार किंवा बॉडी शॉपर्स असाच शिक्का होता. त्यामुळे ही मंडळी जास्त लवकर आउटडेटेड होतील.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

माझ्या पहिल्या बॉसचे एक धोरण होते की त्याने कधीही ex witch लोक हायर केले नाहीत. इंटरव्यूलाच कधी बोलवायचा नाही. तीच परंपरा आम्ही पुढे चालवली. एकेक अत्यंत पथेटिक नमुने मिळत. शिवाय ते बेंच वगैरे हॉरिबल प्रकार त्यांच्यात असत. होयबा वृत्ती, नाही म्हणायचे टाळणे, पाट्या टाकणे असे प्रकार सर्रास करत.

१. माथाडी कामगार कमी दर्जाची माणसे आहेत २. एखादा माणूस कोणत्या कंपनीत काम करतो या आधारे त्याला मान द्यावा किंवा त्याचा अपमान करावा. ३. विशिष्ट ठिकाणी काम करणारी माणसे outdated व्हावीत त्यांनाही कोणी विचारू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसावे आणि त्यांना शिव्याशाप द्यावेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

ही स्टेट्मेंट आहेत की प्रश्न आहेत? स्टेटमेंट असतील तर त्यांचा कडाडुन निषेध करतो. एक्स विच म्हणजे टी सी एस, ईन्फोसिस, विप्रो हेच ना? तर मग हे लक्षात घ्या की भारतीय आय टी ईंडस्ट्री हेच लोक चालवतात न की के पी एम जी, डेलॉईट वगैरे. दुसरे म्हणजे प्रत्येक कंपनीत होयबा आणि पाट्या टाकणारे लोक असतातच. त्याचे असे जनरलायझेशन करणे चूक आहे की एक्स विच मध्येच अशी लोक असतात. हे म्हणजे सगळे आय आय टीयन हुशार आणि लोकल ईंजीनियरिंग वाले माठ किवा यच्च यावत सरकारी बाबूलोक खाबू /कामचुकार असतात असे म्हणण्याप्रमाणे आहे. निती आयोग, रिझर्व बँक, एन पी सी आय, एम एम आर डी ए वगैरे सारख्या ठिकाणी किवा गेला बाजार जिल्हा परीषदेच्या बी डि ओ लेव्हलशी एकदा बोलुन बघा. अक्कलहुशारी म्हणजे काही कोणा एका कंपनीचा मक्ता नाही. तेव्हा आपल्याला दोन शिंगे आहेत अशा भ्रमात कोणी राहु नये.

गावाला राहायच्या गोड स्वप्नासाठी भाड्याने वगैरे घर न घेता गावाकडे एकदम ५०-६० लाख टाकून घर घेणाऱ्याना मी कोपरापासून वंदन करतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आमच्या साडूने 2015 मध्ये 65 लाखात घर घेतले , Farm house.... आता तेच घर 60 लाखात विकायला काढले आहे... सगळीच गंमत आहे.... बाय द वे, आज सूर्य पश्चिमेला उगवला होता का?

