भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?

उपयोजक काथ्याकूट
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्‍या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का? वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल. नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही. भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली. आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण

78 टिप्पण्या 9,449 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

वामन देशमुख नवीन

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का? -- याआधीही लिहीलेले पुन्हा लिहीतो - अकरा वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने - १. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केली आहे का? २. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का? माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती. --- संघही फारसा वेगळा नाही. "डीएनए एकच आहे" असा गोंधळ उडवून दिला होता त्यांनी तर!

आग्या१९९० नवीन

नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही. बदल नक्कीच होणार. वक्फ जमिनी आता मित्रांच्या उद्योगांना मिळणार. वक्फने दावा केला तरी वर्षानुवर्षे निकाल लागणार नाही. सरकार वक्फ बोर्डाला अधिक भ्रष्ट करेल. मुस्लिम समाजाला काडीचा फायदा होणार नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

टाळ्या. असे होणार असेल तर खूप आनंद वाटेल व त्यासाठी मोदी सरकार अभिनंदनास पात्र असेल

आग्या१९९० नवीन

In reply to by श्रीगुरुजी

खूप नाचा आता. तुम्हालाही काडीचा फायदा होणार नाही आणि सरकारलाही फूटी कवडी मिळणार नाही. आता हा भ्रष्ट पैसा नष्ट करण्याकरात परत देशाला वेठीस धरा.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

जसा काही या विधेयकापूर्वी आमच्या व तुमच्या घरात धनाचा झरा खळखळून वाहत होता आणि आता तो झरा आटणार. अदानीकडे जमीन जाऊ दे वा अंबानीकडे, वफ्फकडून जमीन सुटणार असेल तर यापेक्षा अधिक आनंद दुसरा तो काय.

आग्या१९९० नवीन

In reply to by श्रीगुरुजी

माझे तरी आर्थिक झरे कायम खळखळून वाहत होते आणि वाहत आहेत, तुमचे तुम्हालाच ठाऊक. ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की. परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की. काय सांगताय काय. असेल बोवा. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी भाजप समर्थकाला आर्थिक फटका बसणार असेल तर तुमच्यासारख्या मुस्लिमप्रेमींनी आनंदाने नाचत शिरकुर्मा आणि खजूर वाटले पाहिजे. परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार? ही अफूची गोळी इतकी प्रभावी आहे की हिंदूंना आर्थिक फटका बसणार असूनही मुस्लिमप्रेमीच रडत बसलेत.

उपयोजक नवीन

In reply to by आग्या१९९०

ही शांतिप्रिय समाजाच्या पूर्वजांची सदाचारी कृत्ये बघता ही शिक्षा कमीच वाटते. शिवाय उद्योगांना जमीनी दिल्या तर काही लोकांना रोजगार तरी नक्की मिळेल. दहशतवादी कृत्यांसाठी त्या जमीनींचा वापर होणार नाही इतकं नक्की.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

"While addressing the Lok Sabha over the Waqf Amendment Bill, ..Amit Shah clarified that the non-Muslim members will be included in the council and Waqf Board, but would only look after the administration of property donated by someone under Waqf Law." मर्जीतले निवृत्त होयबा आ ए एस अधिकारी नेमायचे आणि जी व्यक्ती/संस्था जमीन देणार आहे, त्याची माहिती राजकीय बॉसना द्यायची. हे कामाचे स्वरूप असणार आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/why-will-non-muslims-be-part-of-waqf-board-amit-shah-clarifies/articleshow/119910275.cms

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by श्रीगुरुजी

जमीन दान देणार्यानी मग ई.डी.ची नोटीस आल्यावर सत्ताधारी पक्षाला देणगी दिली की ते देशप्रेमी अन्यथा ते मुस्लिमधार्जिणे.

आग्या१९९० नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट, नेते विकत घ्यायचे आणि पक्ष मजबूत करायचा. आमचा पक्ष पूर्वीचा राहिला नाही असे म्हणत अंधभक्त बसतात विव्हळत .

आग्या१९९० नवीन

In reply to by उपयोजक

आदिवासी हे इथले मूळचे नागरिक. त्यांच्या जमिनी शाबुत आहेत. अर्थात वक्फ ही सुरुवात आहे, पुढचा घाला आदिवासींच्या जमिनींवर आहे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर जमिनीची व्यवस्था लागू दे. नंतर आदिवासींसाठी गळे काढा. दरम्यान अलिबागमध्ये १९० घरे होतील आणि मातोश्री-१०० होईलच.

आग्या१९९० नवीन

In reply to by श्रीगुरुजी

प्रथम आदिवासींचा गळा घोटला जाईल. वक्फ जमिनी बळकावण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो, तसे आदिवासींच्या बाबतीत होणार नाही. अर्थात तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. तेव्हडा तुमचा अभ्यासही नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

बाकी अभ्यासाचं म्हणाल तर नेपाळ्यांना बेड्या न घालता अमेरिकेने परत पाठविले या गुप्त बातमीतून तुमचा सखोल अभ्यास सर्वांना समजला होता.

आग्या१९९० नवीन

In reply to by श्रीगुरुजी

खरड फळ्यावर तुमचा अभ्यास दिसला. माझ्यामुळे तेथून पळ काढावा लागला तुम्हाला. इथूनही लवकरच पळाल.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आग्या१९९०

मी कोठूनही पळ काढत नसतो. मी तुमच्या आणि काही इतरांच्या पुड्या उघडकीला आणून त्यांचघ थापेबाजी उघडकीस आणतो. तुमची नेपाळ्यांची थाप मीच उघडकीस आणली होती याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय.

टीपीके नवीन

In reply to by आग्या१९९०

अहो खरंच माहीत नाही. जे माहीत नाही ते महती आहे हे दाखवायला मी पुढारी नाही. एकूण ही नक्षलवाद्यांची नवीन लोणकढी थाप दिसते आहे, म्हणून तुम्ही काहीच सांगू शकत नाहीये. द्वेष द्वेष आणि द्वेष या द्वेषापायी घर संसार उघडे पडतात, राज्य / राष्ट्र नेस्तनाबूत होतात, इतकेच काय समाज आणि संस्कृतीही लयाला जाऊ शकते. अर्थात तुम्ही यशस्वी होउ शकता.

आग्या१९९० नवीन

In reply to by टीपीके

अहो खरंच माहीत नाही. ओके. The Forest Rights Act (FRA), 2006 ला सौम्य करण्याचे प्रयत्न कोण आणि कधीपासून आणि का करत आहेt ह्याचा अभ्यास करा. आदिवासी ते वनवासी मागील षडयंत्र काय आहे हे समजून घ्या.

टीपीके नवीन

In reply to by आग्या१९९०

या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही. विरोधी पक्षही आवाज उठवताना दिसत नाही. पडद्यामागे काही घडतंय का? नक्की काय बदल होणार आहेत? त्या मुळे कोणाचा कोणता फायदा आणि कोणाचे कोणते नुकसान होणार आहे? तुम्ही फार सविस्तर नाही पण संक्षिप्त मधे सांगितलं तरी चालेल. माहितीचा स्त्रोत काय आहे?

रामचंद्र नवीन

In reply to by श्रीगुरुजी

मातोश्री...> या बाबतीत मुख्यमंत्र्यांची एरवीची कार्यक्षमता अजून तरी दिसली नाही. काहीतरी दीर्घसूत्री कार्यक्रम दिसतोय. की छुपी हातमिळवणी?

आग्या१९९० नवीन

In reply to by रामचंद्र

या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही. सध्या विरोधकांच्या बातम्या माध्यमांनी दाखवणे जवळजवळ बंद केले आहेत. शोधले तर सापडेल.

वामन देशमुख नवीन

In reply to by आग्या१९९०

सध्या विरोधकांच्या बातम्या माध्यमांनी दाखवणे जवळजवळ बंद केले आहेत. शोधले तर सापडेल.
आत्ताच मीही संबंधित बातम्या शोधून काढायचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही. तुमच्याकडे काही sources असतील तर ते पाहायला आवडतील.

अमरेंद्र बाहुबली नवीन

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? अहो, आज भाजीपाला ताजा राहिला नाही, माणसात माणुसकी राहिली नाही, जमिनीत पोत राहिली नाही, पाण्यात गोडवा राहिला नाही, शब्दात धार राहिली नाही, राजकारणात निष्ठा राहिली नाही, भाषणात खरेपना राहिला नाही, सत्तेत पवार राहिले नाहीत पुण्यात संस्कृती राहिली नाही, मिपावर डूआयड्या राहिल्या नाहीत! आणी तुम्ही भाजपचे घेऊन बसलात? ख्या ख्या! ख्या ख्या!

