शेतकर्यांचा संप
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
याद्या
73699
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
खट,
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
गरज नसलेल्या आणि चुकीच्या
In reply to खट, by संदीप डांगे
डांगे अण्णा तुमच्या नाशिकचे
In reply to खट, by संदीप डांगे
खरी आहे
In reply to डांगे अण्णा तुमच्या नाशिकचे by विशुमित
कसला वास येतो ?
In reply to खरी आहे by Ujjwal
डांगे अण्णा
In reply to खट, by संदीप डांगे
नविन समितीचे प्रमुख बच्चू कडू
In reply to डांगे अण्णा by खटासि खट
खट साहेब
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
हि परिस्थिती असताना आणि पाऊस
In reply to खट साहेब by सुबोध खरे
खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील
महेन्द्र ढवाण अत्यंत
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
तेव्हा अशा चर्चांमधून शेती
In reply to महेन्द्र ढवाण अत्यंत by खटासि खट
,सर्व वस्तू चे भाव जागतिक
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
मस्तं प्रतिसाद.
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
हमिभावाविषयी लयी वेळा सहमत
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
१२. कमाल जमीन धारणा कायदा
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
चांगला प्रतिसाद.
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
@ महेंद्र ढवाण....
In reply to खालील उपाय केले तर शेतकर्या ला बरे दिवस येतील by महेन्द्र ढवाण
ज्यांना भारतात ठिकठिकाणी
शेतकरी आणि टॅक्स
जे भरतात ते पण चिरीमिरी
In reply to शेतकरी आणि टॅक्स by कपिलमुनी
या विषयावर मायबोलीवर
लयच खतरनाक सातारी जर्दा आहे
In reply to या विषयावर मायबोलीवर by धर्मराजमुटके
काही हरकत नाही. पण आर्मी
In reply to लयच खतरनाक सातारी जर्दा आहे by विशुमित
खरंच चांगली चर्चा चाललीये
In reply to या विषयावर मायबोलीवर by धर्मराजमुटके
बरोबर , जॉर्ज बुश सुद्धा असेच
In reply to खरंच चांगली चर्चा चाललीये by शब्दबम्बाळ
मेंबत्ती गैंग
मी स्वतः शेतकरी कुटुंबातील
टंकनचूक
In reply to मी स्वतः शेतकरी कुटुंबातील by अमितदादा
तीन वर्षातील १.५४ लाख कोटी
प्रतिसादात लिंका राहून गेल्या.
In reply to तीन वर्षातील १.५४ लाख कोटी by खटासि खट
फक्त तीन वर्षात जर २ लाख
In reply to तीन वर्षातील १.५४ लाख कोटी by खटासि खट
सौ सोनार की...
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
आता हे त्या चावरे पाटलांना
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
एनपीए काय असतं आणि राईट ऑफ
In reply to फक्त तीन वर्षात जर २ लाख by मृत्युन्जय
तुमचे म्हणणे अजुन स्पष्टपणे
In reply to एनपीए काय असतं आणि राईट ऑफ by खटासि खट
Govt cancels Rs 200-crore
ख ख जी ...!!
In reply to Govt cancels Rs 200-crore by खटासि खट
खट साहेब
In reply to Govt cancels Rs 200-crore by खटासि खट
खरेसाहेब
In reply to खट साहेब by सुबोध खरे
डब्ल्युटीओ मध्ये भारताने जे
विरोधी पक्ष
नोटाबंदीच्या काळात सहकारी
रोचक माहिती.
In reply to नोटाबंदीच्या काळात सहकारी by मार्मिक गोडसे
काही मूलभूत शंका
२०१४आणि २०१५ चे संकट हे
हे समजले नाही
२०१४आणि २०१५ चे संकट हे
काही लोकांचे प्रश्न बघता,