आत्ता सगळ्यांना "माझे पुढे काय" ही चिंता पडली आहे. त्यात 2 गोष्टी सांगतो. एका विशिष्ट वयानंतर तुमच्याकडं स्किल्स कमी असतील तरी ती स्किल वापरण्याचा अनुभव बऱ्याच वेळेस तुम्हाला नवीन skilled लोकांवर edge देऊन जातो. बाकी, आज सगळे जण AI च्या भीतीत आहेत. पण AI ची खरी कुऱ्हाड ही नवोदित लोकांवर पडत आहे. 2020 मध्ये ज्यांनी मोठ्या आशेने कॉम्प्युटर साठी प्रवेश घेतला त्यांना बाहेर पडताना असे दिसते आहे की जी स्किल आपण जीव तोडून शिकत आहोत त्यांना बाहेर किंमतच नाही, आणि value मिळण्यासाठी जो अनुभव हवा तो आपल्याकडे नाही. हा एक खूप मोठा paradox आहे आणि बहुतेक ठिकाणी हा विषय चर्चेत असतो आमच्यासाठी तरी. अवांतर, पुढची 5 वर्षे तरी आपल्या नोकऱ्यांना मरण नाही, ही गोष्ट खरी आहे की आपण आयुष्यभर जी स्किल घासली ती अचानक कालबाह्य झाली आहेत.. IT मध्ये technology हे मुख्य स्किल कधीच नव्हते, स्किल होते ते problem solving. ते जर तुमच्याकडे असेल तर टेक्नॉलॉजी हे केवळ एक टूल बनते. कालपर्यंत java code लिहत होतो तर आज prompt लिहितोय. पण मुळात लिहितोय कशासाठी, कोणतातरी problem सोडवण्यासाठी. अशा प्रकारे विचार केला तर मग AI ची भीती वाटण्याऐवजी वरदान वाटू लागेल. त्यामुळे माझ्या जॉबचे काय होईल यापेक्षा आता माझ्या हातात काय आहे आणि त्याचा मी कसा वापर करून घेऊ शकतो हा विचार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. जगाचे भविष्य फार वेगळे आणि अनपेक्षित असणार आहे, त्यामुळे मी पुढच्या 2 वर्षांपलीकडे प्लॅनिंग करणे बंद केलेलं आहे. मला माझ्या एका stable employer ने 8 वर्षे experience असताना अचानक असा दणका दिला की त्यानंतर मी जॉब सिक्युरिटी वगैरे शब्द पूर्ण विसरून गेलो .मी जेव्हा freelancing करायचो तेव्हा पण नेहमी 2 महिन्यापलिकड विचार करत नसे, आणि आताही मला असेच वाटते. एक गोष्ट आहे.. 1. तुमचे राहते घर लोन फ्री आहे का? 2. तुमची नोकरी गेली तर जगण्याइतके कमावण्यापुरती स्किल तुमच्याकडे आहेत का या 2 प्रश्नांची उत्तरे हो असतील तर फार विचार करू नये. फक्त रिकामे बसू नये. 2018 मध्ये जेव्हा मी एक चांगले काम सोडले तेव्हा माझे उत्पन्न अचानक 20 टक्के झाले. But I just survived. नंतर पुन्हा हळूहळू कामे वाढत गेली, नंतर नोकरीत पुन्हा आलो आज परत चांगले कमावतो. थोडक्यात, भीती डोक्यातून काढून टाकणं आणि survival skills मिळवणे याकडे लक्ष ठेवणे चांगले

In reply to by आनन्दा

उत्तम प्रतिसाद. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचा मुद्दा आणि अतिशय सहमत. फ्रीलांसिंग अनुभवाबद्दल आणखी तपशील लिहाल का? हल्लीचे चित्र काय आहे ?

In reply to by आनन्दा

प्रॉब्लेम सॉल्विंग बद्दल नेहमी असा स्टॅन्ड घेतला जातो. परंतु मला हे तितकेसे पटत नाही. मुख्य मुद्दा हा आहे की टूल म्हणजे काय आणि टूल ऑपरेट करणारी बुद्धिमत्ता म्हणजे काय यांच्यामधील द्वंद्व हे आधी एस्टॅब्लिश करावे लागते. पूर्वी बैलांनी नांगरणी करायची तेव्हा बैल आणि औत हे टूल होते. त्यानंतर ट्रॅक्टर आले आणि लोक ट्रॅक्टर नी नांगरणी करायला लागले त्यात त्याही केस मध्ये ट्रॅक्टर हे टूलच होते. परंतु आत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ टूल नसून स्वतःचा विचार करू शकणारी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला मानवी डेटावर ट्रेन केले असल्यामुळे मानवाचे जेवढे बायस आणि मानवाच्या जेवढ्या वैचारिक प्रणाली आहेत त्या सगळ्या तिलाही लागू आहेत किंबहुना त्या सगळ्या एकदम कंजूम करून त्यातून वैचारिक घुसळन करण्याची त्या यंत्रणेची क्षमता प्रचंड आहे त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला केवळ टूल म्हणून उपयोग नाही. प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करणारा हा माणूसच असे आणि कोडींग लँग्वेज ही एक टूल असे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करणारी गोष्ट माणूस नसून कृत्रिम बुद्धिमत्ता असू शकते आणि गरज वाटल्यास ती नव्हे टूल्स देखील निर्माण करू शकते. माणूस इथे फक्त प्रॉब्लेम सांगण्यापुरता आहे. पुढे कदाचित त्याचीही गरज उरणार नाही. त्यामुळे मला हे प्रॉब्लेम सॉल्विंग चे ऑर्ग्यूमेंट पटत नाही. म्हणून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवर विषयी बोलताना नेहमी कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्वतंत्र विचारशक्ती असलेली मानवाच्या समकक्ष प्रणाली म्हणूनच द्वंद्व स्थापित करून त्यावर चर्चा केली पाहिजे ती केवळ एक टूल आहे असे मानले तर या चर्चांना अर्थ राहत नाही. कारण एखाद्या टूलचा वापर करून आलेली क्षमता म्हणजेच स्किल्स आउट डेट होण्याची कालमर्यादा ही आयटी क्षेत्रामध्ये सात ते आठ वर्षांच्या वर तशीही नव्हतीच. म्हणून हा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधीचाही आहे की जुन्या स्किल चे काम गेल्यावर काय करावे? त्याविषयी चर्चा करण्यात मला काही फार गेन आहे असे वाटत नाही.