अमरेंद्र बाहुबली नवीन

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? कधी होता? Ans to this questions like that भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? -ताजमहाल मध्ये पुन्हा नमाज पठनाला परवानगी कुणी दिली? - कंदाहार ला जाऊन अतिरेकी कुणी सोडले? - ⁠लाख सैन्य मेले तरीही चालतील पण सीमा ओलांडायची नाही, असा ताठर बना ठेवून कारगिलवेळी सैन्याला सीमा कुणी ओलांडू दिली नाही? - ⁠कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना फोडून संपवायचा प्रयत्न कुणी केला? - ⁠ वक्फ बोर्डाला लोकसभा निवडणुकीनंतर १० कोटी देऊन दौलतजादा कुणी केली? - ⁠कितीही सैनिक मेले तरीही “कडी निंदा” म्हणून थंड पडणारे नेते कोणत्या पक्षात आहेत? - हिंदूंच्या अपूर्ण राममंदिराच्या उद्घाटनाचा इवेंट करून मते खायचं प्रयत्न कुणी केला? - काश्मिरी ब्राह्मणांचा प्रश्न सोडवला का? - सौगात ए मोदी किट वाटून कूरवाळण्याचा प्रयत्न कुणी केला? ह्या प्रश्नांचे उत्तरे मिळवायचा प्रयत्न करा, हिंदुत्वाशी ० संबंध असलेल्या भाजप सारख्या पक्षांना हिंदूहीतैशी म्हणणे थांबवा!

चंद्रसूर्यकुमार नवीन

भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्‍या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
नाही झाली असे वाटत आहे का? मग पुढच्या वेळेस मतदान करताना पुढील पैकी एका पर्यायाला मत द्या- Owaisi mamata akhilesh Tejaswi Ubatha raga मोदी सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात पुरेसा बदल केला नाही म्हणून हिंदुत्ववादी नाराज झाले आणि मोदींना धडा शिकवायचा या उद्देशाने वक्फ बोर्डाला कोणाच्याही जमिनी आणि घरे हडप करायची अमर्याद ताकद देणार्‍यांनाच मते देऊन परत आले. आपल्या लोकांकडे सारासार विचार करायची कुवत का नसते समजत नाही. मोदींना अजिबात सोने लागलेले नाही. जर मोदी अपेक्षेइतके काम करत नसतील तर ते काम करायची अधिक शक्यता असेल त्याला मत द्यायचे सोडून मोदींपेक्षा हजार पटींनी वाईट पर्यायांना मते देऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून का घेतात समजत नाही. पर्याय शोधायचा असेल तर आता उपलब्ध असलेल्यांपेक्षा तो पर्याय अधिक चांगला हवा- वाईट नाही एवढी अक्कल आपल्या लोकांना नसते? मागच्या वर्षी आपल्या लोकांनी तोच गाढवपणा केला. ४ जूनला थोडक्यात बचावलो. जर ओरिसा, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी पण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा राज्यातील मतदारांप्रमाणे गाढवपणा केला असता तर काय झाले असते त्याचा विचार करूनही जीवाचा थरकाप होतो. अगदी आताआतापर्यंत उबाठाचे लोक 'आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली? त्याच मतदारांनी २०२४ मध्ये केवळ आणि केवळ मोदींच्या विरोधात म्हणून उबाठाला एकगठ्ठा मते दिली- आणि आपले बिनडोक मतदार- मोदींनी हिंदूंसाठी पाहिजे तितके केले नाही म्हणून, किंवा स्थानिक उमेदवार आवडला नाही म्हणून किंवा अजित पवार बरोबर आलेले आवडले नाही म्हणून किंवा अन्य काही कारणांनी त्याच हिरव्यांबरोबर मत देऊन परत आले. एवढी साधी गोष्ट आपल्या लोकांना का कळत नाही हे न उलगडलेले कोडे आहे. असो.

