Skip to main content

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 27/01/2017 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.

वाचने 61707
प्रतिक्रिया 405

प्रतिक्रिया

In reply to by अप्पा जोगळेकर

विचारला असता तर मुडदाच पडला असता.
हे कोणत्या राजकीय पक्षाच्या बाबतीत खरे नाही?
इंदिरा गांधींच्या समोर वाघाचे भिजके मांजर झाले होते असे मात्र कुठेतरी वाचले आहे.
याचा संदर्भ देता का प्लिज? बाकी कटचं म्हणाल तर मग काही लाख कोटींचा कट किती निघेल बरे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कुठेतरी वाचले आहे असे म्हटले याचा अर्थच मला कुठे वाचले ते नीट आठवत नाही. केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा. तसे असावे यासाठीच पारदर्शकता हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला गेला आहे. थर्ड पार्टी ऑडिटरचा नेमावा हा मुद्दा किरीट सोमैय्या यांनी काढल्यावर उधोजीराजेंचे पित्त खवळले ना ?

In reply to by अप्पा जोगळेकर

केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा.
आप्पा, असे काही नसते हो. वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे. ह्या वीसटक्क्यांत बाबू पासून मंत्र्यांपर्यंत (विरोधी पक्षनेतेही) सर्वजण वाटा घेतात... कॅगचे आर्थिक पाहणी अहवाल हे सरकारने खर्च कुठे कसा केला हे दाखवणार. कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात. तसेच उघडकीस येत नाही म्हणून भ्रष्टाचार होत नाही असे नसते. पकडला तर चोर असेही नसते. भ्रष्टाचार उघडकीस आणणारे असंतुष्टच असतात बहुधा ( प्रामाणिक विसल्ब्लोअरांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी.). आदर्श घोटाळा बाहेर येण्यास तिथे कंत्राट मिळण्यास असफल झालेले कंत्राटदार कारणीभूत होते, अन्यथा आदर्श इमारत उभी राहून सगळे सुखनैव पिढ्यांपिढ्या राहिले असते. भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.

In reply to by संदीप डांगे

वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे.
भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत? तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात.
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच. पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे? शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्‍या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.
व्यवसाय आणि राजकारणाबद्दल अशी मते असतील तर मुंबईत मते देण्यापेक्षा त्याच्या शेजारी पुरेशी खोली असलेला अरबी समुद्र आहे, तिथे जाऊन चिंतन करावे. डांगे सायेब, जास्ती गॉसिप करायचं काम नाय!!! ========== *विशुमित शब्दाचा काय संबंध आहे का विषमतेशी?

In reply to by arunjoshi123

भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत?
>> आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
>> बंधो! तुम्हीच सांगा मग किती भ्रष्टाचार आहे भारतात आणि विषमता किती आहे ती? बाबू लोकांची हुकूमशाहीही तुम्हीच सांगा....
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच.
>> आपण छगन भुजबळ हे नाव ऐकलंय का?
पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे?
>> कॅगने काय करावे हे मी कुठेच म्हटले नाही. तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्‍या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
>> मी काय म्हणतो, एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्‍या ठेकेदारांशी भेटून घ्या ना! म्हणजे कसं हे जार्गन ऑन द ग्राऊंड किती अकाऊंटेबल आहे ते कळून येईल...

In reply to by संदीप डांगे

तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
नाय हो असं दुसरे सायेब म्हणालेत, मी नै.
एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्‍या ठेकेदारांशी भेटून घ्या ना!
अरे भाय, आप समंदरी मछली को बाल्टीभर पानी देख कर आने को बोल रहे है.

In reply to by arunjoshi123

असं आहे होय! मग समंदरी मच्छलीने प्रश्न-शंका विचारण्यापेक्षा थेट अनुभव-उत्तरं दिलीत तर बरं होईल... आमच्याही बाल्टीभर पाण्यात भर पडेल!