In reply to by आनन्दा

असेंबली लँग्वेज मध्ये एकेकाळी लोक प्रोग्रॅम करत त्यानंतर वरच्या ऑर्डरच्या भाषा येत गेल्या. त्या भाषा लिहायला ( प्लीज नोट भाषेमध्ये लिहायला नावे तर भाषा लिहायला) दुसऱ्या भाषा जुन्या वापराव्या लागतात म्हणजे कम्पायलर वगैरे लिहायला. म्हणजे भाषेमधून नव्या भाषांची निर्मिती होते एका प्रकारचे हे मेटा प्रोग्रामिंग असते. . आधीची भाषा नव्या भाषेचे आणि नव्या प्रगत गोष्टींचे जनन करत असते. त्या नव्या भाषा वापरून पुढच्या दर्जाच्या नव्या भाषात निर्माण करणे ही एक एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे मात्र हे सगळे करायला मानवी बुद्धिमत्ता आणि श्रम लागत. अँथ्रोपिकचे सीटीओ म्हणतात की अँथ्रोपिकचा प्रत्येक कोड हा 100% एआयनीच लिहिलेला आहे. जेव्हा आधीचा एआय पुढच्या जनरेशनचे एआय लिहू शकतो तेव्हा हा एक्सपोनेन्शियल ग्राफ प्रचंड मोठा आहे. याला सध्या फक्त वास्तवात असलेले फिजिकल रिसोर्सेस ह्याच मर्यादा आहेत म्हणजे जसे की वीज पाणी रेअर अर्थ मेटल्स प्रोसेसर. एएसएमएल ही कंपनी वेफर तयार करणारी मशीन तयार करते. व्हेरी टासियम या युट्युब चॅनेलने एस एम एल वरती एक सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यास असे लक्षात येईल की मानवी कल्पनाशक्तीच्या अत्युच्च प्रेरणेने आणि प्रचंड जिजीविषेने आपण हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक तयार केले आहेत. आता एआय वापरून हेच बेसिक बिल्डींग ब्लॉक्स आपण अजून प्रचंड मोठी मजल मारू शकतो. म्हणून मेटा प्रोग्रामिंग करणारा एआय केवळ आयटी क्षेत्रापुरत्या जॉब शीत संबंधित नाही तर सबंध जगातच उलथा पालथ घडवू शकतो