वामन देशमुख नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

... एवढी साधी गोष्ट आपल्या लोकांना का कळत नाही हे न उलगडलेले कोडे आहे.
साधी गोष्ट आहे. मोदी-संघ-भाजप यांनी कितीही गुंढण आपटून घेतले तरी त्यांना हिंदवेतर मते मिळणार नाहीतच. त्याउलट, सबका साथ सबका विकास, एकच डीएनए, एक हाथ में कुराण एक हाथ में कम्पूटर, वक्फ कायद्यात केवळ धूळफेक करण्याचे बदल, आम्ही काही बाबरी पाडली नाही, कोण पाडली माहित नाही अशी डांगू भूमिका, नुपूर शर्मा प्रकरणात जीव गमावलेले असंख्य हिंदू, पाठ्यपुस्तकात अजूनही होत असलेला मोघलांचा गौरव, श्रीमंत हिंदू मंदिरे अजूनही सरकारी ताब्यात, शिक्षण हक्क कायद्याखाली होणारी हिंदू संस्थांची गळचेपी, सिनेमासारख्या माध्यमांतून वाढत्या प्रमाणात होत असलेली हिंदू श्रद्धेची विटंबना... या सगळ्यामुळे हिंदुंची मते मात्र दुरावली आहेत. "मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" अशी हिंदूंची मनोधारणा झालेली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती काही अंशी प्रतिबिंबित झालेली आहे. ज्याप्रमाणे केजरीवालांनी मध्यमवर्गीयांना भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे खोटे स्वप्न दाखवून स्वतः मात्र त्यातच अभूतपूर्व कामगिरी केली त्याप्रमाणे संघप्रणीत मोदींनी हिंदूंना "अच्छे दिन आने वाले हैं" असे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात मात्र "सौगात-ए-मोदी" दिली आहे. --- मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे. मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे? --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by वामन देशमुख

मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?
समजा मोदी मतदारांना मूर्खात काढत असतील तर त्यांना शिक्षा करायला म्हणून हे मतदार ज्यांना मत देतात ते दहापटींनी अधिक मूर्खात काढतात एवढेही समजू नये? या बाबतीत हिरव्यांना मानले. १९९८ पासून सहा वेळा बंगालमध्ये अधीररंजन चौधरी लोकसभेवर निवडून गेले होते. पण २०२४ मध्ये युसूफ पठाण हा उमेदवार तृणमूलने दिल्यावर हिरव्यांनी अधीररंजन चौधरींना दिले सोडून आणि युसूफ पठाणला भरभरून मते दिली. अधीररंजन चौधरी हिरव्यांसाठी जे काही करत होते ते त्यांची अपेक्षा पूर्ण करणारे असेल असे वाटत नाही. मात्र चौधरी आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत म्हणून ते मतदार त्याच्याविरूध्द बाजूला म्हणजे भाजपला मत द्यालला नाही लागले. आपल्याला अधिक चांगला उमेदवार मिळायची वाट बघत राहिले आणि तो मिळाल्यावर दिले चौधरींना ढकलून. वाजपेयींच्या काळात जे प्रकार चालू होते त्यापेक्षा नक्कीच परिस्थिती अधिक चांगली आहे असे म्हणायला जागा आहे. २००४ मध्ये वाजपेयींनी हिंदूंसाठी पुरेसे केले नाही म्हणून आपल्याच लोकांनी युपीए सरकार नावाचा कलंक दहा वर्षे देशावर आणला. तो अनुभव पुरेसा झाला नाही का? वाजपेयींनंतर अधिक कडक असे मोदी आले तसे भविष्यात आणखी कोणी येईलही. तसे झाल्यास देऊ मोदींना ढकलून आणि देऊ त्या दुसर्‍या नेत्याला भरभरून मते. पण मोदी पाहिजे तितके कडक नाहीत म्हणून उध्दव ठाकरे, रागा असल्या दुर्गंधीला मत द्यायचा विचारही मी तरी करणार नाही.

वामन देशमुख नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे. मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली? सगळ्या थापा. बाबरी पाडताना, त्यापूर्वी कारसेवा करताना, मुंबई दंगलीत हे सर्व घरात लपले होते व मुंबई वाचवली ती श्रीकांत बापटांसारख्या शूर पोलिस आयुक्ताने, पोलिसांनी आणि लष्कराने.

वामन देशमुख नवीन

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कदाचीत या माहीतीचा उपयोग होईल - महामार्ग ४४, महामार्ग ६५, महामारी ४८ यांवर मी अनेकदा प्रवास करतो. मागच्या दहा-अकरा वर्षांत जवळजवळ प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी, वळणावर, उंचावर, वगैरे रस्त्याला खेटून नव्या-कोऱ्या मशिदी उभ्या राहिल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गावर, अजून पुरेसा बांधूनही झालेला नाही तर अनेक मशिदीची बांधकामे सुरु झाली आहेत. हे सौगात ए मोदी आहे, नाही का? (सिद्धीविनायकसारखी प्रचंड संपत्ती असलेली मंदिरे मात्र अजूनही सेक्युलर सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत.)

