जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
In reply to सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर जीएसटीचा काय प्रभाव पडेल? by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर जीएसटीचा काय प्रभाव पडेल? by डॉ सुहास म्हात्रे
एक ग्राहक म्हणून माझा खर्च कमी होईल काय ?१. माझ्या मासिक खर्चात गुडस (वस्तू) चा किती वाटा आहे ? सेवांचा (सर्विसेस) किती वाटा आहे ? या दोघांचे कोष्टक मांडल्यावर बरोबर उत्तर माझ्या हाती येईल. २. जीएसटिमुळे महाग झालेल्या सेवेवरील करांचा भार मला १००% उचलावाच लागणार आहे. पण वस्तूंवरील कमी झालेल्या किंमतीचा लाभ मला मिळेल काय ? कदाचित हो, कदाचित नाही. जर राज्य सरकारांनी पेट्रोल, डिझेलवर कर वाढविला, उत्पादनकर्त्याचा उत्पादन करण्याचा खर्च वाढला, वितरकांचे कमिशन वाढले, जुना तोटा भरुन काढणे यासारख्या कोणत्याही रास्त कारणांमुळे वस्तुंचे भाव स्थिर राहतील / कमी होतील / कदाचित वाढू शकतात.
एक व्यावसायिक म्हणून माझ्या जीवनात काय बदल घडेल ?हे मी माझ्या वरच्या एका प्रतिसादात लिहिलेले आहे.
सरकारला काय फायदा होईल ?सरकारदेखील एक संस्थाच आहे. त्यामुळे कोणतीही संस्था तोट्यात चालविता येणार नाही. कदाचित ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविता येईल. किंवा अमिरों से लेकर गरीबों को देकर बडा मुस्कुराये गोविंदा या न्यायाने चालविता येईल. सरकारला ( केंद्र आणि राज्य दोन्ही) मागच्या वर्षी जेवढा पैसा या करसंकलनाद्वारे मिळाला कमीतकमी तेव्हढा पैसा / जास्त पैसा आतादेखील मिळावा ही नैसर्गिक / न्याय्य अपेक्षा आहे. आता हा पैसा मिळवायचा तर एकतर टॅक्सचे दर वाढवा किंवा टॅक्स देणार्या व्यक्ती / संस्थांचा आकडा वाढावा किंवा दोन्ही गोष्टि एकदम वाढाव्यात असे पर्याय समोर आहेत. टॅक्स बेस वाढतो काय ही गोष्ट कळण्यास देखील काही काही कालावधी जावा लागेल. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे टॅक्स बेस वाढायला वाव आहे. आणि जर टॅक्स बेस वाढला तर टॅक्सचे दर अजुन रिजनेबल करण्याचा विचार करता येईल. ( मी त्यांच्या म्हणण्याच्या पहिल्या भागाशी सहमत आहे. दुसर्याशी सहमत होण्यास भिती वाटते.) थोडक्यात जीएसटीचे यश-अपयश कळण्यास अजुन थोडा वेळ (कदाचित ६-१२ महिने) थांबावे लागेल.
In reply to जीएसटीची माहिती : by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुम्ही लिंक दिलेले पुस्तक वाचले by धर्मराजमुटके
In reply to काय ठरलं मग? by गॅरी ट्रुमन
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
संक्षींचे सदस्यत्व रद्द/स्थगित केल्याचे समजले.हे कसे समजले ?
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by मराठी_माणूस
In reply to आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी by श्रीगुरुजी
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by मराठी_माणूस
In reply to आयडी ब्लॉक झाला आहे. आयडी च्या नावावर टिचकी मारून बघा. by श्रीगुरुजी
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
In reply to प्रतिसादाशी ९९.९९ % सहमत..!! by विशुमित
In reply to प्रतिसादाशी ९९.९९ % सहमत..!! by विशुमित
''हाजी रे हाजी रे'' करणारेच शिल्लक राहतीलसहमत. एकाने प्रतिसादात चिकीत्सा व्यक्त केल्यावर त्याला प्रतिसाद देण्या आधी कोणाला देत आहे ते नीट पहाण्याचा सल्ला दिल्याचे आठवते.
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
In reply to मी काळ खफ वर यावरच खरड लिहिली by शब्दबम्बाळ
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
In reply to संक्षींचे सदस्यत्व रद्द by श्रीगुरुजी
In reply to संक्षी यांना ब्लॉक केले असेल तर... by वामन देशमुख
प्रस्तुत धाग्यावर तर इतर अनेकांनी त्यांच्यावर असंसदीय शब्दांत हल्ला केलाय त्यांनाही ब्लॉक केलंय का?नाही. कारण मला वाटते काही सदस्यांना सन्माननीय सदस्य ही कवचकुंडले आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे लिखाण/प्रतिक्रिया योग्य असतात.