In reply to by संदीप डांगे

आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
गंभीर नोटेवर म्हणतो .... १. देशाचा जीडीपी १२५ लाख कोटी इ इ आहे. २. यात सरकारचा उत्पन्न (वा खर्च वा हिस्सा) ४५% असतो. ३. यातले २०% तुमच्या मते बाबू नि राजकारणी यांचा भ्रष्ट हिस्सा आहे. ४. जी डी पी अंदाजे सात टक्क्याने वाढणार आहे. ५. आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार शून्य मानू. ६. हुतात्मा होणारे सैनिक ते रूळ तपासणारे कामगार ते सफाई कर्मचारी ते राष्ट्रपती सगळेच झाडून करप्ट आहेत असे मानू. ७. राजकारणी आणि बाबू हे लोकसंख्यच्या किती प्रमाणात असावेत? तर २.५/१३० = २% ८. आजचे संपत्तीचे विभाजन सर्वांना स्वीकार्य आहे असे मानू. मग पुढे या लोकांकडे किती पैसे करप्शनचे जमा होणार आहेत (पगाराचे वेगळे, सरकारी अधिकृत सोयी वेगळ्या) त्याचे गणित मी वर लिहिले आहे. २% लोकांना हे लै जास्त पैसे झाले. वास्तविक असं होतं असं मानलं तर ३-४ वर्षांत देश फुटेल, बुडेल, इ इ असं मानल्यासारखं होतं. असो.

In reply to by संदीप डांगे

अर्थातच. शक्य तितकी सुस्पष्ट, लॉजिकली वाटर्टाइट आणि संख्यात्मक अर्थाची विधाने करण्याकडे माझा कल असतो. ( आता हे गमतीने घ्या - त्यामुळे लोकांच्या मनात माझ्या शिक्षणाबद्दल संभ्रम निर्माण होतात.) मात्र लातूरकडचा खेडूत असल्यामुळे मात्र पुणे-मुंबईकरांसमोर भाशेचा घोळ होतो.

In reply to by संदीप डांगे

ओके. म्हणूनच एकाच पक्षाची किंवा कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चालू नये. केंद्रात जसे गांधी घराणे होते तसे मुंबईत ठाकरे घराणे बस्तान बसवून आहे. ही जहागीर नष्ट झालीच पाहिजे. उद्या केंद्रात जर मोदींनी स्वतःची जहागीर सुरु केली तर त्यांना पण विरोधच असेल. यासाठी मुंबई महापालिकेत खांग्रेस आले तरी चालेल पण शिवसेनारुपी रावण महापालिका निवडणुकीत मेलाच पाहिजे अशी इच्छा आहे. शिवसेनेचे मंत्री सीएमना भेटून आले म्हणे आणि सरकार नोटिस वर आहे असे सांगितले. लाळ अजून गळतेच आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

जहागिरी नष्ट झाल्याचे बघायला नक्कीच आवडेल.... जिथे जिथे सरकारात सामील आहेत तिथून संबंध तोडले असते तर मानले असते उधोजीला...

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणूनच एकाच पक्षाची किंवा कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चालू नये.>> -- आपलं प्रचंड अनुमोदन.

In reply to by अप्पा जोगळेकर

CAG ला उत्तर द्यावे लागते म्हणून भ्रष्टाचार सापडतो हा मुद्दा बाजूला ठेवुयात, यावर सहमती होणार नाही. तुम्ही सरसकटपणे २% कट मिळत असेल असे गृहीत धरले आहे म्हणून म्हणालो. थर्ड पार्टी ऑडिटर किंवा CAG महापालिकांसाठीही असावा यावर दुमत असण्याचे कारण नाही. मुद्दा साधा आहे, भाजप हा महत्वाचा मुद्दा मानतो तर नेमकी कोणती पारदर्शिकता अपेक्षित आहे याचे उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेमध्ये यासाठी कोणत्या स्टेप्स घेण्यात आल्या(का?) हे सांगणे गरजेचे आहे. हे न सांगता फक्त पारदर्शिकता हवी असे म्हणणे संदिग्ध आहे. शिवाय आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने भाजपला हा मुद्दा अशा संदिग्ध अर्थासह फार परिणामकारकपणे वापरता येईल असे वाटत नाही. अवांतर : संदर्भ म्हणजे कुठली लिंकच असावी असे नाही, गॅरीसरानी खाली संदर्भ दिला आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने नाय नाय. तो अहवाल सोयीनुसार वापरला जातोय. काल फडणवीस यांनी बरीच चिरफाड केली. तुमचे दुमत नसेल कदाचित. उद्धव ठाकरे तर तयार नाहीत ना थर्ड पार्टी ऑडिटला.

In reply to by अप्पा जोगळेकर

आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने
एक गोष्ट समजत नाही. अफझलखानाने नेमलेल्या कुठल्या समितीने पाठ थोपटलेली पेंग्विनसेनेला कशी चालते?