उपयोजक नवीन

मतांचा जोगवा मागताना हिंदुत्ववादी खुश होतील अशीच आश्वासने देऊन मते मागतात ना? पहिल्या खेपेला म्हणजे २०१४ ला हिंदुत्ववादी मतदारांनी भरमसाठ मतांनी भाजपला मतदान केले ना? मग अशाच प्रकारे पुढच्या निवडणूकांमधे विजय हवा असेल तर आपण हिंदुत्ववादी मतदारांच्या अपेक्षांना बांधील राहिले पाहिजे. नव्हे हिंदुत्ववादी मते अजून वाढण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे हे मोदी , भाजप , संघ यांना कळत नाही? ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच फाट्यावर मारायचे? मग अशाने मतांची संख्यस घटेल नाहीतर अजून काय होईल? सबका साथ सबका विकास , वक्फच्या जमिनी परत मुसलमानांकडेच , सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे. ही असली मुक्ताफळं ऐकण्यासाठी आणि हिंदूंच्याच देशात सो कॉल्ड हिंदुत्ववादी पक्षाकडून मानहानी करुन घेण्यासाठी हिंदुत्ववादी मतदारांनी भाजपला मतदान केले होते का? १०० कोटी हिंदू भाजपला मतदान करतील यासाठी प्रयत्न करायचे , कंबर कसायची , कष्ट घ्यायचे की ज्यांच्यामुळे आख्खं जग त्रासलंय त्या हिरव्यांच्या दाढ्या कुरवाळत बसायचं? २०१९ आणि २०२४ या वेळच्या निवडणूकांपूर्वी हिंदुत्ववादी मते वाढावीत म्हणून भाजप आणि संघाने काय प्रयत्न केले ते सांगावे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by उपयोजक

हे सगळं ठीक आहे पण यावर उपाय काय ते सांगा. मोदींपेक्षा कट्टर नेता येईपर्यंत मोदींना साथ देणे की मोदी पुरेसे कट्टर नाहीत म्हणून मुस्लिम लीगला मत देणे?मी तरी नक्की पहिला पर्याय निवडेन. त्यातही पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये शिक्षा जरूर करेन कारण त्या निवडणुका राष्ट्रीय निवडणुकांइतक्या महत्वाच्या नसतात. एकीकडे सगळे जग हिरव्यांमुळे त्रासले आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे परत त्याच हिरव्यांना डोक्यावर घेणार्‍या उध्दव ठाकरे, ममता, अखिलेश वगैरेंना मते द्यायची? मोदी पाहिजे तितके कट्टर नसतील तरी त्यांनीच ३७०, अर्धामुर्धा का होईना वक्फ बोर्ड दुरूस्ती कायदा, सी.ए.ए हे सगळे केले आहे हे कसे विसरून चालेल? मोदी आपल्याला पाहिजे तितके कट्टर नाहीत असे म्हणत असल्या ठाकरे, केजरू, ममता, अखिलेश, रागा वगैरे दुर्गंधीला मते द्यायची आणि जेवढी केवढी प्रगती केली आहे ती पण रद्द करून घ्यायची आहे का? हे सगळे लोक सत्तेवर आल्यावर लगेच ३७० परत आणतील, वक्फ बोर्ड कायदा परत जुन्याप्रमाणे करतील, सी.ए.ए काढतील हे कळत नाहीये का?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी अनेकदा लिहिले आहे. मोदींनी फार मोठी अपेक्षापूर्ती केली नसली तरी (खरं तर बराचसा अपेक्षाभंगच केलाय) उपलब्ध पर्याय मोदींपेक्षा शतपटीने वाईट आहेत.

वामन देशमुख नवीन

"मोदींना यापुढे मते देऊ नका, त्याऐवजी ममता-रागा-उठा-अखिलेश-केजरू हेच चांगले आहेत" असे इथे (आता आणि यापूर्वीही) कुणी म्हटले आहे का? चर्चेला भलतेच वळण देऊन हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय? "'मोदींनी हिंदूंना दिलेली वचने पूर्ण केली नाहीत, त्याउलट भलत्याच दिशेने (मो का गांधींसारखी) वाटचाल सुरु ठेवली आहे' हे सत्य आहे व त्यात त्यांनी तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे" हे मान्य करण्यात कसला कमीपणा आहे? की रागा-मोदी सगळा डीएनए एकच आहे?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by वामन देशमुख

सहमत आहे. पर्याय उपलब्धच नाही. मोदींनीच सुधारणा करणे आवश्यक आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by वामन देशमुख

बरं मग करायचे काय हे तरी सांगा. मोदी आपल्यासाठी आपल्याला पाहिजे तितके करत नाहीत हा दावा असेल तर तो योग्यच आहे. मात्र विविध मार्गांनी हा असंतोष दाखवून दिला तर त्याची दखल घेतली जाते असे म्हणायलाही जागा आहे. निर्मलाकाकूंनी कर वाढविले त्याविरोधात इंटरनेटवर कितीतरी मीम्स आणि तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याची दखल यावर्षीच्या अर्थसंकल्पात घेतली गेली. त्याप्रमाणे दखल घेतली जाऊन काहीतरी होईल या अपेक्षेन असा असंतोष व्यक्त करत राहिल्यास काहीही वाईट नाही. मात्र यापुढे हिंदूंनी भाजपला मते द्यावी की नाहीत हा पण विचार करावा असेही मधून मधून म्हटले जात असते. माझा मुद्दा त्यावर आहे. काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत त्यांनाही रागा कसा आहे हे कळले नसेल असे वाटत नाही- वरकरणी ते काहीही बोलत असले तरी. तरीही त्यांचे मतदार कुरकुरत का होईना काँग्रेसलाच मत देतात. भविष्यात इंदिरा गांधींसारखा कोणी नेता मिळाला तर त्यांना नको असणार आहे असे थोडीच आहे? पण रागाच्या अंगात दम नाही म्हणून ते मतदार भाजपला मत देत नाहीत किंवा तसा विचारही करत नाहीत. कणखर नेता मिळेपर्यंत ते वाट बघत आहेत. तीच गोष्ट उबाठा समर्थकांची. उबाठांनी कशी सगळी पक्षाची वाट लावली आहे हे समोर दिसत असूनही त्यांचे (उरलेसुरले) मतदार अगदी कट्टरपणे त्यांच्याच मागे उभे असतात- ते दुसर्‍या पक्षाला मत द्यायचा विचार करत नाहीत. पण आपलेच मतदार- मोदी समजा २०% अपेक्षाच पूर्ण करत आहेत म्हणून ०% अपेक्षा पूर्ण करायची १००% खात्री असलेल्यांना मते द्यायचा विचार करतात.

उपयोजक नवीन

मोदींनी अपेक्षित इतकी कामगिरी न केल्याने २०१९ च्या निवडणूकीवेळी मतांमधे घट झाली. घट झाली तरी भाजप सत्तेत टिकला. त्यावरुन भाजप आणि मोदींनी काहीच बोध घेतला नाही ही चूक कोणाची? तरीही अजून एकदा संधी देऊन पाहूया म्हणून २०२४ ला परत सत्ता टिकवायला मोदींना हिंदुत्ववाद्यांनी मदत केली. या मदतीचे फलित काय? वक्फची जमीन परत हिरव्यांच्याच घशात? काँग्रेस हा हिंदूंचा उघड शत्रू आहे. भाजप हा हिंदूंपुढे त्याचं खरं रुप आता उघडं करतोय की काय असं वाटतंय. लष्कराच्या खालोखाल सर्वाधिक जमिनीचा मालक कोण ? तर एक देशाला पनवती ठरलेली एक संस्था. जी या जमीनीचा वापर देशविघातक गोष्टींसाठी करु शकते.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