In reply to प्रस्तुत धाग्यावर तर इतर by अभिजीत अवलिया
In reply to निर्णय हा फारसा पटलेला नाही. by नि३सोलपुरकर
In reply to संजय क्षीरसागर यांचं सदस्यत्व by गामा पैलवान
In reply to अगदी सहमत. by राही
In reply to अर्र by राही
संक्षींना इतके दिवस का सहन केले जात होते हेच समजत नाही. तुम्ही कितीही प्रकांडपंडित असा, तुम्हाला कितीही ज्ञान असू दे चारचौघात वावरताना कसे वागायचे याचे सामाजिक संकेत मोडल्यास संबंधित माणसाला कुत्रही विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला फार काही समजते असा अनेकांचा समज असतो. पण संक्षींविषयी स्पेशल गोष्ट म्हणजे इतरांना मूर्ख, निर्बुध्द, बेअक्कल वगैरे गोष्टी ते कायम वापरत असत. सभ्य समाजात चारचौघात वावरताना वागायच्या संकेताचे हे नक्कीच उल्लंघन आहे. आणि ते कोणी मान्य करूही नये. विरोधी मत मांडणारे कित्येक लोक असतात पण त्यापैकी किती लोकांचे आय.डी ब्लॉक झाले आहेत? आता हा आय.डी ब्लॉक झाला ते 'विरोधी मताला' अॅट्रिब्युट करणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे आहे. या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्यांना जोडायचा विनाकारण प्रयत्न करू नये. संक्षी हा मनुष्याच्या तोंडी लागणे व्यर्थ आहे हे मिपावर वावरणार्या कोणालाही लक्षात आलेच असेल. मी माझ्यापुरता तर निर्णय घेतला होता की त्या माणसाला मेन बोर्डावर चर्चेत कधीही एन्गेज करायचे नाही. इट वॉज सिम्पली नॉट वर्थ. त्यांची भाषा वारंवार खटकायची. कधीनाकधी त्यांचा आय.डी परत ब्लॉक व्हावा असे मनोमन वाटत होते. मिपावरील वातावरण गढूळ करणार्या लोकांमध्ये संक्षींचा क्रमांक सगळ्यात वरचा असेल.गॅरी ट्रूमन यांनी वरील मजकूर खरडफळ्यावर लिहिला, त्याच्याशी १००% सहमत आहे. खरडफळ्यावरील मजकूर काही दिवसांनी गायब होईल, म्हणून मुद्दाम इथे या धाग्यावर लिहित आहे. (त्यांची परवानगी न घेता - त्याबद्दल क्षमस्व.) संजय क्षीरसागर यांना ताकीद दिली होती का माहीत नाही, पण त्यांचा आयडी या आधीच का गोठवला नाही, याबद्दल आश्चर्य मात्र नक्कीच वाटत होते. (पूर्वीचे मिपा राहिले नाही, म्हणत दुर्लक्ष केले इतकेच).
In reply to पूर्ण धाग्यावरील चर्चा वाचत होतो. by उदय
In reply to गॅरी ट्रुमन ब्लॉक करण्याचं by नितिन थत्ते
In reply to गॅरी ट्रुमन ब्लॉक करण्याचं by नितिन थत्ते
In reply to टोचा मारायला लांब लांबचे by दशानन
In reply to का बरे? by राही
In reply to तक्रार कसली? by चौकस२१२
In reply to जिएसटीचं ड्राफ्टींग भिकार आहे by संजय क्षीरसागर
In reply to मग इतर देशात हो का याविरुद्ध by चौकस२१२
In reply to सोसायटीत एखादा कार्यक्रम - by कंजूस
In reply to इक्झॅक्टली ! by संजय क्षीरसागर
रिजर्व बँकेच्या गंगाजळीतून ३.६० कोटी सरकारी खर्चासाठी उपलब्ध करून घेतले आहेत.एक प्रश्न असा की राखीवपेढीची गंगाजळी इतकी फुगली कशी? गेल्या सत्तर वर्षांत कोणी अशी बातमी ऐकलेली काय? ९ लाख कोटी रुपये जमा झाले ते भ्रष्टाचार थांबवल्यानेच ना? ते श्रेय नि:संशय मोदींचं आहे. मात्र तरीही वसेकच्या रूपरेखेविषयी तुम्ही मांडलेली मतं ग्राह्य आहेत. माझ्या मते वसेकमध्ये घिसाडघाई झाली आहे व त्यामुळे शासनाचं जे नुकसान होतंय ते अतिरिक्त गंगाजळीच्या जोरावर धकवून नेण्याचा मोदींचा मानस आहे. मोदी हे बरोबर करताहेत की चूक ते माहीत नाही. त्याचप्रमाणे माझं हे आकलन देखील बरोबर की चुकीचं तेही माहीत नाही. आ.न., -गा.पै.
संक्षी