In reply to by गॅरी ट्रुमन

मुद्दा मिस होतोय. बिएमसी पारदर्शक आहे कि नाही हे मला सिद्ध करायचं नाहीये. "बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे. भाजप जर फक्त मतांकडे डोळा ठेवून हे व्यक्त्यव्य परत परत पुढे आणणार असेल तर ते खोडून काढायला सर्वेचा वापर होणारच आहे. भाजपने नागपूर महानगरपालिकेत पारदर्शिकतेसाठी नेमके काय केले हे सांगायलाच नको का? अवांतर : फडणवीसांनी केलेली चिरफाड परिणामकारक होती का हा प्रश्नच आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात, पान नं ३०७वर "रँकिंग ऑफ यूएलबीज ऑन ट्रान्स्परन्सी, अकाऊंटेबिलिटी अँड पार्टीसिपेशन" या ग्राफ मध्ये मुंबई नं १ ला दाखवलेली आहे. आता याचा अर्थ ज्याने त्याने आपापल्या परीने लावावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

"बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे.
तसे भाजपने केले पाहिजेच. ही अपेक्षा ठेवली तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. या आणि दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे माझा या निवडणुकांमध्ये एकच इंटरेस्ट आहे. शिवसेनेचा पराभव व्हायला हवा.कोणीही जिंकले तरी सामान्य मुंबईकराच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही उध्दव ठाकरेंनी २०१४ पासून जे एकेक प्रकार चालविले आहेत त्या माजाचा स्त्रोत असलेली मुंबई महापालिकेची सत्ता गेली पाहिजे. बाकी ताकाला जाऊन भांडे लपविणे, उगीच पोलिटिकली करेक्ट वागणे, गुळमुळीतपणे काहीतरी लिहिणे किंवा ज्याला बिटिंग अराऊंड द बुश म्हणतात तसले प्रकार मला तरी जमत नाहीत (या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) ) त्यामुळे या आणि याच कारणावरून शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. बाकी friends turned enemies असतात त्यांच्यावर मुळातल्या शत्रूपेक्षा अधिक राग असणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनीही शिवसेनेचा पराभव व्हावा याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित केले होते, वाघेलांनी गुजरातमध्ये तसेच लक्ष भाजपचा पराभव होण्यावर केंद्रित केले होते आणि राष्ट्रवादीनेही १९९९ मध्ये तसेच लक्ष काँग्रेसचा पराभव व्हावा याकडे केंद्रित केले होते. त्याच धर्तीवर शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे इंग्रजीत काय? महापालिकेत देखिल दुसरे का होईना (कॅगसारखेच) ऑडिट असायचेच. अलिकडे कॅगचेच असते.

In reply to by arunjoshi123

इकॉनॉमिक सर्वे :):). सध्या महापालिकेतील ऑडिट हे स्थायी समिती, आयुक्त आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र अकाउंटंट्स जनरल इथंपर्यंत असते. CAG बहुतेक पालिकांचं करत नसावं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शिवसेनेने इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन केले होते. बाळासाहेबांचा एकाधिकारशाहीवर विश्वास असल्यामुळे इंदिरा गांधींची आणीबाणी त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच होती. १९७७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि त्याबद्दल वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यात काँग्रेसने पाठिंबा दिला होता. १९८० च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवसेनेने काँग्रेसलाच पाठिंबा दिला होता. याविषयी अधिक इथे . तसेच मुंबईचे शिवसेनेचे महापौर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेतून बाहेर का पडले? कारण १९७७ मध्ये शिवसेनेने महापौर निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मुरली देवरांना पाठिंबा दिला होता ते हेमचंद्र गुप्तेंना पटले नव्हते.

In reply to by गॅरी ट्रुमन

२००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर पुण्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन उपमहापौरपद पदरात पाडून घेतले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

आणीबाणीला समर्थन - बाळासाहेबांच्या काही न आवडलेल्या निर्णयांपैकी तो एक होता आणि याचा नेहमी खेद वाटतो. दुर्दैवाने बाळासाहेबांचं त्यामागचं लॉजिक काय होत यावर फारसं वाचायला मिळत नाही. तुम्ही वर दिलेल्या या सगळ्या राजकीय खेळ्या (भलेही स्वार्थासाठी) होत्या असा निष्कर्ष निघू शकतो. पण म्हणून वाघ मांजर झाला वगैरे पटण्यासारखे नाही. अशा युती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवर केल्या जातात, सर्व पक्ष करतात. काश्मीरमधली सध्याची युती सगळ्यांनाच पटली आहे असे नाही. शिवाय शिवसेनेला सुरुवातीच्या दिवसात मोठे करण्याचे काम काँग्रेसनेच केले असावे असे मला वाटते (कम्युनिस्टांवर कुरघोडी करण्यासाठी, वसंतसेना त्यातूनच आले होते का?). मग अशा काँग्रेसच्या जवळ असलेल्या, आणीबाणीचे समर्थन केलेल्या पक्षाशी भाजपनेही इतकी वर्षे युती केलीच की!

