काश्मीर - वल्गना आणि वास्तव.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
64934
वाचनखूण
प्रतिक्रिया
271
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
कलम ३७० रद्द करा ही सुद्धा
In reply to कलम ३७० रद्द करा ही सुद्धा by श्रीगुरुजी
याच कलमामुळे काश्मिरमध्ये
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
सोन्या बापू या आयडीने स्वतः
In reply to सोन्या बापू या आयडीने स्वतः by मृत्युन्जय
देव ताम्हणकरांना
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
तुम्ही म्हणाल ते मान्य करू
सैनिकांची काळजी कोणाला आणि दहशतवाद्यांची काळजी कोणाला ....
ताम्हनकर, देव तुमचे अन ह्या
बाकी ऍड होमिनेम फाट्यावर मारून
बापुसाहेब आणि गुरुजींच्या
सोन्याबापू नावाचे आयडी
सैन्य
गंभीर विषय
इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि'
In reply to इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि' by श्रीगुरुजी
????????
In reply to इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि' by श्रीगुरुजी
खॅ खॅ खॅ खॅ
कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा ....
In reply to कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा .... by संदीप ताम्हनकर
तुम्ही दिलेल्या दुव्यात
In reply to तुम्ही दिलेल्या दुव्यात by प्रसाद_१९८२
एक शंका
In reply to एक शंका by अनुप ढेरे
एम आय डी सी मध्ये जमीन
In reply to कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा .... by संदीप ताम्हनकर
साहेब,
शांत अशा पुण्यासारख्या
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
यू टू ?
In reply to यू टू ? by कपिलमुनी
मुनीवर
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
डॉक्टर साहेब तुमचे अनुभव
In reply to डॉक्टर साहेब तुमचे अनुभव by अमितदादा
काश्मीर किंवा ईशान्य भारतात
In reply to काश्मीर किंवा ईशान्य भारतात by सुबोध खरे
बरं हे अनुभव अपवाद नाही तर
In reply to बरं हे अनुभव अपवाद नाही तर by कैलासवासी सोन्याबापु
जागा हुकली, रुटीन अनुभव
In reply to काश्मीर किंवा ईशान्य भारतात by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला खरे साहेब.
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
खरे साहेब, _/\_
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
...
In reply to ... by चंपाबाई
जिथे तिथे पिंक टाकलीच पाहिजे
In reply to जिथे तिथे पिंक टाकलीच पाहिजे by सुबोध खरे
...
In reply to ... by चंपाबाई
...
In reply to ... by चंपाबाई
सैनिक मरायला सदैव सज्ज असतो.
In reply to सैनिक मरायला सदैव सज्ज असतो. by गामा पैलवान
.
In reply to . by चंपाबाई
फुकट्या कोण?
In reply to . by चंपाबाई
"सैनिक फुकट लढत नसतात"
In reply to "सैनिक फुकट लढत नसतात" by सुबोध खरे
..
In reply to .. by चंपाबाई
आकुपेषनल हाझार्ड
In reply to . by चंपाबाई
सैनिक फुकट लढत नसतात
सैनिक फुकट लढत नसतातमाझ्या विचार आणि (अल्प)
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
दीड दिवस काश्मीरमध्येआणि
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
सहमत
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
...
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
...
