कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
In reply to राहुल, by हेमंतकुमार
In reply to राहुल, by हेमंतकुमार
In reply to सहकार्य... by हेमंतकुमार
In reply to लस संशोधन : भारतीय घडामोडी by हेमंतकुमार
In reply to राहुल, by हेमंतकुमार
“एका कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही काळाने त्याचा साठा संपलेला असेल तर दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”हा प्रश्न काही परिचितांनी विचारला आहे. या संदर्भातील काही रोचक संशोधन वाचनात आले. भारतात जसा हा प्रश्न काही ठिकाणी उद्भवला तसाच तो प्रगत देशातही उद्भवलेला आहे. मग अशा वेळेस दुसऱ्या डोसचे काय करायचे हा प्रश्न पडतो. यासंदर्भात अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील डॉ. Ross Kedl या तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते योग्य अंतराने दुसऱ्या कंपनीचा डोस जर दिला तर प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने उलट अधिकच फायदा होऊ शकतो ! या अनुषंगाने सध्या असे दोन अभ्यास चालू आहेत : १. यु. के.मध्ये AZ(पहिला डोस) + Pfizer (दुसरा डोस) २. रशियात Sputnik (पहिला डोस) + AZ (दुसरा). वरील अभ्यासाचे निष्कर्ष काही महिन्यांनी समजतील दरम्यान अमेरिकेच्या CDC ने पहिले कडक धोरण शिथिल केले असून ‘अपवादात्मक परिस्थितीत दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतलेला चालेल’, असे म्हटले आहे. .....पुढे चालू ....
In reply to भारतातील दुसरी लाट : उहापोह by हेमंतकुमार
In reply to भारतातील दुसरी लाट : उहापोह by हेमंतकुमार
.फेब्रुवारीपासून अचानक रूग्ण संख्येत वाढ होण्यामागे लोकांची बेफिकीर वृत्ती, मोठ्या समूहात बिनधास्त वावरणे आणि प्रशासनाची तुलनात्मक ढिलाई ही कारणे आहेत.जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती तेंव्हा का वाढत होती ?
In reply to .फेब्रुवारीपासून अचानक रूग्ण by मराठी_माणूस
जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती तेंव्हा का वाढत होती ?>> कारण तेव्हा 'पहिली लाट' होती. महासाथीचे स्वरूप सर्वसाधारण असे असते : (3 May 2020 - 9:22 pm | कुमार१ हा प्र पुन्हा डकवतो ): संसर्गजन्य रोगांच्या तद्न्य समितीच्या मते ३ प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात : १. दोन वर्षांत या आजाराच्या लघुलाटा येऊ शकतात. त्या हळूहळू कमी होणार. २. यंदाचे थंडीचे काळात आतापेक्षाही मोठी लाट येऊ शकते. मग हळूहळू कमी होणार. ३. २ वर्षे संसर्ग सौम्यपणे धुमसत राहील (slow burn). जगभरातील भौगोलिक परिस्थितीनुसार यांत कमी अधिक बदल होऊ शकतात. .... या साथीत अधूनमधून 'लघु/लाटा' येणार आणि त्यासाठी काही तात्कालिक कारणे असणार.
In reply to जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती by हेमंतकुमार
In reply to पटले नाही. by मराठी_माणूस
In reply to म मा by हेमंतकुमार
In reply to एक काल्पनीक परीस्थीति: जर by मराठी_माणूस
जर ह्या क्षणी कडकडीत टाळेबंदी केली तर रुग्ण संख्या किती दिवसात शुन्य होइल ?>>> या प्रश्नाचे उत्तर द्यायला रोगप्रतिबंधक आणि सामाजिक औषधवैद्यक या विषयातील अधिकारी व्यक्तीच पाहिजे. तशा स्वरूपाचा कुठे संदर्भ वाचनात आला तरच मी काही लिहिन धन्यवाद
In reply to एक काल्पनीक परीस्थीति: जर by मराठी_माणूस
In reply to उत्तम प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो पर्यंत असे व्हॅक्सीन, अशी गोळी, जी घेतल्यावर पुन्हा करोना होणे नोहे, तेव्हाच हे थांबवणे शक्य आहे.बरोबर. अजुन असे काहीही सापडले नाही , आधुनिक वैद्दक शास्त्र अजुन चाचपडतच आहे. ते बरेच उघडे पडले आहे. ते लपवण्यासाठी लोकांवर खापर फोडणे चालु आहे.
In reply to जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती by हेमंतकुमार
लसीकरणास गेलेला जर लक्षण नसलेला बाधीत असेल तर काय होइल ?>>> इथे ‘बाधित’ शब्दाचा अर्थ स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. १. समजा, एखाद्यास आज लक्षणे नाहीत पण जर रोगनिदान चाचणी पॉझिटिव्ह आली आणि म्हणून तो बाधित ठरवला असेल तर, प्रत्यक्ष आजार झालेला असता लसीकरण करत नाहीत. २. एखाद्याच्या शरीरात आज विषाणू शिरला आहे (निव्वळ संसर्ग), तर पुढे त्याला आजार होईलच असे नाही. त्यामुळे अशा व्यक्तीवर लसीकरणाचा काही दुष्परिणाम व्हायचे कारण नाही.
In reply to बाधित ... by हेमंतकुमार
In reply to इथे मला infection without by मराठी_माणूस
धन्यवाद