निवडणूकीनिमित्त सगळीकडून नुसती प्रचाराची राळ अन आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. एक सामान्य माणूस म्हणून मुर्खपणे बरळणार्‍यांचा अगदी संताप येतो. बरं राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे आणि राजकारण बदलावे असे म्हणतात पण चांगल्या व्यक्तींच्या संयमाचा बांध फुटावा अशी परिस्थिती आणतात हे लोक !

सध्या किंवा मागच्या टर्ममध्ये भाजपा मुंबई - ठाणे - कंडोमपा महापालिकेमधे सत्तेत सहभागी आहे का ?

शिवसेनेचे फ्लिपफ्लॉप--- १. राजकारण म्हणजे गजकरण त्यामुळे आपण राजकारणापासून दूर राहणार याचा एका बाजूने घोषा लावत असतानाच शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर वर्षातच निवडणुकांच्या राजकारणात उतरणे. २. मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी (तत्कालीन भाषेत-- नगरपित्यांनी) महापालिका सभागृहात वंदेमातरमला विरोध केला. हा मुद्दा १९६७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये गाजला होता. अर्थातच शिवसेनेने वंदे मातरमच्या बाजूने भूमिका घेतली होती. पण नंतर त्याच मुस्लिम लीगचा पाठिंबा घेऊन शिवसेनेचे सुधीर जोशी महापौरपदी विराजमान झाले. ३. १९७९ मध्ये मुस्लीम लीगबरोबर परत एकदा युती करून बाळासाहेबांनी जी.एम.बनातवालांबरोबर नागपाड्यामध्ये सभाही घेतली होती. ४. बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे हे जाहिर वक्तव्य करणार्‍या बाळासाहेबांनीच त्या जागेवर मंदिरही नको मशीदही नको तर मंगल पांडेचे स्मारक बांधा असेही म्हटले. अशी इतरही उदाहरणे आहेतच. सर्वच राजकीय पक्षांनी असे फ्लिपफ्लॉप कधीनाकधी केले आहेत. पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज शिवसेना समर्थकांमध्ये इतर पक्षांच्या समर्थकांपेक्षा अधिक प्रमाणावर असतो. अर्थातच शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये चांगले शिकलेले, इंटलेक्च्युअल्स फारसे कोणी नाही. एक सुरेश प्रभू होते त्यांचेही भाजपने अपहरण केले. सामान्य शिवसैनिक म्हणाल तर मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांची भाषा अधिक भावणारे लोक हे. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचे ठरविले की मग त्याला कोणतेही प्रश्न न विचारता विश्वास ठेवला जायचे प्रमाण सर्वात जास्त!!

In reply to by गॅरी ट्रुमन

अलीकडे गुद्दे वगैरे सगळेच संपून निव्वळ पेट्यांचे गणित सुरु आहे. बाळासाहेब अ‍ॅक्टिव्ह असताना शिवसेनेत फक्त इनकमिंग होते. नंतर काय झाले ते ठाऊक आहेच जनतेला.

In reply to by गॅरी ट्रुमन

पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज...
आपल्याला कधीकधी ज्या संदर्भात ज्या वाक्यरचना सुचतात त्या जाँ फिदा टाईपच्य असतात. (आता गैरसमज नक्की शिवसेनेत सर्वाधिक असावा तुम्ही म्हणत आहात तर ) पण अशा गैरसमजाचा प्रादुर्भाव तरुण शिक्षित लोकांत जास्त असावा. मोदींचे भक्त देखिल यातच मोडतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

५. सुपारी घेऊन कामगारांचे संप फोडणे. ६. एन्रॉन- याबद्दल गॅरी भाउनी किंवा श्रीगुरुजींनीच अधिक लिहावे. ७. जावेद मियांदाद भेट आणि बरेच आहे. तूर्तास एवढे पुरे.

गॅरी ट्रुमन,
शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.
तुम्हाला स्थानीय लोकाधिकार समिती माहीत असेल. ही नसती तर आज मराठी माणूस मुंबईतल्या सरकारी कार्यालयांत केंव्हाच हद्दपार झाला असता. रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर चालवणं शिवसेनेने सुरू केलं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्थानिय लोकाधिकार समितीचे सुरवातीच्या काळातील काम नक्कीच चांगले होते. पण त्या चांगल्या कामाबद्दल मुंबईकरांनी शिवसेनेला महापालिकेमध्ये कित्येक वर्षे सत्ताही दिली आहे. १९९२ ते १९९६ ही चार वर्षे वगळता १९८५ पासून आजपर्यंत मुंबईत शिवसेनेचाच महापौर आहे. १९८५ पूर्वीही शिवसेनेचे महापौर मुंबईत झाले होते.त्या कामासाठी दशकानुदशके सत्ता मिळणे हे जरा जास्त झाले नाही का? गांधी घराण्याने जो काही थोडाफार त्याग केला त्याबद्दल काँग्रेसला कित्येक दशके सत्ता मिळालीच होती त्यापेक्षा हे नक्की कसे वेगळे आहे? सरकारी नोकर्‍यांमध्ये मराठी माणसाला स्थान मिळणे हा मुद्दा १९६० आणि १९७० च्या दशकात नक्कीच महत्वाचा होता कारण त्या काळात सरकारी नोकर्‍या हाच महत्वाची रोजगाराची संधी होती.पण आता तशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यामुळे ४०-५० वर्षे जुने मुद्दे आणि त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन,
त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?
एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना. शिवाय इतर कामं पण चालू असतातच की. मी सांगत नाही सगळी. ज्याच्यामुळे मतदाराच्या नजरेत राहता येतं अशी काम हुडकून काढण्यात शिवसैनिक तरबेज आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना.
या न्यायाने विन्स्टन चर्चिल इंग्लंडमध्ये आजीव पंतप्रधान व्हायला हवे होते. इतकेच नाही तर पुढील जन्मात जन्माला आल्यावरही ताबडतोब पंतप्रधानपदीच विराजमान व्हायला हवे होते. पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अ‍ॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते. स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते? असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अ‍ॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते.
१९४५ च्या ब्रिटिश मतदात्यांना २०१७ च्या भारतीय मतदात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याआधी या ऑफन कोटेड जगाला मूर्खात काढणार्‍या विधानाचा अभ्यास व्हायला हवा. शांती काळात चर्चिल नको असण्याचा आणि त्याचा हरण्याचा संबंध ही त्या लोकांनी उथवलेली हूल आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?
हे काही पटले नाही. हे प्रकरण या चर्चेत ओढण्याचे कारण समजले नाही. बाळासाहेबांचे या प्रकरणाआधीचे आणि नंतरचे पुलंबद्दलचे मत काहीच महत्वाचे नाहीये का? आणि हे प्रकरण घडले तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी नव्हती का? आपल्या विचारसरणीच्या विरोधातील असले तरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करण्याचा सुज्ञपणा युतीच्या सरकारने दाखवला होता (सोयीकर व्यक्तींना पुरस्कार देण्याचा ट्रेंड असतानाही). त्यानंतर हे शिवशाहीचे नाही ठोकशाहीचे सरकार आहे असे राजकीय दृष्टिकोनातून मत व्यक्त करणे बाळासाहेबांना खटकले नसते तरच नवल होते (बाळासाहेबांनी वापरलेल्या वाक्याचे समर्थन करण्याचा हेतु नाही). त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का? असाच हिशोब आपण अत्रेंच्या भाषणांनाही लावणार का? त्या भाषेला आजच्या दृष्टीने बघितले तर ती योग्य नाहीच वाटू शकत. पण शेवटी शेवटी बाळासाहेबांच्या भाषणांमध्ये तशीच भाषा आपल्याला दिसून येत होती का? असो, अवांतर होतंय. पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे.

In reply to by गॅरी ट्रुमन

शिवसेनेच्या कोलांटीउड्या याबाबतीतल्या मुद्द्यांबद्दल विचारत आहात का? तर मी वर म्हटल्याप्रमाणे सगळे पक्ष याबतीत एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व मतांशी सहमत. फरक इतकाच कि कोलांट्याउड्या हा निकष लावायचा असेल तर तो सगळ्याच पक्षांना लावून मग कल ठरवायला हवा. कोणीही जिंकले तरी फार फरक पडणार नाही ह्या तुमच्या मताशीही काही अंशी सहमत! पण मुंबईत शिवसेनाच असावी असे माझे वैयक्तिक मत आहे ते भाजपवर अंकुश म्हणून! आणि त्याच न्यायाने त्यांची एकट्याची सत्ता असू नये ती शिवसेनेवर अंकुश म्हणून! मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मुंबईत सत्ता हा माझा आवडता पर्याय आहे :):).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का>>> -- अजित पवारांच्या वेळेस असली वाक्य कोणाला नाही सुचली. अजून ही बिचारे आत्मक्लेश करत असतात.