In reply to ... by चंपाबाई
अवतार समाप्तीची वेळ झाली
In reply to ... by चंपाबाई
बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला
एका सैनिकाने स्थानिकांशी
काही मुद्दे
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.@संदीप ताम्हनकर तुम्हाला फक्त डेक्कन परिसलातील घटना वाचुन लिहावेसे वाटले? एक बातमी वाचली होती पुण्यात लष्करी छावणी जवळिल एका रहिवाशी इमारतीतील लोकाना लष्करातील जवान व अधिकारी याना लष्करी जागेचा वहिवाटि करु नये म्हणुन अटकाव केला. यापुढे लष्करातील जवानानी बळजबरीने त्याना बाहेर हाकलुन ( लष्करातीची ) जागा बन्दिस्त केलि ठ्ळक बाब अशी कि त्या इमारतीत एक माजी मेजर जनरल अधिकारी वास्तव करत होते. जर लष्कराने पुण्यातील सर्व ( देशातील सर्व कॅन्टोनमेन्ट मधील) लष्करी जागा बन्दिस्त केल्या व सर्व सामान्य नागरीक सुविधेसाठि कोणाला बोलवणार ( हुर्रियतला काय ??? )ईशान्य भारतात बन्डाळी भरपुर नियंत्रणात आहे. पंजाब व काश्मीर येथे सर्वसाधारण एकाच कालखंडात दहशदवाद सुरु झाला, आज पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला आहे. पण काश्मीर मध्ये सुरु आहे. जेव्हा पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला तेव्हा भाजप सरकारमध्ये पण नव्हते, मग पंजाबमधील दहशदवाद असा थांबला ???? काँग्रेसला उगाच दोष का देता ? , बर वाजपेयी लाहोरला गेले कारगिलबद्दल गाफिल राहिले वर त्याच मुशर्रफला आग्राला बोलवुन गळाभेट घेतली, याउपर मोदि लाहोरला जाऊन केक खाउन आले भाजपाने केलेले हे " मुस्लिम तुष्टीकरण " तुम्हाला दिसत नाहि का ( मी अपेक्षा करतो कि काश्मीर "इस्लाम / मुसलमान" पाकीस्तान नाते माहीत असावे. ) ????एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारेकाँग्रेसचे सरकार
कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी
लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतीलकाश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच.तुम्ही डेक्कन घटना अनुभवली कि नाही माहित नाही. पण तुम्हि काश्मीर फिरलात तुम्हि दिलेल्या टॅक्सचा हिशोब एका कर्तव्यदक्ष सैनिकाला विचारले / सांगितले फार फार आभारी आहे. हाच हिशोब भ्रष्ट्राचार करणाऱ्या नेत्याला विचारुन निदान माझ्यावर तर उपकार करा.... क्षणभर मला असे वाटले की तुम्ही हुर्रियतसाठी भरपुर काही कराल. वैतागलेले भारतीय लष्कार म्हणते भरपुर काश्मीरी खातात भारतातले आणि दुवा सीमेपलीकल्यांसाठी मागतात. तुम्ही भारतीय लष्काराला त्याच्या चुकाबद्द्ल आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन नाण्याची एक बाजु मांडली हरकत नाही . जरा शुध्दीमध्ये मला एक सांगा की तुम्ही पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल बातम्या इंटरनेट लेख यावरुन लिहिणार की प्रत्यक्ष पाकिस्तानात जाऊन अनुभवुन लिहिनार. पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल अभ्यास करा वस्तुस्थिती लिहा आणि जर खरोखर काश्मीर फिरला असाल तर छतीठोकपणे सांगा की तुम्हि पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल काश्मीरी मुसलमानांना सांगू शकाल.माझा काश्मीरवरील लेख (फेसबुकवरील)
In reply to माझा काश्मीरवरील लेख (फेसबुकवरील) by सुधीर काळे
परत एकदा नेहरू
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
या सगळ्यात रशियाचा आणि चीनचा
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
तुमच्या इंचाइंचाच्या धाग्यावर
In reply to तुमच्या इंचाइंचाच्या धाग्यावर by श्रीगुरुजी
एकत्रित प्रतिसाद
In reply to एकत्रित प्रतिसाद by गॅरी ट्रुमन
तेव्हा १९४८ मध्ये अमेरिकन
In reply to तेव्हा १९४८ मध्ये अमेरिकन by श्रीगुरुजी
नाही
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
बुबुडाविपुमावि म्हणजे
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
+१
लष्कर स्वतः युद्ध सुरु करत
In reply to लष्कर स्वतः युद्ध सुरु करत by सुबोध खरे
वर या सुडो सेक्युलर आणि
In reply to वर या सुडो सेक्युलर आणि by शाम भागवत
वा!! आवडला प्रतिसाद!!!
आज कारगील विजय दिवस.
अभिवादन.
मातृभुमीसाठी लढणाऱ्या सर्व
सहमत.
कोणी कितीही आपटली तरी काश्मीर
दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: -
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
एक दुरुस्ती: माझ्या
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
तुमची काश्मीर प्रश्न सुटावा
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
मग काश्मीर देउन टाकायचा
In reply to मग काश्मीर देउन टाकायचा by धनावडे
अजिबात नाही आणि मी हि आस कूट
In reply to अजिबात नाही आणि मी हि आस कूट by अमितदादा
हा प्रश्न तुम्हाला नाही वो
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
ताम्हनकर साहेब
In reply to ताम्हनकर साहेब by सुबोध खरे
हा प्रतिसाद तुमच्या ह्या
In reply to हा प्रतिसाद तुमच्या ह्या by अमितदादा
भारत व पाकिस्तान या वादात
In reply to भारत व पाकिस्तान या वादात by श्रीगुरुजी
तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी
In reply to तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी by अमितदादा
पाकिस्तान असो वा काश्मिरी,
In reply to पाकिस्तान असो वा काश्मिरी, by श्रीगुरुजी
दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
कारगील घडवणार्या मुशर्रफवर
In reply to कारगील घडवणार्या मुशर्रफवर by अर्जुन
तुमची शंका बरोबर आहे अर्जुन
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
छान
In reply to दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या by अमितदादा
1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर
In reply to 1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर by श्रीगुरुजी
गुरुजी आपले विचार जुळत नसले
In reply to गुरुजी आपले विचार जुळत नसले by अमितदादा
अमिदददादा,
In reply to अमिदददादा, by अर्जुन
सहमत..