"वक्फची जमीन परत हिरव्यांच्याच घशात?" ती जमीन त्यांचीच आहे तर समस्या काय आहे? जमीन हिरव्यांचीच असेल तर भगव्यांच्या घशात ती का जावी?. राज्य वक्फ बोर्डावरील काही भ्रष्ट अधिकारी आणि हलकट व्यापारी ह्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी जमीन नको त्या कारणांसाठी देण्यात आली. त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. पण सरकारी कावा वेगळा आहे. निवृत्त मर्जीतले आय ए एस अधिकारी जमीनींवर ल़क्ष ठेवण्यासाठी नेमणार आहेत.कोणी जमीन दान केली की मग ई.डी.ने नोटीस पाठवायची, मग समन्स आणि मग सेटलमेंट. त्यात ज्या जमीनी खूप आधी विकत घेतल्या आहेत, त्यातल्या व्यवहारातले खुसपट काढायचे आणि सरकारला रिपोर्ट द्यायचा. निवड्णूक रोखे प्रकरणात काय झाले? ई.डी.ने मोठ्या उद्योजकांना नोटिसा पाठवल्या, समन्स बजावले..मग ह्या उद्योजकांनी निवड्णुक रोखेतून भाजपाला भरघोस देणग्या दिल्या.. मग ह्यांची सुटका झाली. ही वस्तुस्थिती आहे. 3 of top 5 donors bought electoral bonds with ED and I-T knocking on their door सरकारचा उद्देशच मुळात जमीनी गिळंक्रुत करणे हा आहे. "मुसलमानांच्या जमीनी आपण, हिंदुंनी परत घेतल्या म्हणुन मराठी/उत्तर भारतिय मध्यमवर्ग वॉट्स-अ‍ॅपवर टाळ्या वाजवणार,, तिकडे त्या जमीनी अदानी/शहा/पारेख्/पटेलकडे जाणार. https://indianexpress.com/article/india/3-of-top-5-donors-bought-electoral-bonds-with-ed-and-i-t-knocking-on-their-door-9214783/

श्रीगुरुजी नवीन

एकीकडे वफ्फ सुधारणा विधेयकाविरोधात निष्ठापूर्वक मत देऊन उबाठा गट आपली मुस्लिमनिष्ठा सिद्ध करीत असताना दुसरीकडे वफ्फ सुधारणा विधेयकावरील राज्यसभेतील चर्चेत व मत देण्यासाठी शरद पवार अनुपस्थित राहिले असे ऐकले. बाटगेच जास्त मोठ्याने बांग देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

उपयोजक नवीन

ती जमीन त्यांचीच आहे कोणी दिली त्यांना? कुठल्या नियमानं दिली? लष्कराच्या खालोखाल दुसरे मालक आहेत हे हिरवे. इतकी जमीन यांना द्यायला यांनी केलंय काय देशासाठी ? हा धर्म परदेशातला आहे. या धर्माचे पालन करणारे क्रूर राजे भारतात घुसले , इथे अत्याचार केले. त्याबद्दल पारितोषिक म्हणून काँग्रेसनं ही जमीन दिली का त्यांना?

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by उपयोजक

ह्या हिशेबाने एखाद्या हिंदूची किंवा हिंदू संघटनेची जमीन सौदी किंवा अमेरिकेत असेल तर त्यानी देखील ह्या परधर्मीय हिंदूची जमीन जप्त करावी!

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by उपयोजक

"कोणी दिली त्यांना? श्रीमंत हिंदु/मुस्लिम लोकांनी. त्या जमीनींवर मग रुग्णालये उभी राहिली,शाळा उभ्या राहिल्या. ज्यात सर्वधर्मीय मुले गेली. कुठल्या नियमानं दिली?" त्या त्या राज्यातल्या जमीन खरेदी-विक्रीच्या कायद्यांनुसार. असेच प्रश्न त्या घरी १५ कोटी रोकड मिळालेल्या न्यायाधीशाला मीडियाने/ई.डी. ने विचारले तर ते योग्य झाले असते.
हा धर्म परदेशातला आहे.
मग अमेरिकेत जी ईस्कॉन मंदिरे आहेत, १००च्या वर स्वामीनारायण मंदिरे आहेत, त्यांचे काय करायचे? अमेरिकन बुलडोझरबाबाला सांगायचे का?
इतकी जमीन यांना द्यायला यांनी केलंय काय देशासाठी ?
नक्की कोणाबद्दल बोलताय? वक्फ बोर्ड की अदानी?वक्फ बोर्डाची जमीन लोकांनी देणगी म्हणुन दिली आहे.राजकारण्यांना लाच देउन्,मोठी जमीन स्वस्तात खरेदी करायची आणि लोकांना देशोधडीस लावायचे, अशा उद्योगपतींचे काय करायचे हा मुख्य प्रश्न आहे.

उपयोजक नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीमंत हिंदु/मुस्लिम लोकांनी. त्या जमीनींवर मग रुग्णालये उभी राहिली,शाळा उभ्या राहिल्या. ज्यात सर्वधर्मीय मुले गेली. मुस्लिम लोकांच्याकडे या जमिनी आल्या कुठून? जे लोक इथे लुटपाट करायला आलेले त्यांनी काय रितसर खरेदी केलेल्या का?

सुक्या नवीन

काही वर्षापुर्वी "अफ्रीकन चाईल्ड सिंड्रोम" नावाचा आजार काही लोकांना लागला होता. म्हणजे "ईतके जेवण वाया घालवतोस? ह्यात अफ्रीकेतले किती मुले जेवली असती" किंवा "येड्या घरात सजावट करुन / लग्नात खर्च करुन वेगेरे वगेरे करुन उगा पैसे वाया घालवले ह्या पैशात किती अफ्रीकन लोकांच्या घरात चुल पेटली असती" वगेरे वगेरे वचने ऐकावी लागत. आता " मग अमेरिकेत जी ईस्कॉन मंदिरे आहेत, १००च्या वर स्वामीनारायण मंदिरे आहेत, त्यांचे काय करायचे? अमेरिकन बुलडोझरबाबाला सांगायचे का?" किंवा "एखाद्या हिंदूची किंवा हिंदू संघटनेची जमीन सौदी किंवा अमेरिकेत असेल तर त्यानी देखील ह्या परधर्मीय हिंदूची जमीन जप्त करावी!" ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुक्या

काही वर्षापुर्वी "अफ्रीकन चाईल्ड सिंड्रोम" नावाचा आजार काही लोकांना लागला होता. . . . ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ? हा आजार भारतात अनेकांमध्ये प्राचीन काळापासून आढळतो. यावर आजवर लस सापडलेली नाही. आजही अनेक जण या आजाराने प्रादुर्भित आहेत. या आजारास 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' असे संबोधता येईल.

सुक्या नवीन

In reply to by श्रीगुरुजी

खरे तर मी असल्या बिनबुडाच्या तर्कांना काही महत्त्व देत नाही पण पाणी जरा जास्तच डोक्यावरुन जातेय. म्हणजे कुणी. "तुमच्या घरात घाण आहे. ती साफ करा" असे म्हटले की आपण लगेच "आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवाद केला की डोक्यात तिडीक जाते. महाराष्ट्रातले एक राज्यसभा सदस्य पण असलेच भिकारचोट युक्तीवाद करुन मी कित्ती कित्ती भारी वगेरे वगेरे बोंबलत असतात. आता माई म्हणतात की त्या जमीनींवर मग रुग्णालये उभी राहिली,शाळा उभ्या राहिल्या. ज्यात सर्वधर्मीय मुले गेली. मग मी जर "वफ्फ बोर्डाच्या जमीनीवर किती शाळा आहेत ज्यात सर्वधर्मीय शिक्षण मिळते आहे? किंवा किती रुग्णालये आहेत ?" ह्या प्रश्नावर माई सोईस्कर मोन पाळतील. तीच गत "अंबानी चे घर वफ्फ च्या जमीनीवर आहे" ह्या तर्काची. ह्यात अंबानी ते घर बांधत असताना ना वफ्फ बोर्डाने त्यावर हर्कर घेतली ना कुणी कोर्टात केस केली. आता ते घर तयार झाल्यावर सगळ्यांना कंठ फुटला. असो. वक्फ बोर्डावरील काही भ्रष्ट अधिकारी आणि हलकट व्यापारी ह्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी जमीन नको त्या कारणांसाठी देण्यात आली. असे असेल तर त्यावर ईलाज करुन कायदेशीर प्रक्रीया करुन दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी. ह्या सार्‍या गोष्टींना एखादा कायदा करुन कुणी जरब बसवत असेल तर नाही ते फाटे फोडुन ठणाणा करण्यात काय हशील आहे? हा सगळा 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' आहे हे मात्र खरे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुक्या

"आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवाद त्यापेक्षा भिकारचोट युक्तिवाद म्हणजे कचरा का असेना, आमचं घर भरलेलं दिसतंय आणि आमचं भरलेलं घर बघवत नाही यांना. आमच्या भरल्या घराचा मत्सर वाटतो यांना.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

"ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ?" दुसर्या धर्माबद्दल कमालीचा द्वेष पसरवुन उत्तर भारतीय्/मराठी लोकांची डोकी भडकावणे आणि जमीनी काबीज करुन एका मर्जीतल्या उद्योगपतींच्या घशात घालणे... एका संघटनेने पसरवलेला हा गंभीर आजार आहे. ह्या आजाराचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या अब्दुल कलाम ह्यांचे पुतळे फोडायलाही हे लोक कमी करणार नाहीत.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, तुझ्यात 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम'ची लक्षणे तीव्र होताहेत. तात्काळ उपचार सुरू कर. ह्या आजाराचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.