In reply to by विशुमित

परत एकदा प्रतिसाद वाचा विशुमती साहेब! "पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे." याचा काही बोध लागत असेल तर बघा. आज काय ज्यांचा वाक्यांवर गदारोळ झाला आहे असे अजित पवार एकटेच नाहीत. आताचे समाजकारण, राजकारण व मतदार सगळेच बदलले आहे. त्यामुळे तेव्हाइतके जहाल होता येत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?
राणे २००५ मध्ये पक्ष सोडून गेल्यानंतर "सामना"मध्ये त्यांच्याविरूद्ध इतकं घाण लिहून आलं होतं की वाचतानाच शरम वाटत होती. "मी ह्याला मोठा केला, पण हा चड्डीत चिरकला","या डेडफुट्याचं **त नाही" अशासारखी अनेक अत्यंत घाण वाक्ये लिहिली गेली होती. आपल्या पक्षातील एखादा नेता पक्ष सोडून दुसरीकडे गेल्यानंतर सेना इतकी का बिथरते हे एक गूढच आहे. थोडी परिपक्वता दाखवून हा निर्णय मान्य करायला हवा. जसे तुमच्या पक्षातून काही जण बाहेर जातात तसेच बाहेरचेही काही जण आत येतात. त्याबद्दल इतका थयथयाट व विखारी भाषा कशासाठी? २००९ मध्ये बिजदच्या नवीन पटनाईकांनी स्वतःहून भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांनी समंजसपणे हा निर्णय स्वीकारला. आपल्याशी युती तोडली म्हणून ना भाजपने थयथयाट केला होता ना बिजदने युती तोडल्यानंतर अभद्र भाषा वापरली होती. शिवसेनेचं बांगलादेशाच्या क्रिकेट संघासारखं आहे. स्वतः लिंबूटिंबू असले तरी त्यांना पराभव अजिबात सहन होत नाही. त्यामुळे स्वतःचा खेळ उंचावण्याऐवजी दुसर्‍या संघाला खिजविणे, अभद्र भाषा वापरून अवमान करणे यातच ते धन्यता मानतात.

मुंबईमध्ये भाजप व रिपाईची आज पहिली प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, 'मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... :)) चॅनेलवाले पण लाईव्ह भाषणं दाखवून टीआरपी मिळवतायत..

In reply to by फेदरवेट साहेब

आयला ह ह पु वा.. पण मेगाबायटी प्रतिसादांमध्ये विशुमित भाऊंना अजून बरीच मजल गाठायची आहे असे निरीक्षण नोंदवतो. राष्ट्रवादीचे 'होऊ घातलेले श्रीगुरुजी' असे पद देऊ इच्छितो.

फेदरवेट साहेब, अनुप जी आणि चिनार जी लाख लाख धन्यवाद..!! पण मी एव्हढा पात्र नाही हो गुरुजींसारखा होण्याला. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. जे समोर अनुभवतोय, थोडे फार वाचतोय आणि तुमच्या सारख्या दिगाजांकडून धडे घेतोय त्याच्यातुनच हा तुटपुंजा लेख प्रपंच चालवला आहे. पदरात घ्या.

In reply to by विशुमित

तेच म्हणतो भाऊ..श्रीगुरुजी पद निभावणं लय कठीण..वर्ष वर्ष धागा लढवावा लागतो त्यासाठी..गरज पडल्यास किलोकिलोंनी लिंका द्याव्या लागतात..आणखीही बरंच आहे..

In reply to by चिनार

सगळ्यात मुख्य म्हणजे, काहीही विचार न करता बेंबीच्या देठापासून ठो ठो करताच आले पाहिजे. पुढीलांचे कर्तृत्व इतके महान आहे की त्यांच्यावर दशखंडी श्रीगुर्जी मिपालीलामृत नावाचा एखादा ग्रंथ पडावा , असे भारदस्त भविष्य घडवण्याकरतासुद्धा विशुमित भाऊंना हार्दिक शुभेच्छा.

In reply to by फेदरवेट साहेब

धन्यवाद साहेब...!!

In reply to by फेदरवेट साहेब

बाकी काही म्हणा, पण 'फेदरवेट साहेब' यावेळेस किमान टेस्ट खेळायच्या प्लॅनिंग ने आलेत असं दिसतंय. नाही तर आत्तापर्यंत दर वेळेस टी-२० पण पुरी होत नव्हती आणि पावसात सगळंच वाहून जात होतं. हो की नै हो ? ;)

In reply to by अस्वस्थामा

बाकी मी इथे टेस्ट खेळायला आलो असेन वा एक टप्पा आऊट खेळायला, किंवा ग्राउंड विकत घ्यायला, तुम्हाला चोंबडेपण करायचं कारण कळलं नाही ते? दूर दूर पर्यंत मुद्द्याला धरून नसलेले कैच्याकै (माझ्याशी) बोलायच्या अगोदर ह्यापुढे १० वेळा विचार करायचा.

निवडणूकांत लोक कसे मतदान करतात, त्याची कशी गणिते मांडता येतात हे मन विषण्ण करणारे आहे. त्याची तशीच विश्लेषणं करणं हे अजूनच दुखावून जातं. बेरजा वजाबाक्या कशा होतील यात असलेला रस आणि कोणता घोडा जिंकणार आहे, कोणता घोडा जिंकजिं, इ इ वाटणे हे अशाच मनोवृत्तीचे द्योतक आहे. अत्यंत आदराने केलेल्या तुलना समजून घेता येतील परंतु अत्यंत अनादराने केलेल्या तुलना (मला आवडणारा पक्ष सर्वात कमी अनादरणीय कसा आहे, इ इ सूर) कशा समजून घ्यायच्या? असल्या लोकशाहीला काही अर्थ आहे का? आणि निकालाची उत्कंठा का असावी? आपला बलात्कारी (?!?) कोण असणार याबद्दल कसची उत्कंठा? ज्या मूलभूत अस्मितांना घटनात्मक संरक्षण आहे त्यांच्यातच गुरफटून कसले ते निवडणूकांकडे पाहणे?

In reply to by arunjoshi123

तात्विक दृष्ट्या तुमचे म्हणणे खरे आहे, पण मग नेमके काय करायला हवे असे आपले मत पडते?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शहराची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, इ इ प्राधान्ये काय आहेत आणि ती पूर्ण करायचा उमेदवारांचा काय प्लॅन आहे.

परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी . आता राजकारण म्हटलं कि काही चाली चुकायच्याच काही बरोबर पडायच्या तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते. काटेकोर समीक्षा होते अगदी मराठी माणसाचा स्वभावच तो.कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही. अजून एक मुद्दा स्थलांतराचा तर मुंबई हि आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मराठी माणसाचे स्थलांतर होणे स्वाभाविक देशात कुठल्याही शहरात हे झाले असत . पण काही मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक आहे . मांसाहाराला विरोध हा मुद्दा अनेक मराठी लोकांना पटला नाही मराठीच काय बंगाली आणि दाक्षिणात्य लोकांनाही नाही पटला इतर अनेक मुद्दे आहेत .लॉबिंग करणं मराठी माणसाला कधीच जमलं नाही ती गोष्ट शिवसेनेने एनकॅश केली . त्यामुळे सेनेने बागुलबुवा दाखवला नाही परिस्थितीतील खदखद हेरली . कुठल्या धर्माला दुखावण्याचा हेतू नाही पण आजही मुंबईतील मुस्लिमांवर सेनेचा धाक आहे हि वस्तुस्थिती आहे . अवांतर - भाजप हरावी असं वाटत ह्याचा कारण सेनेचं समर्थन नाही पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .

In reply to by वरुण मोहिते

पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .
आणि असाच नालायकपणा उद्धव ठाकरे २०१४ पासून राज्य सरकारमध्ये सत्तेत बसून करत आहेत. एकीकडे भाजपबरोबर सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे मधूनमधून भाजपला सामनामधून टोले द्यायचे, ज्या पक्षाबरोबर महाराष्ट्रात सत्ता उपभोगायची त्याच पक्षाचा गोव्यात पराभव व्हावा म्हणून कारस्थाने करायची हा पण नालायकपणाच झाला. कित्येकवेळा म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिकेत कोणीही जिंकले तरी सामान्य लोकांना फार काही फरक पडणार नाहीये पण मुंबई महापालिकेतल्या सत्तेमुळे राज्य आणि केंद्र पातळीवर नालायकपणा उधोजीरावांना करता येत आहे म्हणून तिथे सेना हरावी.
कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही.
मतदार नक्की काय बघून मते देतात हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.वाजपेयींच्या सरकारने अर्थकारण नक्कीच चांगले सांभाळले तरीही त्यांचा पराभव व्हायचा तो झालाच. 'वकूबाने' खुज्या असलेल्या नेत्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये मतदारांवर अधिक प्रभाव टाकला म्हणून ते निवडून आले. तसा प्रभाव शिवसेनेला महाराष्ट्रात टाकता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मराठी लोकांच्या मानसिकतेला दोष देणे हा थोडासा 'elitist' प्रकार झाला. हे थोडेसे ट्रम्पला मत दिलेल्या सगळ्या अमेरिकन्सना 'racist' म्हणण्यासारखे झाले.

In reply to by गॅरी ट्रुमन

पक्ष वाढीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही एकमेकांवर टीका केली आहे . पण मर्यादेत . काँग्रेस , राष्ट्रवादी कित्येक ठिकाणी वेगवेगळे लढले आहेत .पण आज केंद्रात आणि राज्यात भाजप आहे म्हणून काहीही बोलेले पटत नसावे . हे कुरघोडीचे राजकारण आहे तितकीच बोलताना पातळी भाजप ने हि सोडली आहे .विरोधी भूमिका घेणं वेगळं आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडणं वेगळं . भाजप च्या ताब्यात असलेल्या महानगर पालिका भ्रष्टाचाराची चांगली उदाहरण आहेत. मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे . मुंबईत सेनेकडे ४ गोष्टी सांगण्यासारख्या तरी आहेत भाजप ची तर ती पाटी पण कोरी आहे .उगाच नाही विधानसभेच्या वेळी गुजरात वरून ७० च्या वर आमदार प्रचाराला आले तसेच कित्येक पदाधिकारी . त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नये .केवळ सत्तेच्या विरोधात काही बोले म्हणून महानगर पालिकेत हरावी अशी इच्छा असेल तर ओक्के .बाकी मराठी लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न नाही आणि केवळ मतपेटीतूनच ते दिसावे अशी अपेक्षाही नाही . पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे . ह्या उलट परिस्थिती बाळासाहेबांचं नाव भारतातल्या कुठल्याही राज्यात घेतलं तरी लोक मानतात .पवारसाहेबाना सर्वपक्षीय नेते मान देतात .त्याला अनुसरून हे विधान आहे .

In reply to by वरुण मोहिते

मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे .
आणि मुंबईचा मलिदा कायम आपल्यालाच मिळत राहावा यासाठी शिवसेनेची धडपड चालू आहे.
त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नये
हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे
पवार आणि ठाकरे काय टिकेच्या वर आहेत की काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यातही आता भाजप चा जास्त आहे .हे त्यांच्याच मुंबईतील वाचाळवीरांवरून स्पष्ट झाले आहे . भाजप सरळ वागत आहे उद्धव काय ते चूक वागत आहेत म्हणून सेना हरावी.(उत्तम विश्लेषण ) भाजप चे अनेक भ्रष्टाचार बाजूला ठेऊन आता काहीच फरक पडणार नाही महापालिकेत कारभाराचा पण उद्धव नीट वागत नाही म्हणून हरावी सेना हे पण उत्तम . टीकेच्या वर कोणीच नाही हो पण टीका मर्यादेत असावी यावरून विधान आहे .(वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे हे मूळ विधान आहे )

In reply to by गॅरी ट्रुमन

हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
शिवसेना नेते हे अत्यंत माजलेले आणि अपरिपक्व हे शिवसेना हरावी असे वाटण्यामागे एक कारण आहे. परंतु ते तेवढेच कारण नाही. एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे, "सामना"तून अभद्र लिहिणे आणि फुशारक्या व बढाया मारणे एवढेच सेनेला जमते. "मला फक्त १ दिवस भारताचा पंतप्रधान करा. काश्मिर प्रश्न २४ तासांचा आत सोडवून दाखवितो.", "पाकिस्तानवर अणुबाँब टाकून नष्ट का करीत नाही" अशा तर्‍हेच्या वल्गना करणारे वास्तवापासून शेकडो कोस दूर असतात. ४० लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरे देणार, शेतकर्‍यांना फुकट वीज देणार अशी त्यांची आर्थिक धोरणे. अशा टोळीच्या हातात अजिबात सत्ता नसावी.

In reply to by श्रीगुरुजी

स्विस बँकेतून आणतो, तसेच नाही का २४ तासात पाकिस्तान घालवतो . काश्मीर प्रश्न लगेच सोडवतो असेही एक आश्वासन होत कोणाचेतरी:))मनमोहन प्रधानमंत्री असताना जे आता सर्वोच्च पदावर आहेत .ते तरी सत्तेत आहेत तरी जमलं नाही.अश्या वक्तव्यांना भावनेचा निकष असतो आणि सगळेच ते करतात . बाकी राम मंदिराचे काय झाले ??झोपडपट्टी वासियांना घरे किंवा वीज हे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे .असो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक धोरणावरून आठवले काही आर्थिक धोरण -नोटबंदी सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीत शैक्षणिक धोरण -स्मृती इराणींना मंत्री करणे .

In reply to by वरुण मोहिते

बाकी राम मंदिराचे काय झाले ?
पाहिजे आहे का?
सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीत
मंदिर फायजेल का नको, कायतरी एक सांगा.