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तुम्ही जो विचार करताय तो वेगळ्या स्तरावरचा विचार आहे. त्याबाबतीत माझे मत अजून वेगळे आहे. जेव्हा AI पूर्ण विकसित होईल तेव्हा पृथ्वीवर असलेली 70% माणसे, किमान 70टक्के म्हणतोय, हे redundant होतील. पण तिथपर्यंत जायला अजून 5 वर्षे आहेत. त्यामुळे 5 वर्षांनी आपण जिवंत असू की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. AI खरेच तसे वागायला लागला तर माणसे AI जिवंत ठेवतील का हा सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे. I am talking about near future. पुढच्या 2 वर्षात तुम्ही जर AI सोबत जुळवून घेतले नाही तर तुम्ही out of market असणार आहात. तेव्हा आधी ते करा. आपल्याकडे जे आहे, आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत ते आपण AI ने सोडवून monatize करू शकतो का ते पाहा. तरच तुम्ही सर्विस व्हाल. मी परत तेच सांगतो, की उद्या नोकरी गेली तर किमान जगण्यापुरते पैसे मिळतील इतके स्किल आपल्याकडे आहेत का याचा विचार करा, आणि त्याकडे लक्ष द्या. बास. याक्षणी दुसरे काही नको. अवांतर, AI च्या प्रगतीतील दोन मोठे अडथळे सध्या quanton physics आणि nanotech हे आहेत. मी असे म्हणत नाही की त्यावर उत्तर मिळणारच नाही, पण ते मिळाल्याशिवाय wide spread क्रांती होऊ शकत नाही. आणि आत्ताच वेग बघता त्याला साधारण 3 वर्षे यासाठी लागतील. अर्थात ही काही निश्चित मर्यादा नव्हे कारण हा वेग वाढताना linear नसून exponentially वाढत आहे. पण तरी मला 3 वर्षे ही मर्यादा वाटते, त्यानंतर सगळ्या क्षेत्रात AI येण्यास ajun 2-5 वर्षे. तोपर्यंत आपण शिल्लक राहू ना हे आधी बघायचे. बाकी सगळे नंतर.

AI नंतर.. शहर.. गाव.. मनातली दरी.. या प्रतिसादा ला थोडे पुढे लिहितो आहे... ------- बदल म्हणजे काय? मुळात बदल म्हणजे आपली नजर बदलणे. नव्या जगाकडे नव्या नजरेने पाहणे. पण मनातले पूर्वग्रह तसेच ठेवले, तर केवळ शहर बदलून काही उपयोग होईल का? शहरातील गोंगाटाचा त्रास होतो म्हणून गावाकडे जाऊनही दारं-खिडक्या soundproof च करायच्या असतील, तर मग गावात जायचंच कशाला? त्या इथं हि करता येतात.. जर माणसांत मिसळून समरसून जगता येत नसेल तर शहर काय आणि गाव काय? गावी, नव्यानं ..नवं आयुष्य सुरू करताना जुन्या चौकटी बाजूला ठेवल्या पाहिजेत. नव्या अनुभवांना सामोरं जाताना त्रास होईल, थोडं अडखळूही. पण त्यातच तर मजा आहे. कितीतरी गोष्टी पुन्हा नव्याने करता येतील. कितीतरी नवीन माणसं भेटतील. प्रत्येक गाव वेगळं असतं. तसंच प्रत्येक माणूसही वेगळा असतो, त्याची पार्श्वभूमी, त्याची जातकुळी, त्याचा स्वभाव वेगळा. जर आपण पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच लेबल लावत फिरणार असू, तर गाव किंवा ती माणसं थोडीच थांबणार नाहीत - थांबू आपणच. आणि मग “दोन वर्षे गावात काढली” असं म्हणताना प्रत्यक्षात आपण फक्त तो वेळ तो काळ वाया घालवलेला असेल. हे सगळं ऐकायला कदाचित आदर्शवादी वाटेल. आणि असंच जगायलाच हवं, असा माझा हट्टही नाही. पण एक साधा प्रश्न आहे – ‘मी’ सोडून ‘आपण’ हा भाव जर मनात येत नसेल, आणि तसं जगण्याची उमेद आता उरली नसेल, तर मग आहे ते घर सोडायची गरजच काय? हे जग बदल स्वीकारतं आहे. आपणही बदललो पाहिजे. हाच निसर्गाचा नियम आहे. – गणेशा

In reply to by गणेशा

गावाकडे कोणताही धरबंध नसतो. पहाटे साडे तीनला कुणाच्या तरी मनात येते तो दे दणादण अभंग आणि भक्तिगीते लावतो. एखादे जागरण गोंधळ असेल तर जितके पॉवरफुल साउंड सिस्टम तेव्हडे ते भारी असा काहीतरी कमालीचा गैरसमज असतो. रात्रभर त्यातले बेंबीच्या देठापासूनचे चिरकणे ऐकून तुमची झोप खराब झालेली नाही वाटतं. लग्न बिग्न या गोष्टी तर सोडूनच द्या. आमच्या गावच्या जत्रेत ओळखीच्या एका लहान मुलाचे कान कायमचे कामातून गेले. इतके प्रचंड साउंड सिस्टम सोडलेली असते. शहरात देखील वाढदिवस, इतर सण, मिरवणुका यांना ऊत आलेला असतो. मग ज्यांना शांत झोप हवी आहे त्यांनी कुठं जायचं? झोप सोडून द्या, आवाजाचा त्रास सगळ्यांनाच होतो. टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा ध्वनी प्रदूषण हे खूप लोकल होते. अशा ध्वनी प्रदूषणांमुळे पक्षांना मेटिंग कॉल्स देखील देताना त्रास होतो, त्याचा परिणाम त्यांची एकूण संख्या घटण्यावर होतो. त्याचा परिणाम पुन्हा पिकांवर होतो. जर्मनीत जनतेला शांततेचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांच्या मुलभूत अधिकारांत शांततेचा अधिकार घालणे खूप गरजेचे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

भारत, गंमतशीर लोकांचा, गंमतीदार देश आहे.... मेरा काम बनता, भाड में जाय जनता...

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गावाकडे कोणताही धरबंध नसतो.
मुळात ध्वनी प्रदूषण हे कोठेच नसले पाहिजे मग ते गाव असो वा शहर हे रास्त आहे, आणि त्रास होणाऱ्याने काहीच वयक्तिक करता आले नाही तर sound proof केल्यास हा त्याचा वयक्तिक प्रश्न नक्कीच आहे.. आणि त्यात वावगे असे काहीच नाही... परंतु गावात जाऊन 'गावाकडं कोणाचा कोणाला धरबंध नसतो, असेच म्हणायचं असेल तर नक्कीच गावात जाऊ नये इतकेच... व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या सर्वत्र सर्व स्थरात असतात, त्याला ना आपले गाव अपवाद आहे ना शहर... माझ्या नशिबाने मी राहिलेली - उंडवडी सुपे (माझे गाव), डोंगरात वसलेले पांगारे भाटमळ वाडी, लोणी भापकर अशी कित्येक गावे आहेत, जेथे ७-८ ला माणसे झोपी जातात.. एक मिट्ट शांतता सर्वत्र पसरलेली असते.. आणि दिवस भराचा थकवा आपोआप ह्या मिट्ट शांततेत विरघळळा जातो . हि भावना ज्याने अनुभवली आहे त्याला ती खरी वाटते. आणि मला तरी ती शहरांत वयक्तिक रित्या जाणवली नाही.. रहाटनी - पिंपळे सौदागर सारख्या pcmc च्या पुढरलेल्या वस्ती जवळ राहतोय.. पण वाढदिवस, ते त्यांचे फटाके, लग्न वराती.. जयंत्या फलांना आणि मिरवनुका व dj आणि lights इथं तरी कुठे कमी आहे काही? पण इतर गोष्टी जसे कि job, सुविधा,शिक्षण व इतर यासाठी माणुस adjust करतोच आहे.. तसंच गावांत ज्याला करता येणार नाही त्याने जाऊ नये असे मला वाटते.. जर्मनी च्या शांतते बद्दल बोलला, ऐकले आहे.. आणि ते खरेच वाखणन्या जोगे आहे त्यात दुमत नाहीच.. जर कुणी गावात डॉक्टर नाहीत, कामाला माणसं नाहीत, सुविधा कमी आहेत म्हणून नावं ठेवत असेल… आणि त्याच वेळी परदेशात जाऊन तिथे सगळं adjust करत असेल, तर प्रश्न सोयींचा नसून मानसिकतेचा आहे हेच माझे म्हणणे आहे. गावात राहणं म्हणजे फक्त शांतता नाही; शहरात राहणं म्हणजे फक्त सुविधा नाहीत. दोन्हीकडे किंमत द्यावीच लागते. --- गाव असो किंवा शहर - माणसं तिथेही माणसंच असतात. फरक जागेचा कमी, नजरेचा जास्त असतो. जर कुणी आधीच ठरवून गेलं की “हे लोक असेच असतात”, तर त्याला तेच दिसणार. उघड्या मनाने गेलं, तर चांगुलपणाही सापडतो. आणखीन एक, इथं बऱ्याच जणांनी शेती हि न परवडनारी गोष्ट आहे, तसे कराल तर उलटे पडाल हे लिहिले आहे.. हे मान्य केल्याने बरे वाटले.. कारण शेती, शेतकरी आणि त्याचे जीवनमान या बद्दल खरेच खुप आस्था आहे.. - गणेशा