In reply to गुरुजी आपले विचार जुळत नसले by अमितदादा
माझा मुद्दा ऐवडाच होता की
In reply to माझा मुद्दा ऐवडाच होता की by श्रीगुरुजी
असहमत प्रतिवाद करत नाही.
In reply to असहमत प्रतिवाद करत नाही. by अमितदादा
काहीतरी गोंधळ दिसतो. अल्ताफ
In reply to माझा मुद्दा ऐवडाच होता की by श्रीगुरुजी
तुमच्या ह्या वाक्याला माझा
In reply to तुमच्या ह्या वाक्याला माझा by अमितदादा
पुरावा नसताना कसा विश्वास
In reply to पुरावा नसताना कसा विश्वास by श्रीगुरुजी
ह्या वाक्याशी पूर्ण सहमत।
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
1. 'सैन्याला (विशेष) हक्क आहे
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग 3: - by संदीप ताम्हनकर
मागची पंचवीस वर्षे सैन्याची
चलचित्र थोडं पाहिलं ....
In reply to चलचित्र थोडं पाहिलं .... by गामा पैलवान
रिक्षावाला म्हणतो की जो कोणी
केवळ हिंदुत्ववादी आणि संघी
In reply to केवळ हिंदुत्ववादी आणि संघी by संदीप डांगे
सैनिक जर एवढेच बेताल असते तर
In reply to केवळ हिंदुत्ववादी आणि संघी by संदीप डांगे
सहमत
In reply to सहमत by सामान्य वाचक
सहमत।
आरे संदीपा...........
अरे तामण्या (.....) ..
In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ
+१००
In reply to अरे तामण्या (.....) .. by सुज्ञ
च्यायला हे असलं बोलून (म्हणजे
हि लिंक आवर्जून बघा
In reply to हि लिंक आवर्जून बघा by गणेश उमाजी पाजवे
अजून एक लिंक
In reply to अजून एक लिंक by गणेश उमाजी पाजवे
एकदम सही !
In reply to एकदम सही ! by गामा पैलवान
गामा पैलवानजी
भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?
आता या मानवतावाद्यांनी एक नवीन मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे भारतीय लष्कराने पॅलेट गन चा जो वापर केला काश्मीर मध्ये तो चुकीचा होता आपल्याला ऑफिस मध्ये गार गार थंड हवेत बसून हे लिहिताना अगदी सोप्प वाटत कि पॅलेट गन वापरणं कसं चुकीचं आहे वगैरे, पण जरा आपण कल्पना करूयात कि आपण भारतीय लष्करातले एक जवान आहोत आणि आपण आपल्या 15-20 सहकाऱ्यांसोबत 200-300 दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत, यातले काही दंगलखोर चाकू-सुरे घेऊन आपले डोळे फोडायला येत असतील तर आपण त्यांची आरती ओवाळावी का? कि त्याचा सत्कार करावा?दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुले व महिला या सगळ्या प्रकारात जखमी झालेल्या आहेत, तर या सो कोल्ड मानवतावाद्यांच्या मते हे सगळे भारतीय जवानांमुळे झालेले आहे पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात. आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.In reply to गामा पैलवानजी by गणेश उमाजी पाजवे
संपूर्ण सहमत.
लेख आवडला.
उद्या शुक्रवार
काश्मीर चे वास्तव... संत
काश्मीर आणि तिथले अंतर्गत
एक अत्यंत उथळ आणि वल्गना
"इंडियन जेम्स बॉन्ड" (???!!!) श्री. अजित डोवाल यांचे भाषण
पूर्ण लेख वाचला , आणि
In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना
प्रतिसाद आवडला.
In reply to पूर्ण लेख वाचला , आणि by जेसीना
+११११
http://m.ndtv.com/blog/the-12
ताम्हनकरराव,
In reply to ताम्हनकरराव, by श्रीगुरुजी
लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त
In reply to लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त by संदीप ताम्हनकर
काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन